शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवीयन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
5
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
6
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
7
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
8
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
9
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
10
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
11
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
12
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
13
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
16
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
17
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
18
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
19
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
20
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

सहा वर्षे होऊनही बुटीबोरी कामगार रुग्णालय कागदावरच

By सुमेध वाघमार | Updated: June 10, 2024 17:41 IST

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले.

नागपूर : राज्य कामगार विमा महामंडळाने राज्यात नवीन १८ रुग्णालये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करण्याचा हालचालिंना वेग आला आहे. मात्र सहा वर्षांपूर्वी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात २०० बेडचे अत्याधुनिक कामगार विमा रुग्णालयाचे भूमिपूजन होऊनही अद्यापही हे रुग्णालय कागदावरच आहे. जुनेच प्रस्तावित रुग्णालये अस्तित्वात आले नसताना नवे रुग्णालय हे केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले. यात संबंधित जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून प्रस्तावित १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करून घेण्याकरीता पाठपुरावा करण्याचा सूचना केल्या आहेत. मात्र, २०० बेडच्या रुग्णालयासाठी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील पाच एकर जागा २०१८ मध्येच राज्य कामगार विमा महामंडळाकडे हस्तांतरीत झालीे. १५ जुलै २०१८ मध्ये बांधकामाचे भूमिपूजनही झाले. असे असताना ५० टक्केही बांधकाम झाले नाही. 

कोट्यावधीचा निधी जातो कुठे?

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात जवळपास लाखो कामगार काम करतात. यातील सुमारे ४० हजारांवर हे विमाधारक (ईएसआयसी) योजनेत समाविष्ठ आहे. कामगार व कारखानदार मिळून दर महिन्याला जवळपास कोट्यावधी रुपये कामगार विम्याच्या माध्यमातून शासनाला मिळतो. परंतु कामगारांना सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी बुटीबोरी येथील या इएसआयसी दवाखान्याला मान्यता दिली. बांधकामासाठी १७५ कोटी रुपयेही दिले. परंतु संथ गतीच्या बांधकामामुळे रुग्णालय कधी रुग्णसेवेत सुरू होणार हा प्रश्नच आहे. 

रुग्णांना गाठावे लागते नागपूर 

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात शेकडो कंपन्या आहेत. कंपनीत, रस्त्यावर कुठेनाकुठे अपघात होतात. कुटुंबात कोणी आजारी पडल्यास आणि तो गंभीर स्वरुपाचा असल्यास थेट नागपुरातील सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु या रुग्णालयातील सोयी केवळ नावालाच असल्याने कामगार रुग्ण अडचणीत येतात. उपचारासाठी पैसे भरूनही अद्ययावत उपचार मिळत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. 

आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार

ईएसआयसीचे सब रिजनल ऑफिसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, डिसेंबर २०२५ किंवा २०२६ मध्ये बुटीबोरी येथील रुग्णालयाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या १५ टक्के काम झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर