शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

पूर्व नंतर मुख्यमंत्र्यांचे पश्चिम विदर्भावर लक्ष; ‘रामगिरी’वर राजकीय हालचाली वाढल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:04 IST

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला अजून वर्ष-दीड वर्षांचा कालावधी असला तरी, विदर्भाचा गड कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे सक्रिय झाले आहेत.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील आमदार व नगराध्यक्षांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला अजून वर्ष-दीड वर्षांचा कालावधी असला तरी, विदर्भाचा गड कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नागपुरातील ‘रामगिरी’ येथे पूर्व विदर्भातील आमदार व नगर परिषदेच्या अध्यक्षांची बैठक घेतल्यानंतर, रविवारी पश्चिम विदर्भाची बैठक घेतली. या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी नगर परिषदेच्या विकासा कामांचा आढावा घेत आपल्या लोकप्रतिनिधींना सतर्क केले. जनतेच्या संपर्कात राहून कामे करा, असा सल्ला द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. या बैठका विकास कामांना गती देण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी, विदर्भात आपला राजकीय पाया अधिक भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भाने भरभरून भाजपाला साथ दिली. ही साथ अशीच कायम राहावी, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात भंडारा-गोंदिया या दोन जिल्ह्यांची विशेष बैठक रामगिरीवर घेऊन नाना पटोलेंची उणीव भासू दिली जाणार नाही, असे संकेत दिले.यानंतर शनिवारी पूर्व विदर्भातील व रविवारी रात्री पश्चिम विदर्भातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.पश्चिम विदर्भातील बैठकीला नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह आ. सुनील देशमुख, अनिल बोंडे, हरीश पिंपळे, अशोक उईके, आकाश फुंडकर, राजेंद्र पाटणी, प्रकाश भारसाकडे, चैनसुख संचेती, राजू तोडसाम यांच्यासह जवळपास सर्वच आमदार व नगर परिषदांचे अध्यक्ष उपस्थित होते.दोन तास चाललेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदार व नगर परिषदेच्या अध्यक्षांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बैठकीत मुख्यमंत्री नगराध्यक्षांना उद्देशून म्हणाले, जनतेने मोठ्या प्रमाणात भाजपाचे नगराध्यक्ष निवडून दिले आहेत.त्यामुळे आता प्रत्येक नगर परिषदेत स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन ही आपली जबाबदारी आहे. जनतेच्या अपेक्षांवर आपल्याला खरे उतरावे लागले. गरज वाटेल तेथे मला मदत मागा, पण पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभार करा, आपले शहर सुंदर बनवा, असे आवाहन त्यांनी केले.

पैसे खर्च न करणाऱ्या नगर परिषदांवर नाराजीबैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाने पैसे देऊनही ते खर्च करू न शकलेल्या नगर परिषदांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एकीकडे पैसे मिळत नाही म्हणून ओरड होते तर दुसरीकडे काही नगर परिषदांनी दिलेला निधीही खर्च केला नाही. हे पैसे मार्चपूर्वी खर्च झाले नाही तर शासनाकडे परत येतील व पुन्हा या मुद्यावरून शासनाच्या नावाने ओरड सुरू होईल. त्यामुळे उपलब्ध असलेला निधी त्वरित खर्च करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस