शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला केवळ तत्त्वज्ञानाधारे दोषी ठरवले जाऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:30 IST

कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणामध्ये दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणामध्ये दिला.मृत्यूच्या दारावर असताना कुणी खोटे बोलणार नाही असे तत्त्वज्ञान कायद्यात आहे. मृत्यूपूर्व बयान स्वीकार करण्यासाठी हे तत्त्वज्ञान लागू आहे. त्यामुळे चंद्रपूर सत्र न्यायालयाने विविध त्रुटी असणाऱ्या मृत्यूपूर्व बयानावर केवळ या तत्त्वज्ञानाच्या आधारावर विश्वास ठेवून आरोपीला खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने हा वादग्रस्त निर्णय रद्द केला. कायद्यातील केवळ एका सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. आरोपीला ठोस व विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावरच दोषी ठरवले गेले पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगून मृत्युपूर्व बयानासंदर्भातील कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. न्यायालयांनी मृत्युपूर्व बयान हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, मृत्युपूर्व बयान देणारा उलट तपासणीसाठी न्यायालयामध्ये उपस्थित नसतो. त्यामुळे मृत्युपूर्व बयानावर विश्वास ठेवण्यापूर्वी ते स्वेच्छेने दिले गेले असल्याचे, खरे असल्याचे व जखमीची मानसिक स्थिती चांगली असताना दिले गेले असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. ही खात्री पटल्यानंतर केवळ मृत्युपूर्व बयानाच्या आधारावरही आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकते. त्याकरिता बयानाचे समर्थन करणाऱ्या अन्य पुराव्यांची गरज नाही असे उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले.बयान अविश्वसनीय, पती निर्दोषपत्नीचा जाळून खून केल्याचा आरोप असणाऱ्या विठ्ठल लहू चौधरी (३३) या आरोपीला उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे निर्दोष सोडले. आरोपीच्या पत्नीचे नाव साधना होते. तिचे मृत्युपूर्व बयान उच्च न्यायालयाने अविश्वसनीय ठरवले. मृत्युपूर्व बयानावर विश्वास ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी प्रकरणातून गहाळ असल्याचे निरीक्षण हा निर्णय देताना नोंदविण्यात आले. फौजदारी प्रकरणात पुरावे लक्षात घेताना संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे. सरकार पक्षाने संशयाला जागा न ठेवता गुन्हा सिद्ध केला पाहिजे. आरोपीला संशयाच्या बळावर दोषी ठरविण्याची कायदा परवानगी देत नाही असेही या निर्णयात नमूद करण्यात आले.असे आहे प्रकरणही घटना १५ जुलै २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी आरोपी घुग्गुस (जि. चंद्रपूर) पोलिसांच्या हद्दीतील वांढरी फाटा येथे राहात होता. घटनेच्या पाच वर्षांपूर्वी आरोपीचे साधनासोबत लग्न झाले होते. तो साधनाला चांगली वागणूक देत नव्हता. दरम्यान, त्याने साधनाला जाळून ठार मारले असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. चंद्रपूर सत्र न्यायालयाने साधनाच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारावर खुनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याचे अपील मंजूर झाले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे