शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भिवापुरात तयार व्हावी अ‍ॅग्रो इंडस्ट्री! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2023 20:44 IST

Nagpur News हळद आणि मिरचीवर प्रक्रिया करणारी अ‍ॅग्रो इंडस्ट्री उदयास आली तर भिवापूरचा हा भाग सुजलाम् सुफलाम् होईल, अशी भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी मांडली आहे.

नागपूर: 'जिथे पिकते तिथे विकत नसते. अगदी हीच अवस्था भिवापूर तालुक्यातील जगविख्यात हळद आणि मिरचीच्या संदर्भात आहे. समजा याच तालुक्यात पिकणार्‍या हळद आणि मिरचीवर प्रक्रिया करणारी अ‍ॅग्रो इंडस्ट्री उदयास आली तर हा भाग सुजलाम् सुफलाम् होईल', अशी भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी मांडली आहे.

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर हा भाग वायगाव हळद आणि मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. येथील मिरचीचा स्वाद मिळावा अशी अनेकांची इच्छा असते. त्याकरिता ते भिवापुरी मिरचीचेच तिखट द्या, अशी मागणी दुकानदारांकडे करीत असतात. हा भिवापुरी मिरचीचा तो ठसका पाहता, अ‍ॅग्रो इंडस्ट्री उभी राहणे काळाची गरज बनली आहे. त्यानुसार भिवापुरात हा उद्योग स्थापन व्हावा याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केली आहे. विशेष म्हणजे प्रकल्प अहवालापासून तो प्रत्यक्ष काम सुरू होण्यापर्यंत जे काही लागते तीही मदत तज्ज्ञांमार्फत केली जावी.

सन 1960 पासून भिवापूर मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. लाल रंगाच्या मिरचीचा केवळ तिखटच नाही तर लाल रंगाची लिपस्टिक, नेल पॉलिश, क्रिम्समध्येही तिचा उपयोग केला जातो. भिवापूरी मिरचीत व्हिटामिन ए, बी, बी 6 आणि सी तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम व मॉलिबेडनम पदार्थ अधिक प्रमाणात आढळून येतात. यामुळे ही मिरची केवळ जिभेवरच अधिराज्य करते असे नसून, ती शरीराला सुदृढ ठेवण्याचेही कार्य करते. अशी ही प्राचीन वारसा लाभलेली मिरची भिवापूरची शान आहे. शिवाय वायगाव हळदीचेही महत्त्व सर्वांना ठाऊक आहे. या स्थितीत भिवापुरात अ‍ॅग्रो इंडस्ट्री उभी राहणे काळाची गरज आहे.

आज गावागावात बचत गटांची स्थापना झाली आहे. त्या गटातील महिलांना कुटीर उद्योग म्हणून याकडे वळवले तर फार मोठी उलाढाल यामाध्यमाने होईल, अन् हजारो लोकांना रोजगार मिळेल असेही अरविंद गजभिये यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती