शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सणासुदीला भरमसाठ भाडेवाढ करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई

By योगेश पांडे | Updated: December 24, 2022 06:12 IST

थेट परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.

योगेश पांडेनागपूर : सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्सचालकांकडून बसभाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ करण्याचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. सिझनमध्ये दीडपट भाडेवाढीची मुभा आहे. त्याहून जास्त भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. प्रवासी तक्रार करण्यास समोर येत नसल्याने कारवाई होत नाही. त्यामुळे थेट परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. 

सचिन अहिर यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघाताच्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडली होती. त्यावरील चर्चेत ते बोलत होते. नाशिक-औरंगाबाद मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, यापुढे चारचाकी वाहनांची प्रवासी नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 

भरारी पथकांची क्षमता वाढविणार

  • खासगी बसचा अपघात होऊन आगीत काही प्रवाशांचा मृत्यू होणे, ही बाब गंभीर आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून वाहन परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याबाबत कडक धोरण राबविणार असून, भरारी पथकांची क्षमता वाढविण्यात येईल. 
  • भरारी पथके अधिक कार्यक्षमतेने कार्यरत करणार असून, पथकांना लक्ष्यांक देऊन वाहने तपासण्याचे काम करणार आहे. यासाठी परिवहन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कडक देखरेख केली जाईल, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. 

वाहन योग्यता प्रमाणपत्राची सक्ती करणार  महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागावी व अपघात कमी करण्यासाठी २४ तास विशेष तपासणी मोहीम चालू करणार आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. परिवहन मंडळाची साडेपाच हजार वाहने २ वर्षांत नवीन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र