शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सरकारच्या तरतुदीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार केवळ ८०६ रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:12 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेली आर्थिक तरतूद अतिशय कमी असल्याची टीका करीत तरतूद केल्यानुसार शेतकऱ्याला मदत केली गेली तर अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर केवळ ८०६ रुपये मिळतील, असा दावा भाजपतर्फे करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या मदतीसाठी अल्प तरतुदीचा आरोप : पुरवणी मागण्यांवर भाजप आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने सादर केलेल्या १६ हजार ९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना भाजपच्या सदस्यांनी गुरुवारी विधानसभेत तीव्र विरोध केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेली आर्थिक तरतूद अतिशय कमी असल्याची टीका करीत तरतूद केल्यानुसार शेतकऱ्याला मदत केली गेली तर अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर केवळ ८०६ रुपये मिळतील, असा दावा भाजपतर्फे करण्यात आला.गुरुवारी भाजपतर्फे संजय कुटे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात केली. ते म्हणाले, पुरवणी मागण्यांमध्ये जुन्या योजना व केंद्राच्या योजनांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. तीन पक्षाच्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काहीही केले नाही. हा शेतकऱ्यांसोबत विश्वासघात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन व्यक्ती आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना फसविले. ते त्यांना पक्ष प्रमुखाची भूमिका सोडून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत येऊ देत नाही. ते म्हणाले, शिवसेनेच्या आमदाराने ‘हवामानात बदल’ यावर विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे. परंतु पुरवणी मागण्यांमध्ये याचा कुठलाही उल्लेख नाही. मेट्रो रेलसाठी आरे कार शेडसह अनेक विकास कामांवर स्थगनादेश दिला आहे.नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीराष्ट्रवादी कॉँग्रेसचे नवाब मलिक यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, संजय कुटे यांनी पुरवणी मागण्यांचा विषय व क्रमांकाचा उल्लेख केलेला नाही. यावर कुटे म्हणाले, मी विषय व क्रमांकाचा उल्लेख केला आहे. रेकॉर्ड तपासून पाहू शकता. जर मलिक यांचे म्हणणे खोटे ठरले तर त्यांनी राजीनामा द्यावा. परंतु मलिक यांनी पुन्हा आपले म्हणणे मांडत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर भाजपचे सदस्य नारेबाजी करू लागले. तालिका अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डमधून काढण्याची घोषणा केल्यावरच विरोधी पक्षाचे सदस्य शांत झाले.भाजप-शिवसेनेत जुंपलीपुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान भाजप व शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जुंपली. विशेषत: मुंबईतील आमदार आक्रमक होते. आरेमध्ये मेट्रो कारशेडला दिलेल्या स्थगितीवरून जोरदार वाद झाला. माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी, आरेच्या जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर भाजपचे सदस्य म्हणाले की, ते मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होेते तेव्हा त्यांनी अतिक्रमणाचा प्रश्न का सोडवला नाही. वायकर यांनी राज्यमंत्री असल्याचा हवाला दिला, तेव्हा अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न भाजपच्या सदस्यांनी विचारला. यादरम्यान झालेल्या चर्चेत शिवसेनेचे सुनील प्रभू, भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखलकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीvidhan sabhaविधानसभा