शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

पॉलिहाऊस, शेडनेटच्या प्रलोभनात शेकडो शेतकरी देशोधडीला; बॅंकेच्या कर्जासाठी घर, शेती विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 11:37 IST

सरकार, कृषी विभागाने माथी मारली याेजना

निशांत वानखेडे/अभिनय खाेपडे

नागपूर : दुप्पट उत्पन्न आणि सबसिडीचे प्रलाेभन दाखवून शेतकऱ्यांच्या माथी मारलेल्या शेडनेट, पाॅलिहाऊस याेजनेने विदर्भातील शेकडाे शेतकऱ्यांना देशाेधडीला लावले आहे. विशेष म्हणजे, तरुण शेतकऱ्यांनी माेठ्या संख्येने ही याेजना स्वीकारली हाेती. मात्र, या याेजनेत लाभ हाेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या डाेक्यावर बॅंकांच्या कर्जाचा डाेंगर चढला असून, ते भरण्यासाठी त्यांच्यावर घरदार, शेती विकण्याची पाळी आली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यासारखे टाेकाचे पाऊल उचलले आहे.

कृषी खात्याच्या याेजनेंतर्गत शेतात पाॅलिहाऊस, शेडनेट लावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना आपल्या व्यथा मांडल्या.

घाेराड (ता. सेलू, जिल्हा वर्धा) येथील विठ्ठल वानाेडे यांनी सांगितले, २०१४- १५ मध्ये कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पाॅलिहाऊसचे महत्त्व सांगितले. नाेकरी साेडून घरची अडीच एकर शेती कसायला लागलेले विठ्ठल या याेजनेकडे आकर्षित झाले. त्यांनी ४० लाखांचे कर्ज काढून एका एकरात पाॅलिहाऊस लावून घेतले. यासाठी त्यांनी शासनाच्या याेजनेंतर्गत पुण्यात जाऊन प्रशिक्षणही घेतले.

कृषी अधिकाऱ्यांनी वानाेडे यांना कार्नेशियन व जरबेरा फुले लावण्याचा सल्ला दिला हाेता. त्यांनी पुण्यातील कंपनीकडून प्रती राेप १० रुपये या दराने ५.५० लाख रुपयांची ५२ हजार कार्नेशियन फुलाची राेपे, तर ३३ रुपये प्रती राेप दराने ४.५० लाखांची १२,६०० जरबेरा फुलाची राेपे आणली आणि दाेन्ही फुलांची राेपे एका एकरात पाॅलिहाऊसमध्ये लावली. मात्र, दाेनच महिन्यांत एका एकरातील पूर्ण राेपे उष्णतेने जळून गेली. विठ्ठल वानाेडे यांच्या डाेळ्यात अश्रूंशिवाय काहीच उरले नाही. यात हाती काही न लागता डाेक्यावर ५० लाखांचे कर्ज चढले. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी खासगी बॅंकेकडून १२ लक्ष रुपयांचे कर्ज काढले. सहा वर्षांत सरकारी बॅंकेचे ७२ लाख आणि खासगी मिळून ९० लक्ष रुपये कर्जाचा डाेंगर चढला आहे.

५० टक्क्यांऐवजी २५ टक्केच सबसिडी

शासनाने याेजना देतेवेळी कर्जावर ५० टक्के सबसिडी मिळण्याचे प्रलाेभन दाखविले हाेते. मात्र, प्रत्यक्षात सबसिडी मिळाली केवळ २० ते २५ टक्के. ती मिळायलाही अडीच वर्षांचा काळ लाेटला व ताेपर्यंत मूळ कर्जावर व्याजावर व्याज चढले हाेते.

धक्क्याने वडिलांचा मृत्यू

वर्ष उलटताच बॅंकेने कर्ज फेडण्यासाठी तगादा लावणे सुरू केले. बॅंकेचे अधिकारी घरी येऊ लागले. अडीच एकर शेती विकूनही डाेंगराएवढे कर्ज फेडणे शक्य नव्हते. त्यामुळे बॅंकेने वानाेडे यांची गॅरंटी घेतलेल्यांनाही त्रास देणे सुरू केले. कुणाची शेती, कुणाचे घर निलामी काढण्याचे पत्र पाठविण्यात आले. हा सगळा प्रकार हाेताना पाहून धक्क्याने २०१९ मध्ये वडील बापूराव वानाेडे यांचा मृत्यू झाल्याचे विठ्ठल यांनी सांगितले.

जिल्ह्यात १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अनेकदा वानाेडे यांनाही आत्महत्या करण्याचा विचार आला; पण आपल्यानंतर कुटुंबाचे हाल हाेतील, या विचाराने एम.ए. शिकलेल्या वानाेडे यांनी आत्महत्येचा विचार साेडून दिला. मात्र, याविराेधात लढण्याचा निर्धार केला. त्यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भ व महाराष्ट्रातील पाॅलिहाऊस याेजना स्वीकारलेल्या शेतकऱ्यांची यादी काढली. ही संख्या १,२०० च्या घरात आहे. त्यांच्या जिल्ह्यात ११० शेतकऱ्यांनी या याेजनेत कर्ज घेतले हाेते. कुणी १० गुंठ्यांसाठी १२ लाख, कुणी २०, ३०, ५० लाखांपर्यंत कर्ज घेतले आहे. त्या सर्वांवर चढलेल्या कर्जाची यादी त्यांनी ‘लाेकमत’ला दिली आहे. यातील १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी