शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेजारी महिलेवर हल्ला केल्यानंतर बदनामीच्या भीतीने 'त्याने' घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 21:02 IST

Nagpur News घरालगतच्या महिलेवर चाकूने हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने सोमवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतशिवारात शोध घेत असलेल्या मुलासमोरच विष प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देजवळिक साधण्याचा केला होता प्रयत्न

नागपूर : घरालगतच्या महिलेवर चाकूने हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने सोमवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतशिवारात शोध घेत असलेल्या मुलासमोरच विष प्राशन करून आत्महत्या केली. भारत चेतू अंडेलकर (४७, रा. दिघोरा, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारत मागील काही दिवसांपासून घरालगतच्या एका महिलेशी जवळीक करण्याचा प्रयत्न करीत होता. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भारतने रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्या महिलेवर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी व परिसरातील नागरिकांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अशातच सकाळी ७ वाजताच्या सुमारास भारत हा अड्याळ शिवारातील चुलत भावाच्या शेतातील गोठ्यात लपून बसला असल्याची माहिती त्याच्या मुलाला मिळाली. त्यामुळे मुलगा व त्याच्या मित्रांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मुलाला बघताच भारत तेथून पळत सुटला. मुलगा समजविण्याचा प्रयत्न करीत असतानाच या घटनेमुळे नातेवाईक काय म्हणतील? आता जगून काय फायदा, असे सांगत भारतने खिशातून मिरचीवरील फवारणीचे विषारी औषध काढत प्राशन केले. पोलीस पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत भारतला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले.

अपर पोलीस अधीक्षक राहुल माकनीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार महेश भोरटेकर हेही लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भारतच्या मुलाशी संवाद साधला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. तपास उपनिरीक्षक प्रकाश चंगोले करीत आहे.

महिलेची प्रकृती धोक्याबाहेरहल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला रविवारी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जखमीच्या पतीने पोलीसांना दिली. 

पहिल्या पत्नीवरही केला होता हल्लाआरोपी भारत याने १९९३ मध्ये पहिल्या पत्नीवर सुध्दा अशाच प्रकारे चाकुने हल्ला करीत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती आरोपीच्या नातेवाईकांनी दिली. याघटनेनंतर भारतला सोडून तिने दुसरे लग्न केले होते. त्यानंतर भारतनेही दुसरे लग्न केले होते.

टॅग्स :Deathमृत्यू