शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

घरचे साधे पाणी परवडले; पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:06 IST

- लॉकडाऊनचा परिणाम : शुद्धीकरणाचे प्रकल्प बंद नागपूर : उन्हाळ्यात लग्नकार्य असो वा कोणताही समारंभ किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जारमध्ये ...

- लॉकडाऊनचा परिणाम : शुद्धीकरणाचे प्रकल्प बंद

नागपूर : उन्हाळ्यात लग्नकार्य असो वा कोणताही समारंभ किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जारमध्ये भरलेल्या शुद्ध पाण्याची विक्री वाढते. पण, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जारची विक्री मंदावली आहे. लॉकडाऊनमध्ये लग्नकार्य होत नसल्याने आणि प्रतिष्ठाने बंद असल्याने जारची विक्री जवळपास बंदच झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. पण, मालकांनी कोरोनाकाळात जार नको, घरचे पाणी पिण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांनी पाणी शुद्धीकरणाचे लहान-मोठे प्रकल्प बंद केले आहेत. त्यामुळे जारमध्ये भरलेल्या पाण्याची विक्री बंद झाली आहे. विक्रेत्यांनी सांगितले, दरवर्षी मार्च ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लग्नकार्य असल्याने जारची (एक जार १८ लिटर शुद्ध पाणी) सर्वाधिक विक्री होते. पण, यंदा लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत होत असल्याने जार बोलविण्याच्या भानगडीत कुणीही पडत नाही. नागपूर शहरात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत जवळपास ५०० पेक्षा जास्त प्रकल्प आहेत. ८० ते ९० टक्के प्रकल्प सुरू आहेत. प्रत्येक प्रकल्पात दररोज २०० पेक्षा जास्त जारची निर्मिती होते. एका जारची किंमत २५ ते ३० रुपये असून, त्यानुसार उन्हाळ्यात दररोज ३० लाखांचा व्यवसाय होतो. त्या उद्योगावर अडीच ते ३ हजार जणांना रोजगार मिळतो. पण, सध्या हा व्यवसाय बंद असल्याने रोजगार बुडाला आहे. त्यामुळे प्रकल्पांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

सध्याच्या ट्रेंडनुसार नागपुरातील प्रत्येक प्रतिष्ठानमध्ये दररोज एक वा दोन जार मागविले जातात. शिवाय, लग्नकार्य आणि अन्य समारंभात मागणी वेगळी असते. त्यानुसार दररोज ६ ते ७ हजार जारची विक्री होते. पण, सध्या लग्नकार्याअभावी आणि प्रतिष्ठाने बंद असल्याने संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. अनेकांनी लाखो रुपये कर्ज काढून प्रकल्प उभे केले आहेत. गेल्या वर्षी पाच ते सहा महिने आणि यंदा मार्चपासून विक्री बंद असल्याने कर्जाचा भरणा अनेकांना कठीण होत आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. बँक कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे. अशा कठीण परिस्थितीतून या उद्योगाची वाटचाल सुरू आहे.

मनपाकडे १२७ प्रकल्पांची नोंद

मनपाने एक वर्षापासून जारमध्ये भरलेल्या पाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पाची नोंदणी आणि मान्यता देणे बंद केले आहे. पण, त्यापूर्वी १२७ प्रकल्पांची नोंद आहे. याशिवाय शहरात अनेक अनोंदणीकृत प्रकल्प सुरू आहेत. बीआयएसने अधिसूचना काढून नियमबाह्य आणि नोंदणी नसलेल्या प्रकल्पांना बंद करण्याचा इशारा दिला आहे. प्रकल्पासाठी बीआयएसने परवाना बंधनकारक केला आहे. बीआयएसने जवळपास २२ प्रकल्पांवर कारवाई केली आहे.

जारचे पाणी बंद

५ मार्चपासून दुकानाच्या अनियमित वेळा आणि १५ मार्चपासून प्रतिष्ठान बंद असल्याने जारचे पाणी बोलवित नाही. शिवाय, पुढेही दुकान कितीवेळ सुरू राहील, यावर अनिश्चितता असल्याने घरच्या पाण्यावर भर राहील.

अशोक आमधरे, ऑटोमोबाईल विक्रेते.

जारच्या पाण्याला नकार

लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने जारचे पाणी बोलविण्याचा प्रश्न नाही. पूर्वी दुकानात दररोज दोन जार लागायचे. पण, आता बोलविणे बंद केले आहे. जारच्या पाण्याऐवजी घरचे पाणी केव्हाही चांगले आहे.

राकेश माटे, हार्डवेअर विक्रेते.

लॉकडाऊनमुळे बहुतांश प्रकल्प बंद

लॉकडाऊनचा फटका पाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पांना बसला आहे. निर्मिती बंद असल्याने जार विक्रीचा प्रश्नच नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा उन्हाळ्यात जार विक्री व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. प्रत्येकावर बँकांच्या कर्जाचा बोजा वाढला आहे. अनेकांचे हप्ते आणि प्रतिष्ठानाचे भाडे थकले आहे. काम करणाऱ्या युवकांचा रोजगार गेला आहे. कोरोना महामारीने सर्वांवर संकट आले आहे.

विमल अग्रवाल, संचालक, आरओ प्रकल्प.

शहरात जार निर्मितीचे प्रकल्प :

मार्च २०१९ मध्ये दररोज होणारी विक्री - ६ ते ७ हजार जार

मार्च २०२० मध्ये दररोज होणारी विक्री - ४ ते ५ हजार

मार्च २०२१ मध्ये दररोज होणारी विक्री - ५०० ते ६००