शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सहा वर्षे होऊनही बुटीबोरी कामगार रुग्णालय कागदावरच

By सुमेध वाघमार | Updated: June 10, 2024 17:41 IST

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले.

नागपूर : राज्य कामगार विमा महामंडळाने राज्यात नवीन १८ रुग्णालये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करण्याचा हालचालिंना वेग आला आहे. मात्र सहा वर्षांपूर्वी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात २०० बेडचे अत्याधुनिक कामगार विमा रुग्णालयाचे भूमिपूजन होऊनही अद्यापही हे रुग्णालय कागदावरच आहे. जुनेच प्रस्तावित रुग्णालये अस्तित्वात आले नसताना नवे रुग्णालय हे केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले. यात संबंधित जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून प्रस्तावित १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करून घेण्याकरीता पाठपुरावा करण्याचा सूचना केल्या आहेत. मात्र, २०० बेडच्या रुग्णालयासाठी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील पाच एकर जागा २०१८ मध्येच राज्य कामगार विमा महामंडळाकडे हस्तांतरीत झालीे. १५ जुलै २०१८ मध्ये बांधकामाचे भूमिपूजनही झाले. असे असताना ५० टक्केही बांधकाम झाले नाही. 

कोट्यावधीचा निधी जातो कुठे?

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात जवळपास लाखो कामगार काम करतात. यातील सुमारे ४० हजारांवर हे विमाधारक (ईएसआयसी) योजनेत समाविष्ठ आहे. कामगार व कारखानदार मिळून दर महिन्याला जवळपास कोट्यावधी रुपये कामगार विम्याच्या माध्यमातून शासनाला मिळतो. परंतु कामगारांना सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी बुटीबोरी येथील या इएसआयसी दवाखान्याला मान्यता दिली. बांधकामासाठी १७५ कोटी रुपयेही दिले. परंतु संथ गतीच्या बांधकामामुळे रुग्णालय कधी रुग्णसेवेत सुरू होणार हा प्रश्नच आहे. 

रुग्णांना गाठावे लागते नागपूर 

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात शेकडो कंपन्या आहेत. कंपनीत, रस्त्यावर कुठेनाकुठे अपघात होतात. कुटुंबात कोणी आजारी पडल्यास आणि तो गंभीर स्वरुपाचा असल्यास थेट नागपुरातील सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु या रुग्णालयातील सोयी केवळ नावालाच असल्याने कामगार रुग्ण अडचणीत येतात. उपचारासाठी पैसे भरूनही अद्ययावत उपचार मिळत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. 

आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार

ईएसआयसीचे सब रिजनल ऑफिसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, डिसेंबर २०२५ किंवा २०२६ मध्ये बुटीबोरी येथील रुग्णालयाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या १५ टक्के काम झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर