शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गणवेशासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 22:56 IST

Nagpur News प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश न दिल्याचा आरोप लावत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपैसे दिल्यावरदेखील गणवेश न मिळाल्याचा आरोप‘आरपीटीएस’च्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने

 

नागपूर : प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश न दिल्याचा आरोप लावत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच हे आंदोलन करण्यात आले. पैसे घेऊनदेखील गणवेश न दिल्याचा आरोप यावेळी जवानांनी केला. मात्र, अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर सर्वांनी आंदोलन मागे घेतले.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलासाठी तरुणांची निवड केली जाते. त्यांना राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण करणे अनिवार्य असते. नागपुरात ४५ दिवसांचे प्रशिक्षण होते. प्रशिक्षण कालावधीत गणवेशासाठी जवानांकडून अडीच हजार रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी काही जणांना गणवेश देण्यात आला. मात्र, इतरांना प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश मिळाला नाही. यामुळे जवानांमध्ये संताप होता. अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. अखेर प्रशिक्षण संपल्यावरदेखील गणवेश न मिळाल्याने प्रवेशद्वारासमोरच काही जवानांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली.

जवानांकडून निदर्शने सुरू झाल्यानंतर ‘आरपीटीएस’च्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. मात्र, त्यांचे काम केवळ प्रशिक्षण देण्याचे होते. त्यामुळे याच्याशी आपला संबंध नसल्याची त्यांनी भूमिका घेतली. अखेर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी जवानांची समजूत काढली. कामावर रुजू होण्याअगोदर गणवेश देण्यात येईल, असे त्यांना आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जवानांनी आंदोलन मागे घेतले. अनेक जवान हे गरीब तसेच शेतकरी कुटुंबांतील आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ही गरीब कुटुंबांतील तरुणांची फसवणूक आहे, असा आरोप या जवानांनी केला. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक किशोर पाडवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दहा हजार अगोदरच केले जमा

नियमानुसार प्रशिक्षणार्थींना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून १० हजार रुपये जमा करावे लागतात. यातील पाच हजार रुपये प्रशिक्षणानंतर परत मिळतात. याशिवाय प्रशिक्षण कालावधीतील पीटी साहित्यदेखील उमेदवारांना स्वत:च खरेदी करावे लागते. इतके पैसे खर्च केल्यावर गणवेशासाठी वेगळे पैसे घेतल्यावरदेखील ते न दिल्याने उमेदवारांना आर्थिक भुर्दंड पडला आहे.

टॅग्स :agitationआंदोलन