शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

१५ महिन्यानंतर ‘सौदी’तून परतली नागपुरातील रुख्साना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 10:49 IST

नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख रुपयात सौदी अरेबिया येथे विकण्यात आलेली महिला १५ महिन्यानंतर आपल्या घरी परतली. सक्करदरा पोलिसांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले.

ठळक मुद्देदोन लाख रुपयात विकले होते कामाऐवजी मिळाली गुलामी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख रुपयात सौदी अरेबिया येथे विकण्यात आलेली महिला १५ महिन्यानंतर आपल्या घरी परतली. सक्करदरा पोलिसांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले. रुख्साना बेगम सलमान खान (३२) असे पीडित महिलेचे नाव असून ती ताजाबाद येथील रहिवासी आहे.रुख्साना यांना शमा बेगम आणि हाजी साहब नावाच्या व्यक्तीने खाडी देशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी सईन आणि मुंबईतील मुस्तफा नावाच्या साथीदाराच्या मदतीने तिला आपल्या जाळ्यात अडकविले. सप्टेंबर २०१६ मध्ये तिला मुंबईला पाठवले. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दुबईला पाठवण्यात आले. दुबईवरून तिला सौदी अरबला पाठवण्यात आले. तिथे एका शेखच्या घरी ती मोलकरणीसारखी राहू लागली. रुख्साना यांच्यानुसार सुरुवातीला शेख कुटुंबाने तिच्यासोबत सामान्य व्यवहार केला. परंतु काही दिवसातच त्यांचा व्यवहार बदलला. ते तिला त्रास देऊ लागले. तिला पोटभर जेवण दिले जात नव्हते. सातत्याने काम करायला लावायचे. मारहाण करायचे. एखाद्या गुलामासारखी वागणूक दिली जात होती. रुख्साना हिने जेव्हा भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिला दोन लाख रुपयात खरेदी केल्याचे सांगण्यात आले. दोन लाख रुपये परत केल्यावरच ती भारतात जाऊ शकेल, असेही सांगितले. रुख्सानाने आपल्या बहिणीला आपबिती सांगितली. तिची बहीण कनिजाने ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, सविता पांडे आणि सुनिता ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या मदतीने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जून २०१७ मध्ये पोलिसांनी मानव तस्करीचा गुन्हा दाखल करून शमा बेगम आणि हाजी साहब याला अटक केली.गुन्हा दाखल केल्यानंतरही रुख्सानाला घरी परत येता आले नाही. सौदी अरब येथील प्रकरण असल्याने पोलिसांनी विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. विदेश मंत्रालयाकडून घरी परत आणण्यास उशीर झाला. भारतात परत येण्यासाठी रुख्सानाला विमानाच्या भाड्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. इतक्या रकमेची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. पोलिसांनी शेख कुटुंबावर दबाब टाकला. मानव तस्करीच्या प्रकरणात कारवाई होण्याच्या भीतीने शेख कुटुंब रुख्सानाला नागपूरला परत पाठवण्याची व्यवस्था करण्यास तयार झाले. रुख्सानाला वेतनाच्या रूपात मिळणाऱ्या रकमेतून तिला मुंबईला पाठवले. मुंबईवरून ती नागपूरला परत आली. सक्करदरा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी पीएसआय डी. एम. राठोड यांनी तिचे बयान नोंदवून घेतले. यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.मुलांच्या भविष्यासाठी केले काम१५ महिन्यानंतर आपल्या मुलांना व कुटुंबीयांना पाहून रुख्सानाचे डोळे भरून आले. तिचा पती मजुरी करतो, तीन मुलं आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी ती खाडी देशात जाऊन काम करण्यास तयार झाली होती. तिला शेख परिवार अतिशय श्रीमंत असल्याचे माहीत होते. परंतु तिथे तिला दोनवेळचे जेवणही मिळेनासे झाले होते.

टॅग्स :Crimeगुन्हा