शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जीव गेल्यानंतरच प्रशासनाला का येते जाग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:52 IST

इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. याचा अर्थ प्रशासनाला जीव गेल्यानंतरच जाग येते का, असा प्रश्न नागपूरकरांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील उंचवट्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण : मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्यानंतर मनपाने केली रस्त्याची दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. याचा अर्थ प्रशासनाला जीव गेल्यानंतरच जाग येते का, असा प्रश्न नागपूरकरांनी उपस्थित केला आहे.घरातील चालतीफिरती आणि करती व्यक्ती अशी अचानक निघून गेल्याने त्या कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे. माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल त्यांच्या मुलीने प्रशासनाला केला आहे.आकाशवाणी चौक ते जीपीओ चौकादरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही झाडे कापण्यात आली होती. रस्ता समतोल न करता, झाडाचे बुंधे तसेच ठेवण्यात आले होते.त्यामुळे झाडाचा कापलेला भाग उंचवट्यासारखा झाला होता. या रस्त्यावर जवळपास तीन ठिकाणी हा प्रकार दिसून आला. ४ मार्चला इंद्रप्रस्थनगर येथील रहिवासी साधना पुराडभड या आपल्या पतीसोबत रात्री ९ वाजताच्या सुमारास दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून येत होत्या. त्यांची गाडी या उंचवट्यावरून गेली. गाडीचा बॅलेंस बिघडल्याने दोघेही पडले. यात साधना यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना लागलीच शुअरटेक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आठवडाभर त्यांच्यावर उपचार करण्यात आला. परंतु त्या प्रतिसाद देऊ शकल्या नाही आणि रविवार, ११ मार्चला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांची मुलगी मधुरा पुराडभट यांनी आईच्या मृत्यूला कारण ठरलेल्या त्या रस्त्याचे फोटो घेतले. हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पोस्ट केले. त्यांना आईसोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्याच्या दोन दिवसानंतर त्यांनी मनपाचे आयुक्त अश्विन मुदगल यांची भेट घेऊन, हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मला ते फोटो पाठविले आहे असे सांगून रस्त्याचे काम लवकरच होईल, असे आश्वासन मुदगल यांनी दिले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आज तो उंचवटा समतोल करण्यात आला. पण पूर्वीच मनपा प्रशासनाने याची दखल घेतली असती, तर आज साधना यांचा जीव गेला नसता, पुराडभट कुटुंबावर दु:खाचे सावट कोसळले नसते.यामागे दोष कुणाचा ?दोन वर्षांपासून हा उंचवटा रस्त्यावर आहे. मनपाच्या मुख्यालयाजवळून अगदी १०० मीटरच्या आत, जिल्हा सत्र न्यायालयाच्या अगदी समोर हे अपघातप्रवण स्थळ होते. मनपाच्या अधिकाऱ्यांना ते कधीच दिसले नाही. त्याचबरोबर याच ठिकाणी अनेकांसोबत अशा घटना घडल्या. परंतु त्यांनी कधी तक्रार केली नाही. खुद्द मनपा आयुक्तांनी आजपर्यंत तक्रारच आली नसल्याचे सांगितले. याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर, मनपाने त्याची दखल घेतली. रस्ता आज समतोल केला. पण त्याचा फायदा काय? आमच्या घरचा तर जीव गेला. किमान यात दोषी कोण? याचा शोध प्रशासनाने घ्यावा.- मधुरा पुराडभट, मृत साधना यांची मुलगी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर