शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मृत्यूनंतर प्रशासनाला आली जाग; नवीन बाभुळखेड्यातील जीर्ण घर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 22:20 IST

Nagpur News अनेक वर्षांपासून जीर्ण असलेल्या घराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री घात झाला आणि घराचे छतच कोसळून एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रशासनाला जाग आली.

ठळक मुद्देमृतकाच्या कुटुंबाला मोबदला देण्याची मागणी

नागपूर : अनेक वर्षांपासून जीर्ण असलेल्या घराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री घात झाला आणि घराचे छतच कोसळून एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रशासनाला जाग आली. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन बाभुळखेड्यातील जीर्ण व मोडकळीस आलेले घर पाडले.

नवीन बाभुळखेडा तीन मुंडी झेंडा चौक येथील विद्या रंगारी यांनी केसलवार कुटुंबाला आपले घर भाड्याने दिले होते. जीर्ण झालेले हे घर पावसामुळे १४ जुलै रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक कोसळले. यात भाडेकरू किशोर केसलवार (३९), त्यांच्या पत्नी सीसीली के सलवार (२७), मुलगा गौरव केसलवार (१६) मलब्याखाली दबले. परिसरातील लोकांनी धाव घेऊन तिघांनाही बाहेर काढले. मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी किशाेरला तपासून मृत घोषित केले.

विशेष म्हणजे, नवीन बाभुळखेड्यातील जीर्ण घराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. रंगारी यांच्या घराच्या भिंतीला लागूनच असलेले जीर्ण व मोडकळीस आलेले घर कित्येक वर्षांपासून उभे होते. गुरुवारी घटना घडल्यानंतर प्रशासन शुक्रवारी तत्परता दाखवित मोडकळीस आलेले घर जेसीबीच्या मदतीने पाडले. एकीकडे किशोरच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना, मनपाचे कर्मचारी घर तोडण्यात व्यस्त होते. पडके घर आधीच तोडले असते तर ही घटना घडली नसती, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे होते. मृताचा कुटुंबाला सरकारकडून मोबदला देण्याचीही मागणीही नागरिकांनी केली.

-अतिक्रमणाकडेही द्यावे लक्ष

वंजारी नगर पाणीटाकीपासून ते नवीन बाभुळखेडा वसाहतीकडे येणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. ठाकरे हायस्कूल समोर जवळपास ५० फुटांचा रस्ता पुढे २० फुटांवर आला आहे. त्यातच रात्रीच्या वेळी अनेक जड वाहने रस्त्यावर उभी केली जातात. यामुळे अनुचित घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणेसह रुग्णवाहिकेला पोहोचायला उशीर होतो. याकडेही धंतोली झोनच्या सहायक आयुक्तांनी लक्ष द्यावे, रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, अशीही मागणी आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक