शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीसाठी प्रशासनाचा 'मॅनेजमेंट प्लॅन' तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:13 IST

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देआचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज : २१,९७० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले की, जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहे. या १२ ही ठिकाणी मतदान व मतमोजणी होईल. निवडणुकीच्या कामासाठी एकूण २१९७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून ते सर्व उपलब्ध आहेत. यासोबतच ४३८२ अधिकारी-कर्मचारी हे रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त यासर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यात प्रशिक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाºयांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. २७ तारखेपर्यंत ते चालणार आहे. दक्षता पथकही तयार करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात चार दक्षता पथक नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक पथकात चार ते पाच कर्मचाºयांचा समावेश राहिल. तसेच कॅमेरा आणि सांख्यिकी पथकसुद्धा असेल. मध्य प्रदेशातील दोन जिल्हे लागून आहे. या जिल्ह्यातून कोणत्याही प्रकारची तस्करी होता कामा नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, शिरिष पांडे आदी उपस्थित होते.५५ संवेदनशील मतदान केंद्रनिवडणुकीसाठी ४४१२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून यातील ५५ केंद्र संवेदनशील आहे. या संवेदनशील मतदार केंद्रावरून सीसीटीव्ही लावण्यात येणार असून अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे वेब कास्टींग करण्यात येणार आहे.लोकसभेच्या तुलनेत ३० मतदान केंद्र अधिक आहेत. एका विधानसभा संघात एक केंद्र विशेष महिलांचे असणार आहे.७७२१ बॅलेट युनिटची गरजनिवडणुकीकरता ७७२१बॅलेट युनिट तर ५५१५कंट्रोल युनिट आवश्यक आहे. प्रशासनाकडे ८१८०बॅलेट युनिट आणि ८८८३ कंट्रोल युनिट आहेत. ५९५६ व्हीव्हीपॅट मशीन असून १०३ मशीन कमी आहेत. आंध्र प्रदेशकडून २८० व्हीव्हीपॅट मशीन मागविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुद्गल यांनी सांगितले.८९०२ पोलिंग एजंट राजकीय पक्षाकडून नियुक्तराजकीय पक्षांकडून ८९०२ पोलिंग एजंटची नियुक्ती केली आहे. यात सर्वाधिक ४२१६ एजंटची नियुक्ती भाजपने केली आहे. तर ३४३४ कॉंग्रेस, बसपने २०० तर सेनाने ४४७ एजंटची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ७८ हजार मतदार वाढले

 लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्ह्यात तब्बल ७८ हजार ५७५ मतदार वाढले आहेत. यामध्ये तब्बल ७३९३६ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील म्हणजे नवमतदार आहेत. यातही महिला मतदारांची संख्या अधिक आहे, हे विशेष.  जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की,  गेल्या ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या यादीत जिल्ह्यात ४१ लाख ६३ हजार ३६७ मतदार आहे. यात पुरुष २१ लाख ३१ हजार १४९, महिला २० लाख ३२ हजार ११८ व १०० तृतिय पंथीय मतदात्यांचा समावेश आहे.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विशेष मोहिमेंतर्गत मतदारांची भर पडली असून ७८ हजार ५२५ नवमतदार वाढले आहे. त्यात ३६ हजार ४०९ पुरुष व ४२ हजार ११२ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील ६३ हजारांनी मतदार वाढले असून यंदाच्या विधानसभेत ७३ हजार ९३६ नवमतदारांचा समावेश आहे. त्यांना आकर्षित करण्यावर विशेष भर राजकीय पक्षांचा राहणार आहे. ८ हजार ८३७ मतदार वगळलेलोकसभा निवडणुकीनंतर ८ हजार ८३७ मतदार वगळण्यात आले. त्यात ५ हजार ७०८ मृत असून १ हजार ४५३ स्थलांतरित व ८७६ डुप्लिकेट मतदार आढळून आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरMediaमाध्यमे