शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

गणवेशासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 22:56 IST

Nagpur News प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश न दिल्याचा आरोप लावत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपैसे दिल्यावरदेखील गणवेश न मिळाल्याचा आरोप‘आरपीटीएस’च्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने

 

नागपूर : प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश न दिल्याचा आरोप लावत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच हे आंदोलन करण्यात आले. पैसे घेऊनदेखील गणवेश न दिल्याचा आरोप यावेळी जवानांनी केला. मात्र, अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर सर्वांनी आंदोलन मागे घेतले.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलासाठी तरुणांची निवड केली जाते. त्यांना राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण करणे अनिवार्य असते. नागपुरात ४५ दिवसांचे प्रशिक्षण होते. प्रशिक्षण कालावधीत गणवेशासाठी जवानांकडून अडीच हजार रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी काही जणांना गणवेश देण्यात आला. मात्र, इतरांना प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश मिळाला नाही. यामुळे जवानांमध्ये संताप होता. अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. अखेर प्रशिक्षण संपल्यावरदेखील गणवेश न मिळाल्याने प्रवेशद्वारासमोरच काही जवानांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली.

जवानांकडून निदर्शने सुरू झाल्यानंतर ‘आरपीटीएस’च्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. मात्र, त्यांचे काम केवळ प्रशिक्षण देण्याचे होते. त्यामुळे याच्याशी आपला संबंध नसल्याची त्यांनी भूमिका घेतली. अखेर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी जवानांची समजूत काढली. कामावर रुजू होण्याअगोदर गणवेश देण्यात येईल, असे त्यांना आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जवानांनी आंदोलन मागे घेतले. अनेक जवान हे गरीब तसेच शेतकरी कुटुंबांतील आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ही गरीब कुटुंबांतील तरुणांची फसवणूक आहे, असा आरोप या जवानांनी केला. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक किशोर पाडवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दहा हजार अगोदरच केले जमा

नियमानुसार प्रशिक्षणार्थींना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून १० हजार रुपये जमा करावे लागतात. यातील पाच हजार रुपये प्रशिक्षणानंतर परत मिळतात. याशिवाय प्रशिक्षण कालावधीतील पीटी साहित्यदेखील उमेदवारांना स्वत:च खरेदी करावे लागते. इतके पैसे खर्च केल्यावर गणवेशासाठी वेगळे पैसे घेतल्यावरदेखील ते न दिल्याने उमेदवारांना आर्थिक भुर्दंड पडला आहे.

टॅग्स :agitationआंदोलन