शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांतील मंदीवरुन ‘भामसं’ केंद्राविरोधात आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 13:59 IST

देशातील खासगीकरण बंद करुन ‘नीती’ आयोगाचे पुनर्गठन करण्याची मागणी ‘भामसं’तर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखासगीकरण देशहितविरोधी असल्याची भूमिका ‘नीती’ आयोगाच्या पुनर्गठनाचा आग्रह

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असून उद्योगांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्राची आर्थिक धोरणं सपशेल अपयशी ठरली असून खासगीकरणाचा आग्रह भोवतो आहे. देशातील खासगीकरण बंद करुन ‘नीती’ आयोगाचे पुनर्गठन करण्याची मागणी ‘भामसं’तर्फे करण्यात आली आहे.‘भामसं’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक नुकतीच दिल्ली येथे पार पडली. या बैठकीदरम्यान देशातील आर्थिक संकटांवर सखोल चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी विविध योजना राबविल्या. परंतु याचा फारसा फायदा झालेला नाही. परकीय गुंतवणूकीवर अवलंबून राहण्याच्या भूमिकेमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फटका बसला. आॅटोमोबाईल क्षेत्रात तर प्रचंड मंदी आली आहे. याशिवाय सरकारने विविध क्षेत्रांमध्ये खासगीकरणाला सुरुवात केली आहे. खासगीकरणाचा हा घाट देशहित विरोधीच आहे. यामुळे उत्पादन क्षेत्राचे नुकसान होत आहे. नफ्यामध्ये असणाऱ्या सार्वजनिक आस्थापनांचे खासगीकरण करणे हे तर सरकारचे दिशाहीन धोरण आहे, अशी भूमिका ‘भामसं’तर्फे मांडण्यात आली आहे.‘नीती’ आयोगाकडून धोरण निश्चित करताना विविध ‘ट्रेड युनियन’सह भागभांडवलदारांशी कुठलीही चर्चा करण्यात येत नाही. परंतु परदेशी ‘लिंक’ असलेल्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येते. हे चित्र अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. ‘नीती’ आयोगाचे पुनर्गठन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘भामसं’चे सरचिटणीस विर्जेश उपाध्याय यांनी केले.

‘ऑटोमोबाईल’ क्षेत्राला दिलासा हवासद्यस्थितीत देशातील ‘ऑटोमोबाईल’ क्षेत्र संकटात आहे. यासाठी कर्जाच्या अटी व नियम शिथिल करणे, ‘जीएसटी’ दर घटविणे, ‘ई’ वाहनांसंबंधित असलेला संभ्रम दूर करणे यासारखी पावले सरकारने त्वरित उचलायला हवी. या क्षेत्राला दिलासा देणारे निर्णय त्वरित घ्यायला हवे, अशी मागणी ‘भामसं’तर्फे करण्यात आली आहे.भामसं च्या इतर मागण्यासार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण बंद करावेसरकारने देशात रोजगारनिर्मितीवर भर द्यावाकुठल्याही सुधारणा करताना ‘ट्रेड युनियन्स’सह विविध संघटनांना विश्वासात घ्यावेतंत्रज्ञान आयोगाची स्थापना करावी१९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या परिणामावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी

टॅग्स :Governmentसरकार