शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सहा वर्षे होऊनही बुटीबोरी कामगार रुग्णालय कागदावरच

By सुमेध वाघमार | Updated: June 10, 2024 17:41 IST

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले.

नागपूर : राज्य कामगार विमा महामंडळाने राज्यात नवीन १८ रुग्णालये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करण्याचा हालचालिंना वेग आला आहे. मात्र सहा वर्षांपूर्वी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात २०० बेडचे अत्याधुनिक कामगार विमा रुग्णालयाचे भूमिपूजन होऊनही अद्यापही हे रुग्णालय कागदावरच आहे. जुनेच प्रस्तावित रुग्णालये अस्तित्वात आले नसताना नवे रुग्णालय हे केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले. यात संबंधित जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून प्रस्तावित १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करून घेण्याकरीता पाठपुरावा करण्याचा सूचना केल्या आहेत. मात्र, २०० बेडच्या रुग्णालयासाठी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील पाच एकर जागा २०१८ मध्येच राज्य कामगार विमा महामंडळाकडे हस्तांतरीत झालीे. १५ जुलै २०१८ मध्ये बांधकामाचे भूमिपूजनही झाले. असे असताना ५० टक्केही बांधकाम झाले नाही. 

कोट्यावधीचा निधी जातो कुठे?

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात जवळपास लाखो कामगार काम करतात. यातील सुमारे ४० हजारांवर हे विमाधारक (ईएसआयसी) योजनेत समाविष्ठ आहे. कामगार व कारखानदार मिळून दर महिन्याला जवळपास कोट्यावधी रुपये कामगार विम्याच्या माध्यमातून शासनाला मिळतो. परंतु कामगारांना सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी बुटीबोरी येथील या इएसआयसी दवाखान्याला मान्यता दिली. बांधकामासाठी १७५ कोटी रुपयेही दिले. परंतु संथ गतीच्या बांधकामामुळे रुग्णालय कधी रुग्णसेवेत सुरू होणार हा प्रश्नच आहे. 

रुग्णांना गाठावे लागते नागपूर 

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात शेकडो कंपन्या आहेत. कंपनीत, रस्त्यावर कुठेनाकुठे अपघात होतात. कुटुंबात कोणी आजारी पडल्यास आणि तो गंभीर स्वरुपाचा असल्यास थेट नागपुरातील सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु या रुग्णालयातील सोयी केवळ नावालाच असल्याने कामगार रुग्ण अडचणीत येतात. उपचारासाठी पैसे भरूनही अद्ययावत उपचार मिळत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. 

आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार

ईएसआयसीचे सब रिजनल ऑफिसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, डिसेंबर २०२५ किंवा २०२६ मध्ये बुटीबोरी येथील रुग्णालयाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या १५ टक्के काम झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर