शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

चार महिने काम रखडल्यानंतरही वेळेत पूर्ण होणार उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:54 IST

मानकापूर आरओबीचे बांधकाम वेळेपूर्वीच पूर्ण करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रेसिडेन्सी रोड उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचा दावा करीत आहे. पण हे बांधकाम चार महिने रखडले होते.

ठळक मुद्देएनएचएआयचा दावा : पावसामुळे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर आरओबीचे बांधकाम वेळेपूर्वीच पूर्ण करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रेसिडेन्सी रोड उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचा दावा करीत आहे. पण हे बांधकाम चार महिने रखडले होते.उड्डाणपूल नासुप्र कार्यालयासमोरून सुरू होऊन छावणी चौक ते जुना काटोल नाका चौक आणि पागलखाना चौकापर्यंत तयार करण्यात येत आहे. एनएचएआयच्या सूत्रांनुसार पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. छावणी चौकाजवळ आणि पागलखाना चौकापर्यंत गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे मानकापूर स्टेडियमसमोर पुलाच्या उतार भागाचे काम वेगात आहे. पण नासुप्रसमोर आणि सदर मुख्य रस्त्याच्या कामाची गती संथ आहे. सदर भागात पाण्याची पाईपलाईन व युटिलिटी शिफ्टिंग आणि डायव्हर्शन न मिळाल्यामुळे उड्डाणपुलाचे काम चार महिन्यांपासून रखडले आहे. सदर मुख्य रस्त्यावर पाईपलाईन शोधण्यात एनएचएआयला दीड महिना लागला.पावसामुळे बंद असते बांधकाममोठ्या स्ट्रक्चर्सच्या उंच भागात सुरू असलेले काम पावसामुळे थांबवावे लागते. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे काम झाले नाही. याशिवाय शहराच्या व्यस्त भागात बांधकाम सुरू असल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. कामगारांना पिलरवर अनेक ठिकाणी वेल्डिंग करावी लागते. पण पावसामुळे काम थांबवावे लागते.प्रयत्न सुरू आहेतअनेक कारणांमुळे बांधकाम चार महिने रखडले. सध्या पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. पिलरचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. सेगमेंट कास्टिंग प्रगतीवर आहे. पागलखाना चौकात ४५ मीटर लांब स्टील गर्डरची लॉन्चिंग करण्यात आली आहे. काटोल रोडवर सहा स्पॅन पूर्ण झाले आहेत. मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.अभिजित जिचकार, प्रकल्प संचालक, एनएचएआय.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गnagpurनागपूर