शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

कृषी अधिकाऱ्यांची बदल्यांसाठी फरफट!

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

ज्या मंत्रालयातर्फे सात दिवसांत फाईल्सचा निपटारा करण्याचे आदेश जारी होतात, त्याच मंत्रालयात मात्र कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली ...

बदली प्रस्ताव धूळखात : शेकडो अधिकारी, कर्मचारी सहा महिन्यांपासून घरीनागपूर : ज्या मंत्रालयातर्फे सात दिवसांत फाईल्सचा निपटारा करण्याचे आदेश जारी होतात, त्याच मंत्रालयात मात्र कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली प्रस्तावाच्या फाईल्स मागील सहा महिन्यांपासून तुंबून पडल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या या आडमुठेपणामुळे कृषी विभागातील शेकडो अधिकारी/कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. माहिती सूत्रानुसार मागील ३१ मे २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग- २ (कनिष्ठ राजपत्रित) व महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग-२ (राजपत्रित) संवर्गासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी झाले होते. परंतु यापैकी काही अधिकारी/कर्मचाऱ्यांना नवीन पदस्थापनेवर रुजू होणे शक्य झाले नाही, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अंशत: फेरबदलासह पुन्हा शासनाकडे बदली प्रस्ताव पाठविले. शिवाय बदलीस पात्र नसतांना ज्यांना बदली हवी आहेत, अशाही काही लोकांनी आपले विनंती अर्ज शासनाकडे सादर केले. परंतु शासनस्तरावर मागील सहा महिन्यांपासून या सर्व प्रस्तावांवर कोणताही निर्णय घेण्यात आला नसून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची फरफट सुरू आहे. माहिती सूत्रानुसार शेकडो अधिकारी/कर्मचारी नवीन आदेशाच्या प्रतिक्षेत घरी बसले आहेत. या विलंबाचा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. जाणकारांच्या मते, मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचा हा उद्योगच झाला आहे. यात फार मोठे अर्थकारण अडकले असून, बदल्यांच्या नावाखाली अधिकारी/कर्मचाऱ्यांना अनावश्यक वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा परिवार आहेत. त्यांच्यावर मुलाबाळांची जाबाबदारी आहे. मात्र असे असताना मागील सहा महिन्यांपासून सर्व अधिकारी व कर्मचारी विना वेतनाने घरी बसून आहेत. एक अधिकारी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर म्हणाला, सर्वत्र गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, दसरा व दिवाळी साजरी केली जात असताना आमच्या घरी मात्र अंधकारमय वातावरणात होते. सहा महिन्यांपासून वेतनच नसल्याने कोणताही दसरा किंवा दिवाळी साजरी करू शकलो नाही. (प्रतिनिधी)