शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या तरतुदीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार केवळ ८०६ रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:12 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेली आर्थिक तरतूद अतिशय कमी असल्याची टीका करीत तरतूद केल्यानुसार शेतकऱ्याला मदत केली गेली तर अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर केवळ ८०६ रुपये मिळतील, असा दावा भाजपतर्फे करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या मदतीसाठी अल्प तरतुदीचा आरोप : पुरवणी मागण्यांवर भाजप आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने सादर केलेल्या १६ हजार ९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना भाजपच्या सदस्यांनी गुरुवारी विधानसभेत तीव्र विरोध केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेली आर्थिक तरतूद अतिशय कमी असल्याची टीका करीत तरतूद केल्यानुसार शेतकऱ्याला मदत केली गेली तर अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर केवळ ८०६ रुपये मिळतील, असा दावा भाजपतर्फे करण्यात आला.गुरुवारी भाजपतर्फे संजय कुटे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात केली. ते म्हणाले, पुरवणी मागण्यांमध्ये जुन्या योजना व केंद्राच्या योजनांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. तीन पक्षाच्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काहीही केले नाही. हा शेतकऱ्यांसोबत विश्वासघात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन व्यक्ती आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना फसविले. ते त्यांना पक्ष प्रमुखाची भूमिका सोडून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत येऊ देत नाही. ते म्हणाले, शिवसेनेच्या आमदाराने ‘हवामानात बदल’ यावर विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे. परंतु पुरवणी मागण्यांमध्ये याचा कुठलाही उल्लेख नाही. मेट्रो रेलसाठी आरे कार शेडसह अनेक विकास कामांवर स्थगनादेश दिला आहे.नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीराष्ट्रवादी कॉँग्रेसचे नवाब मलिक यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, संजय कुटे यांनी पुरवणी मागण्यांचा विषय व क्रमांकाचा उल्लेख केलेला नाही. यावर कुटे म्हणाले, मी विषय व क्रमांकाचा उल्लेख केला आहे. रेकॉर्ड तपासून पाहू शकता. जर मलिक यांचे म्हणणे खोटे ठरले तर त्यांनी राजीनामा द्यावा. परंतु मलिक यांनी पुन्हा आपले म्हणणे मांडत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर भाजपचे सदस्य नारेबाजी करू लागले. तालिका अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डमधून काढण्याची घोषणा केल्यावरच विरोधी पक्षाचे सदस्य शांत झाले.भाजप-शिवसेनेत जुंपलीपुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान भाजप व शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जुंपली. विशेषत: मुंबईतील आमदार आक्रमक होते. आरेमध्ये मेट्रो कारशेडला दिलेल्या स्थगितीवरून जोरदार वाद झाला. माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी, आरेच्या जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर भाजपचे सदस्य म्हणाले की, ते मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होेते तेव्हा त्यांनी अतिक्रमणाचा प्रश्न का सोडवला नाही. वायकर यांनी राज्यमंत्री असल्याचा हवाला दिला, तेव्हा अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न भाजपच्या सदस्यांनी विचारला. यादरम्यान झालेल्या चर्चेत शिवसेनेचे सुनील प्रभू, भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखलकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीvidhan sabhaविधानसभा