शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

सहप्रवाशाच्या मृत्यूनंतर ‘त्यांनी’ही सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:45 IST

मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांनीही प्राण सोडला. एकाच प्रवासातील दोघांचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेने या कोचमधील प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली.

ठळक मुद्देमुंबई-हावडा मेलमधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांनीही प्राण सोडला. एकाच प्रवासातील दोघांचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेने या कोचमधील प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली.चिन्मय दास (७३) असे एका मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. दास यांना कॅन्सर होता. मुंबईत उपचार घेतल्यानंतर ते पत्नी आणि जावयासह हावडाला जात होते. दुसरा मृत ४० वर्षे वयोगटातील आहे. दोघेही १२८०९ मुंबई-हावडा मेलच्या एस ३ कोचने प्रवास करीत होते. कोचमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मृत आजारी होता. सकाळी तो शौचालयाच्या दिशेने गेला. त्याला उलटी झाली आणि शौचालयाच्या गेटसमोरच तो पडला. इतर प्रवाशांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. इकडे प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती दास यांच्या कानावर पडली. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचण्यापूर्वीच लोहमार्ग पोलीस, आरपीएफ जवान प्लॅटफॉर्मवर पोहोचले. पंचनामा करीत असताना दास यांची प्रकृती आणखीनच ढासळली. मृत प्रवाशाला गाडीखाली उतरविण्यात आले. दास यांनाही खाली उतरविण्यात आले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपास हवालदार संजय पटले करीत आहेत.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीDeathमृत्यू