शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

जाहिरात निविदेचा इतिहास

By admin | Updated: February 5, 2015 01:11 IST

गेल्या १५ वर्षांत विमानतळावर जाहिरात लावण्याची निविदा फक्त तीनदा बोलविली. या प्रक्रियेत सहभागी होणारी कार्टेल ही एकमेव कंपनी आहे. २००९ पर्यंत भारतीय विमानतळ

कार्टेल तुपाशी एमआयएल उपाशी!नागपूर : गेल्या १५ वर्षांत विमानतळावर जाहिरात लावण्याची निविदा फक्त तीनदा बोलविली. या प्रक्रियेत सहभागी होणारी कार्टेल ही एकमेव कंपनी आहे. २००९ पर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) या कंपनीने निविदा बोलविली. २००९ मध्ये विमानतळाचे संचालन एमआयएलकडे आले. तेव्हापासून कंपनी निविदा बोलवित आहे. एमआयएलने २०१२ मध्ये दरमहा १४.९० लाख रुपये नमूद असलेली निविदा बोलविली. पण, या प्रक्रियेत कुणीही सहभागी झाले नाही. या कामासाठी फेरनिविदा बोलविल्यानंतर पहिली अ‍ॅडमार्क आणि दुसरी कार्टेलने निविदा भरली. पण कुठलेही कारण न देता अ‍ॅडमार्कने या प्रक्रियेतून माघार घेतली. पुन्हा झालेल्या फेरनिविदेत फक्त कार्टेल कंपनीची निविदा होती. तिसऱ्या फेरनिविदेनुसार एमआयएने विमानतळावर जाहिरात लावण्याचे कंत्राट दरमहा १२.५० लाख रुपये दराने कार्टेलला दिले. अशी आह कार्टेलची भूमिका या प्रकरणी कार्टेलचे प्रमोटर श्रीपाद आष्टेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कार्टेलने चुकीचे काहीही केलेले नाही, असे सांगितले. पहिले असे की निविदा प्रक्रियेत केवळ आम्ही होतो तर दुसरे असे की कोणताही अनौपचारिक करार केला नाही आणि तिसरे असे की, कार्टेलने एकाधिकारशाही तयार केली नाही. मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील जीएमआर आणि जीव्हीके या खासगी कंपन्यांनाही दीर्घकालीन कंत्राट देण्यात आले आहे, शिवाय प्रो-डाटा रेटवर नवीन जागेवर जाहिरात लावण्यास परवानगी दिली आहे. एमआयएलनेही याच मार्गाचा अवलंब केल्याचे ते म्हणाले. गेल्यावेळी अ‍ॅडमार्कने निविदा मागे घेतली नव्हती, तर त्यांचा प्रतिनिधी उशिरा पोहोचल्याने ते प्रक्रियेत अपात्र ठरले होते. नागपूर विमानतळाच्या कंत्राटात कार्टेलला तोटा झाल्याचा दावा आष्टेकर यांनी केला, पण लाखो रुपयांच्या प्रश्नांवर आष्टेकर यांनी काहीच उत्तर दिले नाही. या कंत्राटात कार्टेलला तोटा होत असेल तर हे काम ते का सोडत नाही, शिवाय कंपनी नागपूर विमानतळावर पायाभूत सुविधेसाठी पैसा का खर्च करीत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. यावर त्यांनी ही अंतर्गत बाब असल्याचे सांगून चुप्पी साधली. विमानतळावरील जाहिरातीच्या कंत्राटात काहीच आलबेल नसल्याचे कार्टेलने दिलेल्या अस्पष्ट स्पष्टीकरणाने दिसून येते. (विशेष प्रतिनिधी)एमआयएल काय म्हणते २०१२ मध्ये निविदा बोलविल्या तेव्हा अनिलकुमार हे एमआयएलचे संचालक होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी पद सोडले आहे. या पदाचा कार्यभार अवधेश प्रसाद यांनी पाच दिवसांआधी स्वीकारला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जाहिरातींच्या बोर्डाचे आकार आणि संख्या वाढल्याचे मान्य केले. एमआयएलने चुकीचे काहीही केले नाही. ही प्रक्रिया सर्व नियमानुसारच झाली आहे. अशा प्रक्रियेमुळे तुमचे महसुली उत्पन्न कमी झाले नाही का, या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. या कंत्राटाची मुदत जेव्हा संपेल तेव्हा एमआयएलतर्फे नव्याने फ्रेश निविदा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.