शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2022 19:03 IST

Nagpur News भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली. त्यानंतर अशी यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे आहेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी नागपुरात व्यक्त केले.

ठळक मुद्दे भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता

नागपूर : भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा केली. त्यानंतर अशी यात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे आहेत. त्यांचीही यात्राही लोककल्याणासाठीच आहे. राहुल गांधी ह देखील धर्माचेच काम करीत आहेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी नागपुरात व्यक्त केले.

पटोले म्हणाले, राहुल गांधी यांची यात्रा सुरू झाली तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता सुरू झाली आहे. षडयंत्र आखून काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही विकत घेण्याचे काम भाजप करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री मोदी, शहांचे हस्तक झाले

- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला हवं; पण ते मोदी-शहा म्हणतात तसे ऐकतात. - महाराष्ट्राला लुटून गुजरातकडे पाठवले जात आहे. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहावा यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शरणागती पत्करली आहे. उद्या मुंबई गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको, अशी टीका करीत गेलेली कंपनी महाराष्ट्रात परत यायला पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली. या मुद्द्यावर मुख्यमंत्री हे पंतप्रधान यांच्याशी बोलले. आता पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना किती मान देतात हेही कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले