शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

धरमपेठेतील अतिक्रमणावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:18 IST

धरमपेठ भागातील दुकानदारांनी फूटपाथ, रस्त्यावर बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज सीताबर्डी पोलिसांनी केली.

ठळक मुद्देसिव्हीक अ‍ॅक्शन ग्रुपच्या तक्रारीवरून राबविली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठ भागातील दुकानदारांनी फूटपाथ, रस्त्यावर बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज सीताबर्डी पोलिसांनी केली.आपले घर, परिसर घाण आणि अतिक्रमणापासून दूर ठेवल्यास शहर, राज्य आणि देशात ही समस्या दूर होऊ शकते. हेच ध्येय बाळगून नागपुरातील काही जागरुक नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी धरमपेठ भागातील नागरिकांनी ‘सिव्हीक अ‍ॅक्शन ग्रुप’ (सीएजी) तयार केला आहे. या ग्रुपने अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केली. परंतु हे अतिक्रमण हटविण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केले नाही. अखेर सीएजी ग्रुपने सीताबर्डी पोलिसात तक्रार केली. त्याचा परिणाम असा झाला की, गुरुवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांनी धरमपेठ परिसरातील दुकानदारांनी बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून रस्त्यावर, फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाईत जवळपास १० पोलीस कर्मचारी सहभागी झाले. पोलिसांनी झेंडा चौक ते कॉफी हाऊस चौकाच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर अतिक्रमण हटविणे सुरु केले. येथे मोबाईल शोरूमचे फूटपाथवरील लोखंडाच्या अँगलच्या साहाय्याने लावलेले मोठे बोर्ड हटविण्याची विनंती पोलिसांनी दुकानदारांना केली. येथे एक मुव्हेबल बोर्डही हटविण्यात आले तसेच झाडावर लटकविलेले बोर्डही काढण्यात आले. पुढे एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे बोर्डही हटवून त्याचा लोखंडी पाईप जप्त करण्यात आला. तेथून पोलीस लक्ष्मीभुवन चौकाकडे वळले. येथेही दुकानदारांनी बोर्ड, पोस्टर, बॅनरसह इतर मार्गाने केलेले अतिक्रमण पोलिसांनी हटविले. येथे काही दुकानदारांनी त्याचा विरोध केला. त्यामुळे पोलीस आणि दुकानदारात वाद झाला. परंतु पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी दुकानदारांना सांगितले की, धरमपेठच्या नागरिकांच्या तक्रारीवरूनच पोलीस ही कारवाई करीत आहेत. त्यानंतर दुकानदार शांत झाले. ही कारवाई जवळपास तीन तास चालली.परिसर अतिक्रमणमुक्त ठेवणे दुकानदारांचीही जबाबदारीधरमपेठच्या सिव्हीक अ‍ॅक्शन ग्रुपच्या पदाधिकाºयांच्या मते आपला परिसर अतिक्रमणापासून मुक्त ठेवण्याची जबाबदारी दुकानदारांचीही आहे. त्यांनी आपल्या दुकानातील साहित्य, बोर्ड, बॅनर दुकानाच्या परिसरातच ठेवल्यास रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त होऊन पायी चालणारे, वाहनचालकांना ये-जा करण्यास सुविधा होईल. वाहन ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल. त्यामुळे दुकानात ग्राहकांची संख्याही वाढण्यास मदत होईल.