शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आगरकरांचा विवेकवाद आजही प्रासंगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:20 IST

समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.

ठळक मुद्देअ.ना.देशपांडे स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकोणविसाव्या व विसाव्या शतकातील भारताच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.अ.ना.देशपांडे स्मृती समितीतर्फे आयोजित अ.ना.देशपांडे व्याख्यानमालेचे यावर्षीचे २६ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य म.पांडे, कार्याध्यक्ष डॉ. वि.स.जोग, कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे उपस्थित होते. हिंदी मोरभवनच्या उत्कर्ष सभागृहात अनादेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हे व्याख्यानसत्र पार पडले.डॉ. लेंडे यांनी भारतीय धर्मसंस्कृती-परंपरांची बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी दृष्टीने केलेली परखड चिकित्सा, त्यांच्यावरील पाश्चात्य विचारकांचा प्रभाव, त्यांची अद्वितीय स्वरूपाची ज्ञानलालसा, अत्यंत विपरीत व कष्टमय परिस्थितीत त्यांनी केसरी व सुधारक वृत्तपत्रातून केलेले समाजप्रबोधन या साऱ्या पैलूंवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्राचार्य पांडे यांनी, आगरकरांच्या जीवनातील इंदूर संस्थानाची भरपूर पगाराची नोकरी नाकारण्याचा प्रसंग तसेच इतर काही प्रसंगांच्या आधारे त्यांची नि:स्पृहवृत्ती, बाणेदारपणा व तत्त्वनिष्ठा यांचे महत्त्व कथन केले. माधव देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. मधुरा देशपांडे यांच्या गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. कृष्णा साकुळकर व संचालन डॉ. दिनेश खुरगे यांनी केले. यावेळी प्रकाश एदलाबादकर, डॉ. अरविंद जोशी, प्रा. प्रमोद सोवनी, माधुरी साकुळकर, डॉ. अजय कुळकर्णी, मुकुंद पाचखेडे आदी उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक