शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुन्हा ‘तारीख पे तारीख’

By admin | Updated: July 6, 2017 02:27 IST

फौजदारी खटले चालविण्याचा दांडगा अनुभव, तरबेज व निष्णात असलेल्या १२ सरकारी वकिलांचा ३० जूनपासून कार्यकाळ संपल्याने

राहुल अवसरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फौजदारी खटले चालविण्याचा दांडगा अनुभव, तरबेज व निष्णात असलेल्या १२ सरकारी वकिलांचा ३० जूनपासून कार्यकाळ संपल्याने आणि त्यांच्या रिक्त जागांची तूर्त भरपाई न झाल्याने जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या बहुतांश खटल्यांच्या कामकाजावर परिणाम झालेला असून, पुन्हा ‘तारीख पे तारीख’ची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच काहीच दिवसांपूर्वी नियुक्त झालेल्या नवख्या सरकारी वकिलांची अचानक वाढलेल्या कामाच्या बोजामुळे तारांबळ उडालेली आहे. ३० जूनपर्यंत जिल्हा न्यायालयात ३४ सरकारी वकील होते. तूर्त १२ सरकारी वकिलांचा कार्यकाळ संपल्याने, २२ सरकारी वकील सध्या कार्यरत आहेत. २२ सत्र न्यायालये असून, त्यात ६ तदर्थ न्यायालये आहेत. कार्यकाळ संपलेल्या वकिलांमध्ये दीपक कोल्हे, वसंत नरसापूरकर, अजय निकोसे, राजेंद्र मेंढे, गिरीश दुबे, रवींद्र भोयर, राम अनवाणे, अजय लांबट, प्रशांत भांडेकर, कल्पना पांडे, माधुरी मोटघरे आणि सुनीता खोब्रागडे यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांपैकी दीपक कोल्हे, वसंत नरसापूरकर, कल्पना पांडे यांनी चालविलेल्या खून खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. रवींद्र भोयर यांनी देशात गाजलेला अक्कू यादव खून खटला चालविलेला आहे. अपसंपदेच्या प्रकरणात गिरीश दुबे यांनी सरकारची जबरदस्त बाजू मांडल्याने दीपक बजाज यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळल्या गेला आहे. राजेंद्र मेंढे यांनी लखोटिया बंधू खून खटला गाजविला आहे. प्रशांत भांडेकर हे खून खटला चालविण्यात तरबेज आहेत. त्यांनी चालविलेल्या बहुतांश प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. अजय निकोसे यांनी सरकारची खंबीर बाजू मांडून अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे गाजविली आहेत. सुनीता खोब्रागडे आणि माधुरी मोटघरे यांनी महिलांविरुद्ध अत्याचाराचे खटले यशस्वीपणे चालविले आहेत. या सरकारी वकिलांच्या रिक्त जागी अन्य कोणाच्याही नियुक्त्या जरी झाल्या तरी त्यांचा अनुभव लक्षात घेता, त्यांच्या रिक्त जागांची भरपाई अलीकडच्या काळात शक्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कार्यकाळ संपताच या सरकारी वकिलांनी आपले काम थांबविल्याने सुरू असलेल्या खटल्यातील आरोपींना पुढची तारीख देण्यात आलेली आहे. अर्थात सुरू असलेले खटले तूर्त थांबलेले आहेत. जामिनासाठी असलेली प्रकरणे सध्या कार्यरत असलेल्या सरकारी वकिलांकडे सोपविण्यात आलेली असून, प्रत्येकावरील कामाचा बोजा वाढलेला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील समितीने जिल्हा सरकारी वकिलांच्या निवडीसाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यात शंभरावर लोकांची निवड झालेली होती. त्यापैकीच वकिलांच्या तुकड्या-तुकड्यात नियुक्त्या केल्या जात असल्याचे सूत्राकडून कळते. दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांच्याशी बातचित केली असता त्यांनी सांगितले की, बारा सरकारी वकिलांचा कार्यकाळ संपल्याने न्यायालयीन कामकाजावर काहीसा परिणाम झालेला असून लवकरच नवीन वकिलांच्या नियुक्त्यांची यादी न्याय व विधी विभागाकडून येण्याची शक्यता आहे.