शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे समायोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:17 IST

राज्य आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे १०० टक्के समायोजन करण्याच्या मागणीला घेऊन आरोग्य विभाग कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढला.

ठळक मुद्देविधिमंडळावर मोर्चाची धडक : आरोग्य विभाग कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे १०० टक्के समायोजन करण्याच्या मागणीला घेऊन आरोग्य विभाग कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढला. येत्या निवडणुकांपूर्वी समायोजन न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.राज्य आरोग्य विभागात १ लाख ७७ हजारांपेक्षा जास्त विविध पदे रिक्त आहेत. यांच्या कामाच्या ताणांसह मूळ कामांचा भार एनएचएम, आयपीएचएस, आरएनटीसीपी, एनयुएचएम, एमएसएएसी, आरबीएसके, आयुष व लॅप्रसी आदी २५ हजार कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. गेल्या २० वर्षांपासून ११ महिन्याच्या कंत्राटावर हे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. यातील ४५ टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या वयाची ४५ ओलांडली आहे. यातच अतिसंसर्गजन्य रुग्णाच्या सेवेत व संपर्कात आल्याने १५४ च्यावर कर्मचारी विविध आजाराने पीडित आहेत तर ११२ वर कंत्राटी कर्मचारी विविध संसर्गजन्य आजाराने मृत्यू पावले आहेत. शासनाच्या तुटपुंज्या मानधनावर रुग्णांचे हित जोपासणे कठीण झाल्याने सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करा, अशी मागणी या मोर्चात लावून धरल्याचे गोपाल श्रीमंगले यांनी सांगितले. पंजाब, हरियाणा, दिल्ली सरकारने ‘समान काम, समान वेतन’नुसार अंमलबजावणी केली आहे. परंतु महाराष्ट्रात अद्यापही याची अंमलबजावणी झाली नसल्याची खंतही श्रीमंगले यांनी बोलून दाखवली.मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना दिले. त्यांनी अधिवेशनानंतर तातडीने यावर बैठक लावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. होऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वी समायोजन न झाल्यास आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी सहकुटुंब मतदानावर बहिष्कार टाकू, अशी शपथही यावेळी घेतली. मोर्चाचे नेतृत्व समितीचे कार्यकारी अध्यक्ष कमलेश गजबे, अध्यक्ष मंगेश गावंडे, संजय जीवतोडे व गोपाल श्रीमंगले यांनी केले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा