शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शाळा साेडून शिक्षक उतरले रस्त्यावर; कंत्राटी शिक्षक नियुक्ती आदेशाला तीव्र विराेध

By निशांत वानखेडे | Updated: September 25, 2024 17:13 IST

Nagpur : राज्यभरातील हजारो प्राथमिक शिक्षक रजेवर

नागपूर : आधी शिक्षकांची पदे कमी करणे आणि नंतर कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षक व बेराेजगारांची नियुक्ती करण्याच्या आदेशाने राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र असंताेष पसरला आहे. हे दाेन्ही निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी टप्प्या-टप्प्याने आंदाेलन केल्यानंतर बुधवार २५ सप्टेंबरला राज्यातील हजाराे प्राथमिक शिक्षक काम बंद करून सामूहिक रजेवर गेले.

नागपुरात विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह हजाराे शिक्षकांनी बुधवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चाैकापर्यंत आक्राेश माेर्चा काढला. या ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी लीलाधर ठाकरे, धनराज बाेडे, तुषार अंजनकर, राजकुमार वैद्य, प्रवीण फाळके, अनिल गाेतमारे, लीलाधर साेनवने, प्रमाेद लाेन्हारे, आशुताेष चाैधरी, उमाकांत अंजनकर, शरद भांडारकर, परसराम पिल्लेवान, परसराम गाेंडाणे, शुद्धाेधन साेनटक्के, राम धाेटे, जुगलकिशाेर बाेरकर, मुरलीधर काळमेघ, मिलिंद वानखेडे, विलास भाेतमांगे, याेगेश कडू आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले.

राज्य शासनाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा शासन निर्णय काढून शाळांतील शिक्षकांची पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाने २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेतील दोन शिक्षकांपैकी एक पद बंद करून त्याठिकाणी कंत्राटी स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षक किंवा बेरोजगाराची करार पद्धतीने नियुक्ती होणार आहे. शिक्षक संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २३ सप्टेंबर रोजी ५ सेप्टेंबरच आदेश मागे घेऊन १० पेक्षा कमी पटसंख्येच्या बाबतीत कंत्राटी बेरोजगार नियुक्ती कायम ठेवण्याची दुरुस्ती करणारा आदेश काढला. मात्र राज्यातील कोणतीच शाळा बंद करू नये म्हणून केलेली दुरुस्ती अमान्य करीत दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शाळा सुरु होऊन तीन महिने झाले असताना विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. ज्याठिकाणी गणवेश मिळाले ते मापाचे नाहीत, गणवेशाचा कापड अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. अनेक शाळांत पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. शाळांमध्ये डेस्क-बेंच, आसनपट्ट्या नाहीत, त्या उपलब्ध कराव्या. शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्ती करावे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिक्षक संघटना आंदोलनावर ठाम राहतील, असा इशारा शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष केशव जाधव आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिला.

टॅग्स :nagpurनागपूर