शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मानकापूर उड्डाण पूल झाला ‘अ‍ॅक्सिडेंट स्पॉट’

By admin | Updated: February 6, 2015 00:59 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होता. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होता. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे टाकळी फरस चौकात उपघातांचे सत्र सुरू आहे. या चौकात सिग्नल लावून भरधाव वाहतुकीवर नियंत्रण लावण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मात्र, सिग्नल कुणी लावावा या विषयावर महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्रािधकरणाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.मानकापूर उड्डाण पूल दोन भागात बांधण्यात आला आहे. मानकापूर चौक झिंगाबाई टाकळी फरस चौकपर्यंत पहिला पूल व झिंगाबाई टाकळी ते कोराडी रोडवरील रेल्वे लाईन ओलांडणारा दुसरा पूल बांधण्यात आला आहे. पुलावरून कोराडीकडून येणारी वाहने तसेच मानकापूरकडून कोराडीकडे जाणारी वाहने टाकळी फरस चौकात उतरतात. पुलावरून ही वाहने भरधाव येतात. विशेष म्हणजे या चौकातून एक रस्ता पश्चिमेकडे झिंगाबाई टाकळीकडे जातो तर दुसरा रस्ता पूर्वेकडील वस्त्यांमध्ये जातो. टाकळीतून पुलावर चढणारी वाहने व पुलावरून दोन्ही बाजूंनी भरधाव वेगाने येणारी वाहने यात धडक होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा असे अपघातही घडले आहेत. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी डिव्हायडर लावून पूर्व व पश्चिमेकडून पुलावर चढणारी वाहने बंद केली होती. त्यामुळे समोर पुलाखाली असलेल्या बोगद्यातून वाहने न्यावी लागत होती. यात लहान गाड्यांची अडचण नव्हती. पण स्टार बस, ट्रक ही वाहने बोगद्यातून नेण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी स्टार बस प्रशासनाने या मार्गावरील स्टार बस बंद केली होती. शेवटी नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेत पोलिसांनी डिव्हायडर हटविले. वाहतूक सुरू झाली पण धोका मात्र कायम आहे. या दोन्ही पुलाच्या मधील टाकळी फरस चौकात सिग्नल लावावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सुभाष मानमोडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन प्रकल्प संचालक चंद्रशेखर यांची भेट घेत सिग्नल लावण्याची मागणी केली होती. त्यावेळी चंद्रशेखर यांनी महापालिकेला पत्र देत सिग्नल लावण्याची सूचना केली. महापालिकेने या पत्रावर सिग्नल लावण्याची मंजुरी दिली. प्रस्ताव तयार केला पण आपल्याकडे निधी नाही नसल्याचे सांगत महामार्ग प्राधिकरणाने यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. आजवर सिग्नल लावण्यासाठी निधी कोण देणार हे स्पष्ट झालेले नाही. एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सुभाष मानमोडे यांच्या नेतृत्वात वसंतराव मोथे, डॉ. मधुसूदन मैंद, संजय मैंद, सुनील पाली, युवराज चौरसिया, प्रशांत चौधरी, अमर खोडे, उकुंडराव राऊत, अ‍ॅड. राजू ढोबळे, सुनील चौधरी, सुरेश मोथे आदींच्या शिष्टमंडळाने महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मिश्रा यांची भेट घेऊन लिग्नल लावण्याचे निवेदन दिले. आ. सुधाकर देशमुख यांचीही भेट घेतली. आमदार व प्रकल्प संचालक दोघांनीही प्रत्यक्ष मोक्कापाहणी करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची पूर्ती कधी होईल, सिग्नल कधी लागतील व धोका कधी टळेल याची प्रतिक्षा नागरिक करीत आहेत. सिग्लचे काम त्वरित न झाल्यास रस्ता रोका करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)