शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

मानकापूर उड्डाण पूल झाला ‘अ‍ॅक्सिडेंट स्पॉट’

By admin | Updated: February 6, 2015 00:59 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होता. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होता. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे टाकळी फरस चौकात उपघातांचे सत्र सुरू आहे. या चौकात सिग्नल लावून भरधाव वाहतुकीवर नियंत्रण लावण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मात्र, सिग्नल कुणी लावावा या विषयावर महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्रािधकरणाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.मानकापूर उड्डाण पूल दोन भागात बांधण्यात आला आहे. मानकापूर चौक झिंगाबाई टाकळी फरस चौकपर्यंत पहिला पूल व झिंगाबाई टाकळी ते कोराडी रोडवरील रेल्वे लाईन ओलांडणारा दुसरा पूल बांधण्यात आला आहे. पुलावरून कोराडीकडून येणारी वाहने तसेच मानकापूरकडून कोराडीकडे जाणारी वाहने टाकळी फरस चौकात उतरतात. पुलावरून ही वाहने भरधाव येतात. विशेष म्हणजे या चौकातून एक रस्ता पश्चिमेकडे झिंगाबाई टाकळीकडे जातो तर दुसरा रस्ता पूर्वेकडील वस्त्यांमध्ये जातो. टाकळीतून पुलावर चढणारी वाहने व पुलावरून दोन्ही बाजूंनी भरधाव वेगाने येणारी वाहने यात धडक होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा असे अपघातही घडले आहेत. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी डिव्हायडर लावून पूर्व व पश्चिमेकडून पुलावर चढणारी वाहने बंद केली होती. त्यामुळे समोर पुलाखाली असलेल्या बोगद्यातून वाहने न्यावी लागत होती. यात लहान गाड्यांची अडचण नव्हती. पण स्टार बस, ट्रक ही वाहने बोगद्यातून नेण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी स्टार बस प्रशासनाने या मार्गावरील स्टार बस बंद केली होती. शेवटी नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेत पोलिसांनी डिव्हायडर हटविले. वाहतूक सुरू झाली पण धोका मात्र कायम आहे. या दोन्ही पुलाच्या मधील टाकळी फरस चौकात सिग्नल लावावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सुभाष मानमोडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन प्रकल्प संचालक चंद्रशेखर यांची भेट घेत सिग्नल लावण्याची मागणी केली होती. त्यावेळी चंद्रशेखर यांनी महापालिकेला पत्र देत सिग्नल लावण्याची सूचना केली. महापालिकेने या पत्रावर सिग्नल लावण्याची मंजुरी दिली. प्रस्ताव तयार केला पण आपल्याकडे निधी नाही नसल्याचे सांगत महामार्ग प्राधिकरणाने यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. आजवर सिग्नल लावण्यासाठी निधी कोण देणार हे स्पष्ट झालेले नाही. एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सुभाष मानमोडे यांच्या नेतृत्वात वसंतराव मोथे, डॉ. मधुसूदन मैंद, संजय मैंद, सुनील पाली, युवराज चौरसिया, प्रशांत चौधरी, अमर खोडे, उकुंडराव राऊत, अ‍ॅड. राजू ढोबळे, सुनील चौधरी, सुरेश मोथे आदींच्या शिष्टमंडळाने महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मिश्रा यांची भेट घेऊन लिग्नल लावण्याचे निवेदन दिले. आ. सुधाकर देशमुख यांचीही भेट घेतली. आमदार व प्रकल्प संचालक दोघांनीही प्रत्यक्ष मोक्कापाहणी करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची पूर्ती कधी होईल, सिग्नल कधी लागतील व धोका कधी टळेल याची प्रतिक्षा नागरिक करीत आहेत. सिग्लचे काम त्वरित न झाल्यास रस्ता रोका करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)