शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

४८० दिवसाच्या तपानंतर सर्वेश्वरी झाल्या तपेश्वरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 20:23 IST

त्याग आणि तपाच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा प्रयत्न साधूसंतांनी सातत्याने केला आहे. अत्याधिक कठीण परिस्थितीतही ही कठोर साधना करताना ते ध्येयप्राप्तीपासून कधी विचलित झाले नाही. असेच कठीण तप नागपूरच्या अमरस्वरून कुटुंबात जन्मलेल्या साध्वी सर्वेश्वरीयशा श्रीजी म.सा. यांनी केला आहे. श्री गुणरत्न संवत्सर महातपांतर्गत साध्वीजींनी ४८० दिवस अन्न ग्रहण न करता ईश्वर भक्तीत स्वत:ला लीन केले. श्रद्धाळूंचे मार्गदर्शन केले व सर्व अडथळे पार करीत हे महातप पूर्ण केले.

ठळक मुद्देसाध्वीजींचा गुजरातमध्ये पारणा महोत्सवनागपूरच्या अमरस्वरून कुटुंबात जन्म

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्याग आणि तपाच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा प्रयत्न साधूसंतांनी सातत्याने केला आहे. अत्याधिक कठीण परिस्थितीतही ही कठोर साधना करताना ते ध्येयप्राप्तीपासून कधी विचलित झाले नाही. असेच कठीण तप नागपूरच्या अमरस्वरून कुटुंबात जन्मलेल्या साध्वी सर्वेश्वरीयशा श्रीजी म.सा. यांनी केला आहे. श्री गुणरत्न संवत्सर महातपांतर्गत साध्वीजींनी ४८० दिवस अन्न ग्रहण न करता ईश्वर भक्तीत स्वत:ला लीन केले. श्रद्धाळूंचे मार्गदर्शन केले व सर्व अडथळे पार करीत हे महातप पूर्ण केले.येत्या १५ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या पालिताणातील चेन्नई तलेटी येथे साध्वीजींच्या तपश्चर्येच्या अनुमोदनार्थ भव्य पारणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी सकल जैन समाजाचे २००० साधूसंत व हजारो श्रद्धाळू पोहचणार आहेत. जगात नागपूर आणि विदर्भाचाही गौरव वाढविणाऱ्या साध्वीजींच्या पारणा महोत्सवात सहभागी होण्यासाठी नागपुरातूनही शेकडो श्रद्धाळू गुजरातला रवाना होत आहेत. साध्वीजींचे कौटुंबिक भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनीष मेहता यांनी सांगितले, २५०० वर्षाच्या इतिहासात दोन किंवा तीन वेळाच कठीण तप करण्यात आल्याचे मानले जाते. याच महत्त्वामुळे देशासह विदेशातूनही भाविक या पारणा महोत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. ही कठोर साधना पूर्ण केल्यामुळे श्रद्धाळूंकडून साध्वी सर्वेश्वरीयशा श्रीजी म.सा. यांना तपेश्वरी असे संबोधले जात आहे. १४ व १५ नोव्हेंबरला पालिताणा येथे हे भव्य आयोजन होत आहे.१४ नोव्हेंबरला गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रूपाणी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मनसुखभाई मंडविया, श्री श्री तुलसी महाराज आदी कार्यक्रमात उपस्थित राहतील. याशिवाय अनेक गणमान्य व्यक्तीही या पारणा महोत्सवाचे साक्षी ठरणार आहेत.यापूर्वीही केली होती तपश्चर्यामनीष मेहता यांनी सांगितले, १ मे १९७० ला जन्मलेल्या साध्वीजींनी २८ जानेवारी २००१ मध्ये संन्यास ग्रहण केला. सहा वर्षापूर्वी त्यांनी बंगळूरु येथे १११ दिवस आणि तीन वर्षापूर्वी मुंबईमध्ये ८१ दिवसांची तपश्चर्या केली होती. यावेळी ४८० दिवसाचा श्री गुणरत्न संवत्सर महातप त्यांनी २४ जुलै २०१७ पासून सुरू केला होता. आचार्यश्री राजयशसुरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेतून साध्वीजींनी गुणरत्न संवत्सर महातप पूर्ण केला. त्या साध्वीवयी वाचंयमा श्रीजी म. सा. व साध्वीवयी दिव्ययशा श्रीजी म. सा. यांच्या शिष्या आहेत.असे होईल आयोजनपालिताणा येथे १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता भक्तामर पाठ होईल. ६.३० वाजता तपस्वीचा वरघोडा, ७.४५ वाजता नवकारसी, ९ वाजता जालोरी भवन येथे अनुमोदन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता स्वामी वात्सल्य, २.३० वाजता सांझी व मेहंदी, सायंकाळी ४.४५ वाजता चौविहार व सायंकाळी ७ वाजता महापूजा दर्शन होईल. यानंतर साध्वीजींच्या मातोश्री स्वरूपाबेन अमरचंदभाई मेहता यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त मातृवंदना कार्यक्रम ७.३० वाजता होईल. दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी ६ वाजता भक्तामर पाठ व त्यानंतर मंगल कल्याण पूजेसह पारणा विधीला सुरुवात होईल. दुपारी १२.३० वाजता स्वामी वात्सल्य कार्यक्रम होईल. यावेळी साध्वीजींच्या कुटुंबातील नीता-मनीष मेहता, रजनी-नीलेश मेहता, दीप्तीबेन, भूविश, देवांश, देवांशी, भाग्यांशी, जिनांशी उपस्थित राहतील. विशेष म्हणजे यापूर्वी २७ आॅक्टोबर २०१८ ला वर्धमाननगरच्या हार्दिक लॉन येथे अनुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व यामध्ये आचार्यश्री देवेंद्रसागरजी महाराज, आचार्यश्री गुप्तीनंदीजी गुरुदेव, आचार्यश्री जिनपीयूष सागरजी महाराज आणि समस्त साध्वीवृंद सहभागी झाला होता.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMeditationसाधना