शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Air India plane crash; अखेर दीपक यांची सरप्राईज भेट झालीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:49 IST

शनिवारी आईचा वाढदिवस असल्याने तिला सरप्राईज भेट देण्याचा मानस कॅप्टन दीपक साठे यांनी बाळगला होता. दुबईतून एअर इंडियाचे विमान घेऊन ते शुक्रवारी भारतात पोहचले पण कोझिकोडे येथील करीपूर विमानतळावर त्यांचे विमान क्रॅश झाले.

ठळक मुद्देआईच्या वाढदिवसाला विमान अपघातात गमावला जीवसाठे कुटुंबीयात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११ मार्चपासून आईवडिलांची भेट झाली नव्हती. शनिवारी आईचा वाढदिवस असल्याने तिला सरप्राईज भेट देण्याचा मानस कॅप्टन दीपक साठे यांनी बाळगला होता. दुबईतून एअर इंडियाचे विमान घेऊन ते शुक्रवारी भारतात पोहचले पण कोझिकोडे येथील करीपूर विमानतळावर त्यांचे विमान क्रॅश झाले. यात दीपक साठे यांचे निधन झाले. या दुर्दैवी अपघाताने दीपक साठे यांची आईसोबत अखेरची सरप्राईज भेट होऊ शकली नाही.

भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर कॅप्टन दीपक साठे एअर इंडियात वैमानिक म्हणून कार्यरत होते. कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईतून परत आणणाऱ्या विमानाचे सारथ्य त्यांच्याकडे होते. मूळचे नागपूरचे असलेले दीपक साठे यांचे वडील वसंत साठे हे भारतीय सेनेत कर्नल होते. टिळकनगर व भरतनगर येथे त्यांचे वास्तव्य अजूनही आहे. वसंत साठे यांचा मोठा मुलगा विकास हासुद्धा भारतीय सेनेत होता. त्यांचेसुद्धा अपघातीच निधन झाले. वडील वसंत साठे हे सेनेत जेथे जेथे वास्तव्यास होते तेथे तेथे दीपक यांचे शिक्षण झाले. दीपक यांनी एनडीए केल्यानंतर भारतीय वायुसेनेत रुजू झाले. त्यांनी सोअर्ड ऑफ ऑनर यासह भारतीय वायुसेनेची सर्व पदके मिळविली होती.नागपुरात दीपक यांचे चुलत भाऊ सुनील साठे वास्तव्यास असतात. दीपक यांच्या मोठ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर त्यांनी ११ मार्चला नागपुरात एक पार्टी ठेवली होती. तेव्हा आई नीला व वडील वसंत साठे यांची अखेरची भेट झाली. लॉकडाऊनमुळे त्यांनाही जाणे शक्य झाले नाही. शनिवारी त्यांच्या आईचा ८३ वा वाढदिवस होता. तिला सरप्राईज भेट द्यायची दीपक यांची इच्छा होती. पण विमान अपघातात त्यांचा घात झाला.देवाने तारले कुणाला आणि मारले कुणाला८३ वर्षीय नीला साठे मुलाच्या दुर्दैवी निधनामुळे हळव्या झाल्या होत्या. मुलाबद्दल गौरवोद्गार काढताना त्या म्हणाल्या देव तारी त्याला कोण मारी... पण माझ्या मुलाने १७० लोकांचे प्राण वाचविले. या अपघातात देवाने तारले कुणाला आणि मारले कुणाला. परमेश्वरापुढे डोकं टेकविण्याशिवाय काहीच बोलू शकत नाही. आमचा मुलगा देशासाठी शहीद झाला आहे. मुलगा गेल्याचे दु:ख असलेतरी त्याने अनेकांचे प्राण वाचविले याचा अभिमान आहे.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया