शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

आरोपीला केवळ तत्त्वज्ञानाधारे दोषी ठरवले जाऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:30 IST

कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणामध्ये दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणामध्ये दिला.मृत्यूच्या दारावर असताना कुणी खोटे बोलणार नाही असे तत्त्वज्ञान कायद्यात आहे. मृत्यूपूर्व बयान स्वीकार करण्यासाठी हे तत्त्वज्ञान लागू आहे. त्यामुळे चंद्रपूर सत्र न्यायालयाने विविध त्रुटी असणाऱ्या मृत्यूपूर्व बयानावर केवळ या तत्त्वज्ञानाच्या आधारावर विश्वास ठेवून आरोपीला खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने हा वादग्रस्त निर्णय रद्द केला. कायद्यातील केवळ एका सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. आरोपीला ठोस व विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावरच दोषी ठरवले गेले पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगून मृत्युपूर्व बयानासंदर्भातील कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. न्यायालयांनी मृत्युपूर्व बयान हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, मृत्युपूर्व बयान देणारा उलट तपासणीसाठी न्यायालयामध्ये उपस्थित नसतो. त्यामुळे मृत्युपूर्व बयानावर विश्वास ठेवण्यापूर्वी ते स्वेच्छेने दिले गेले असल्याचे, खरे असल्याचे व जखमीची मानसिक स्थिती चांगली असताना दिले गेले असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. ही खात्री पटल्यानंतर केवळ मृत्युपूर्व बयानाच्या आधारावरही आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकते. त्याकरिता बयानाचे समर्थन करणाऱ्या अन्य पुराव्यांची गरज नाही असे उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले.बयान अविश्वसनीय, पती निर्दोषपत्नीचा जाळून खून केल्याचा आरोप असणाऱ्या विठ्ठल लहू चौधरी (३३) या आरोपीला उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे निर्दोष सोडले. आरोपीच्या पत्नीचे नाव साधना होते. तिचे मृत्युपूर्व बयान उच्च न्यायालयाने अविश्वसनीय ठरवले. मृत्युपूर्व बयानावर विश्वास ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी प्रकरणातून गहाळ असल्याचे निरीक्षण हा निर्णय देताना नोंदविण्यात आले. फौजदारी प्रकरणात पुरावे लक्षात घेताना संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे. सरकार पक्षाने संशयाला जागा न ठेवता गुन्हा सिद्ध केला पाहिजे. आरोपीला संशयाच्या बळावर दोषी ठरविण्याची कायदा परवानगी देत नाही असेही या निर्णयात नमूद करण्यात आले.असे आहे प्रकरणही घटना १५ जुलै २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी आरोपी घुग्गुस (जि. चंद्रपूर) पोलिसांच्या हद्दीतील वांढरी फाटा येथे राहात होता. घटनेच्या पाच वर्षांपूर्वी आरोपीचे साधनासोबत लग्न झाले होते. तो साधनाला चांगली वागणूक देत नव्हता. दरम्यान, त्याने साधनाला जाळून ठार मारले असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. चंद्रपूर सत्र न्यायालयाने साधनाच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारावर खुनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याचे अपील मंजूर झाले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे