शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

मिठाईतील भेसळीचा लोकांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:57 IST

काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी : ग्राहकांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सणासुदीच्या काळात दूध, खवा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे. मोहिमेअभावी हॉटेलचालक मस्त आहेत. भेसळखोरांवर कारवाई करून कठोर शिक्षा करावी, असा सूर अनेकांनी लोकमतशी बोलताना काढला.अन्न सुरक्षा कायद्यातील मानांकनानुसार अन्नाची गुणवत्ता तपासण्यात येते. या मानांकनाचे पालन होते की नाही, हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध पद्धती अवलंबून त्या निकषांवर चाचण्या येतात. पूर्वी धडक मोहिमांमुळे भेसळ करणाऱ्यांवर चाप बसला होता. पण आता हॉटेलचालकांवर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.भेसळखोरांना लगाम लावणे अशक्यग्राहक महेंद्र आदमने म्हणाले, सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणारे आणि तयार करणाऱ्यांची चलती असते. पैशाच्या लालसेपोटी जीवाशी खेळणाऱ्या या समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ तयार करणारे व विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असते. परंतु कारवाईबाबत उदासीन धोरण असते. विभागाने नियमितपणे अशा भेसळखोरांवर लक्ष ठेवून कारवाई करावी. भेसळखोरांना रोखण्यासाठी प्रशासनाबरोबर नागरिकांनीही सतर्क राहिले पाहिजे.इच्छाशक्तीचा अभावभाऊ पत्की म्हणाले, अन्न व औषध प्रशासन खात्यात पुरेसे मनुष्यबळ नाही आणि काम करण्याची जबर इच्छाशक्ती नसल्यामुळे कारवाई होत नाही. होते ती नगण्यच असते. भेसळयुक्त खाद्यपदार्थाबरोबरच दूध भेसळही नित्याची बाब आहे. अशा कारवाईच्या उपाययोजना करताना कायमस्वरूपी भरारी पथके स्थापन व्हावीत. न्यायालयानेही अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी.शोधमोहिम राबवावीपंकज गाडे म्हणाले, कायद्यानुसार भेसळ हा गुन्हा असतानाही व्यापारी सणासुदीच्या काळात अन्नात भेसळ करतात. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. अन्न विषबाधेची घटना घडली की, हॉटेलवर धाड पडते आणि भेसळयुक्त पदार्थ जप्त होतात. मात्र, या धाडी अगोदरपासून पडायला हव्यात. त्यासाठी अन्नपदार्थ भेसळ शोधमोहिम अखंड राबवणे गरजेचे आहे.

ग्राहकांनीही सतर्क राहावेअशोक शेंडे म्हणाले, भेसळ करणाऱ्यांवर अंकुश ठेवायला हवा. प्रत्येक सणांमध्ये मिठाई व गोड पदार्थांची मोठी मागणी असते. प्रशासनाच्या संबंधित खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपापले कर्तव्य पद्धतशीर काटेकोरपणे व शिस्तीने बजावल्यास भेसळ माफियांवर वचक बसेल.कायमस्वरूपी यंत्रणा हवीविश्वास क्षीरसागर म्हणाले, अन्नपदार्थात कुठली ना कुठली भेसळ असल्याने त्याचे विपरीत परिणाम कालांतराने शरीरावर होताना दिसतात. भेसळमाफियांना शासकीय यंत्रणेची भीती राहिलेली नाही. भेसळ रोखण्यासाठी एक कायमस्वरूपी विशेष यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे. भेसळखोरांना अटकाव करण्यासाठी त्यांना फासावर लटकविणेच उचित ठरेल.विभागातर्फे नियमित कारवाईअधिकाऱ्यांनी सांगितले की, अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यानंतर विभागातर्फे नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येते. सणासुदीत हॉटेलमधील मिठाई आणि खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. विश्लेषणाच्या आधारावर कारवाई करून दंड आकारण्यात येतो. अन्न मानके कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. ग्राहकांनी दक्ष राहून भेसळ करणाऱ्याविरुद्ध विभागाकडे तक्रार नोंदविता येते.

टॅग्स :hotelहॉटेलFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग