शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात निविदेचा इतिहास

By admin | Updated: February 5, 2015 01:11 IST

गेल्या १५ वर्षांत विमानतळावर जाहिरात लावण्याची निविदा फक्त तीनदा बोलविली. या प्रक्रियेत सहभागी होणारी कार्टेल ही एकमेव कंपनी आहे. २००९ पर्यंत भारतीय विमानतळ

कार्टेल तुपाशी एमआयएल उपाशी!नागपूर : गेल्या १५ वर्षांत विमानतळावर जाहिरात लावण्याची निविदा फक्त तीनदा बोलविली. या प्रक्रियेत सहभागी होणारी कार्टेल ही एकमेव कंपनी आहे. २००९ पर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) या कंपनीने निविदा बोलविली. २००९ मध्ये विमानतळाचे संचालन एमआयएलकडे आले. तेव्हापासून कंपनी निविदा बोलवित आहे. एमआयएलने २०१२ मध्ये दरमहा १४.९० लाख रुपये नमूद असलेली निविदा बोलविली. पण, या प्रक्रियेत कुणीही सहभागी झाले नाही. या कामासाठी फेरनिविदा बोलविल्यानंतर पहिली अ‍ॅडमार्क आणि दुसरी कार्टेलने निविदा भरली. पण कुठलेही कारण न देता अ‍ॅडमार्कने या प्रक्रियेतून माघार घेतली. पुन्हा झालेल्या फेरनिविदेत फक्त कार्टेल कंपनीची निविदा होती. तिसऱ्या फेरनिविदेनुसार एमआयएने विमानतळावर जाहिरात लावण्याचे कंत्राट दरमहा १२.५० लाख रुपये दराने कार्टेलला दिले. अशी आह कार्टेलची भूमिका या प्रकरणी कार्टेलचे प्रमोटर श्रीपाद आष्टेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कार्टेलने चुकीचे काहीही केलेले नाही, असे सांगितले. पहिले असे की निविदा प्रक्रियेत केवळ आम्ही होतो तर दुसरे असे की कोणताही अनौपचारिक करार केला नाही आणि तिसरे असे की, कार्टेलने एकाधिकारशाही तयार केली नाही. मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील जीएमआर आणि जीव्हीके या खासगी कंपन्यांनाही दीर्घकालीन कंत्राट देण्यात आले आहे, शिवाय प्रो-डाटा रेटवर नवीन जागेवर जाहिरात लावण्यास परवानगी दिली आहे. एमआयएलनेही याच मार्गाचा अवलंब केल्याचे ते म्हणाले. गेल्यावेळी अ‍ॅडमार्कने निविदा मागे घेतली नव्हती, तर त्यांचा प्रतिनिधी उशिरा पोहोचल्याने ते प्रक्रियेत अपात्र ठरले होते. नागपूर विमानतळाच्या कंत्राटात कार्टेलला तोटा झाल्याचा दावा आष्टेकर यांनी केला, पण लाखो रुपयांच्या प्रश्नांवर आष्टेकर यांनी काहीच उत्तर दिले नाही. या कंत्राटात कार्टेलला तोटा होत असेल तर हे काम ते का सोडत नाही, शिवाय कंपनी नागपूर विमानतळावर पायाभूत सुविधेसाठी पैसा का खर्च करीत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. यावर त्यांनी ही अंतर्गत बाब असल्याचे सांगून चुप्पी साधली. विमानतळावरील जाहिरातीच्या कंत्राटात काहीच आलबेल नसल्याचे कार्टेलने दिलेल्या अस्पष्ट स्पष्टीकरणाने दिसून येते. (विशेष प्रतिनिधी)एमआयएल काय म्हणते २०१२ मध्ये निविदा बोलविल्या तेव्हा अनिलकुमार हे एमआयएलचे संचालक होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी पद सोडले आहे. या पदाचा कार्यभार अवधेश प्रसाद यांनी पाच दिवसांआधी स्वीकारला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जाहिरातींच्या बोर्डाचे आकार आणि संख्या वाढल्याचे मान्य केले. एमआयएलने चुकीचे काहीही केले नाही. ही प्रक्रिया सर्व नियमानुसारच झाली आहे. अशा प्रक्रियेमुळे तुमचे महसुली उत्पन्न कमी झाले नाही का, या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. या कंत्राटाची मुदत जेव्हा संपेल तेव्हा एमआयएलतर्फे नव्याने फ्रेश निविदा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.