शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे होऊनही १ नंबरला ग्राहक मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 20:46 IST

परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये चार लाख रुपयांचा ‘१’ या फॅन्सी नंबरला अद्यापही ग्राहक मिळालेला नाही. मोटारसायकलमध्ये केवळ दोन ग्राहकांनी ५० हजार रुपयांचा हा क्रमांक घेतला. फॅन्सी नंबरमधून मिळणारा महसूलही कमी झाल्याने परिवहन विभागाने पुन्हा यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपरिवहन विभाग : फॅन्सी नंबरची क्रेझ झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये चार लाख रुपयांचा ‘१’ या फॅन्सी नंबरला अद्यापही ग्राहक मिळालेला नाही. मोटारसायकलमध्ये केवळ दोन ग्राहकांनी ५० हजार रुपयांचा हा क्रमांक घेतला. फॅन्सी नंबरमधून मिळणारा महसूलही कमी झाल्याने परिवहन विभागाने पुन्हा यावर विचार करण्याची वेळ आली आहे.व्हीआयपी स्टेटस् टिकविण्यासाठी फॅन्सी नंबरांसाठी अतिरिक्त पैसे मोजण्यास वाहनधारक पूर्वी नेहमीच तयार असायचे. अनेकदा फॅन्सी नंबरासाठी एकापेक्षा जास्त अर्ज यायचे. अशावेळी आरटीओ कार्यालय कचाट्यात सापडायचे. मध्यस्थी करून किंवा बोली लावण्याचे प्रकार व्हायचे. यातून मार्ग काढण्यासाठी परिवहन विभागाने २०१३ मध्ये फॅन्सी नंबरच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये ‘१’ नंबर हा चार लाख रुपयांचा तर इतर जिल्हांमध्ये याच नंबरला तीन लाख रुपये शुल्क लावण्यात आले. फॅन्सी नंबर महागल्यापासून वाहनधारक याकडे पाठ दाखवीत आहेत. काही वाहनधारक महागड्या फॅन्सी नंबराच्या भानगडीत न पडता, सामान्य नंबरांमधूनच चांगला नंबर मिळविण्यासाठी धडपडतानाचे चित्र आहे.१९ सिरीज बदलल्या, मात्र ग्राहकाचा पत्ता नाहीचारचाकी वाहनांमध्ये पूर्वी ‘१’ नंबर हा एक लाख रुपयात मिळायचा. वाहनाची नवीन सिरीज सुरू होताच अनेक वाहनधारक हा नंबर मिळविण्यासाठी प्रयत्न करायचे. परंतु हा नंबर चार लाख रुपयांचा होताच व आतापर्यंत १९ सिरीज बदलल्या तरी ग्राहकाचा पत्ता नाही.दीड लाखाच्या नंबराप्रतिही उदासीनता९, ९९, ७८६, ९९९ आणि ९९९९ या नंबरांची किंमत पूर्वी ५० हजार रुपये होती, नंतर त्यात वाढ करून दीड लाख रुपये करण्यात आली. सध्या या शुल्कामध्ये सात फॅन्सी नंबर उपलब्ध असला तरी एकही नंबर गेलेला नाही. त्याखालोखाल ७० हजार व ५० हजार रुपयांमध्ये कमी आकर्षक नंबर असल्याने पाहिजे तो प्रतिसाद मिळन नसल्याचे चित्र आहे. मात्र, १५ हजाराच्या फॅन्सी नंबरांना बऱ्यापैकी ग्राहक मिळत आहेत.महसूलही घसरलापूर्वी फॅन्सी नंबरचे शुल्क कमी असल्याने साधारण सर्वच फॅन्सी नंबरला ग्राहक मिळायचे. दोन कोटींवर महसूल प्राप्त व्हायचा. परंतु २०१३ पासून शुल्कात तीनपट वाढ झाल्याने त्यातुलनेत महसूल वाढला नाही. उलट कमी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एक कोटी सहा लाख २१ हजार एवढाच महसूल मिळाला आहे.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर