शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षे होऊनही बुटीबोरी कामगार रुग्णालय कागदावरच

By सुमेध वाघमार | Updated: June 10, 2024 17:41 IST

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले.

नागपूर : राज्य कामगार विमा महामंडळाने राज्यात नवीन १८ रुग्णालये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करण्याचा हालचालिंना वेग आला आहे. मात्र सहा वर्षांपूर्वी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात २०० बेडचे अत्याधुनिक कामगार विमा रुग्णालयाचे भूमिपूजन होऊनही अद्यापही हे रुग्णालय कागदावरच आहे. जुनेच प्रस्तावित रुग्णालये अस्तित्वात आले नसताना नवे रुग्णालय हे केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले. यात संबंधित जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून प्रस्तावित १० रुग्णालयांसाठी जमीन संपादित करून घेण्याकरीता पाठपुरावा करण्याचा सूचना केल्या आहेत. मात्र, २०० बेडच्या रुग्णालयासाठी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील पाच एकर जागा २०१८ मध्येच राज्य कामगार विमा महामंडळाकडे हस्तांतरीत झालीे. १५ जुलै २०१८ मध्ये बांधकामाचे भूमिपूजनही झाले. असे असताना ५० टक्केही बांधकाम झाले नाही. 

कोट्यावधीचा निधी जातो कुठे?

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात जवळपास लाखो कामगार काम करतात. यातील सुमारे ४० हजारांवर हे विमाधारक (ईएसआयसी) योजनेत समाविष्ठ आहे. कामगार व कारखानदार मिळून दर महिन्याला जवळपास कोट्यावधी रुपये कामगार विम्याच्या माध्यमातून शासनाला मिळतो. परंतु कामगारांना सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी बुटीबोरी येथील या इएसआयसी दवाखान्याला मान्यता दिली. बांधकामासाठी १७५ कोटी रुपयेही दिले. परंतु संथ गतीच्या बांधकामामुळे रुग्णालय कधी रुग्णसेवेत सुरू होणार हा प्रश्नच आहे. 

रुग्णांना गाठावे लागते नागपूर 

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात शेकडो कंपन्या आहेत. कंपनीत, रस्त्यावर कुठेनाकुठे अपघात होतात. कुटुंबात कोणी आजारी पडल्यास आणि तो गंभीर स्वरुपाचा असल्यास थेट नागपुरातील सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु या रुग्णालयातील सोयी केवळ नावालाच असल्याने कामगार रुग्ण अडचणीत येतात. उपचारासाठी पैसे भरूनही अद्ययावत उपचार मिळत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. 

आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार

ईएसआयसीचे सब रिजनल ऑफिसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, डिसेंबर २०२५ किंवा २०२६ मध्ये बुटीबोरी येथील रुग्णालयाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या १५ टक्के काम झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर