शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

१३ महिन्यानंतर गवसला बिसेनसिंग

By admin | Updated: April 18, 2016 05:29 IST

देशभरात खळबळ उडवून देणारे ‘जेल ब्रेक’ प्रकरण खतरनाक गुन्हेगार बिसेनसिंग उईकेच्या बायको-मुलाच्या विरहातून घडल्याचे

नरेश डोंगरे ल्ल नागपूरदेशभरात खळबळ उडवून देणारे ‘जेल ब्रेक’ प्रकरण खतरनाक गुन्हेगार बिसेनसिंग उईकेच्या बायको-मुलाच्या विरहातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या विरहामुळे अस्वस्थ झालेला बिसेन कारागृह फोडून पळून गेला. त्या बायको-मुलाचा तब्बल १३ महिने शोध घेऊनही ते त्याला सापडले नाही. पोलिसांनी मात्र बिसेनला शोधून काढले. आता तो पुन्हा कारागृहात डांबला जाईल. एखाद्या सिनेमाची स्क्रीप्ट शोभावी अशी ही माहिती बिसेनच्या अटकेनंतर पुढे आली. खतरनाक राजा गौस टोळीचा सदस्य असलेल्या बिसेनला पोलिसांनी मोक्काच्या आरोपात कारागृहात डांबले होते. त्यावेळी त्याची पत्नी गर्भवती होती. काही दिवसातच पत्नीने एका मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी कळल्यानंतर बिसेनने पत्नीला भेटायला येण्यासाठी कारागृहातून अनेक निरोप पाठविले. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे ती येऊ शकली नाही. तब्बल चार महिन्यानंतर ती बिसेनला भेटायला आली. चिमुकल्याला पाहून बिसेन कमालीचा हळवा झाला. कधी एकदा कारागृहाबाहेर पडतो आणि बायको-मुलाजवळ जातो, असे त्याला झाले होते. मुलाला घेऊन भेटीसाठी यावे म्हणून तो पत्नीला वारंवार निरोप पाठवत होता. परंतु त्याला प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे बिसेन कासावीस झाला असतानाच महिना-दोन महिन्यानंतर एक नातेवाईक त्याला भेटायला आला. ‘तुझ्या पत्नी आणि मुलाला विकण्यात आले‘, अशी बातमी त्याने बिसेनला दिली. ती ऐकून बिसेन वेडापिसा झाला. कारागृहाच्या बरॅकीत तो अक्षरश: आक्रोश करू लागला. सुरू झाला कट ‘अपने साथी के औरत और बच्चे को किसीने भगाकर बेचा है. उसके साथ अपनी भी इज्जत का सवाल है‘, असे म्हणत सत्येंद्र गुप्ताने शिबू खान, प्रेम नेपाली तसेच आकाश ठाकूरला कारागृहातून पळून जाण्याच्या कटात सहभागी करून घेतले. त्यानंतर कटर मिळवून हे पाच जण दररोज बरॅकीचे लोखंडी गज कापू लागले. यावेळी त्यांच्या बरॅकीत १५६ कैदी होते. मात्र, सत्येंद्र गुप्ता, बिसेन आणि अन्य आरोपींच्या खतरनाक इराद्यांचा भंडाफोड केल्यास जीव जाऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे ते गप्प बसले. शेवटी ३० मार्चच्या मध्यरात्री खिडकीचे गज कापले गेल्यामुळे त्यांनी पळून जाण्याच्या कटाची अंमलबजावणी केली. पहाटे २.३०च्या सुमारास ते कारागृहाबाहेर पडल्यानंतर बकरा मंडी, कामठी मार्गाने छिंदवाडा मार्गावर पोहचले. तेथून ते बैतुलला पोहचले. आठ दिवसानंतर त्यांच्या मागावर असलेले पोलीस बैतुलात आल्याची कुणकुण लागताच हे सर्व भोपाळला पळाले.