शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आगरकरांचा विवेकवाद आजही प्रासंगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:20 IST

समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.

ठळक मुद्देअ.ना.देशपांडे स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकोणविसाव्या व विसाव्या शतकातील भारताच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.अ.ना.देशपांडे स्मृती समितीतर्फे आयोजित अ.ना.देशपांडे व्याख्यानमालेचे यावर्षीचे २६ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य म.पांडे, कार्याध्यक्ष डॉ. वि.स.जोग, कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे उपस्थित होते. हिंदी मोरभवनच्या उत्कर्ष सभागृहात अनादेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हे व्याख्यानसत्र पार पडले.डॉ. लेंडे यांनी भारतीय धर्मसंस्कृती-परंपरांची बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी दृष्टीने केलेली परखड चिकित्सा, त्यांच्यावरील पाश्चात्य विचारकांचा प्रभाव, त्यांची अद्वितीय स्वरूपाची ज्ञानलालसा, अत्यंत विपरीत व कष्टमय परिस्थितीत त्यांनी केसरी व सुधारक वृत्तपत्रातून केलेले समाजप्रबोधन या साऱ्या पैलूंवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्राचार्य पांडे यांनी, आगरकरांच्या जीवनातील इंदूर संस्थानाची भरपूर पगाराची नोकरी नाकारण्याचा प्रसंग तसेच इतर काही प्रसंगांच्या आधारे त्यांची नि:स्पृहवृत्ती, बाणेदारपणा व तत्त्वनिष्ठा यांचे महत्त्व कथन केले. माधव देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. मधुरा देशपांडे यांच्या गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. कृष्णा साकुळकर व संचालन डॉ. दिनेश खुरगे यांनी केले. यावेळी प्रकाश एदलाबादकर, डॉ. अरविंद जोशी, प्रा. प्रमोद सोवनी, माधुरी साकुळकर, डॉ. अजय कुळकर्णी, मुकुंद पाचखेडे आदी उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक