शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अपघात विम्याचा घात

By admin | Updated: May 1, 2017 01:12 IST

शेतकऱ्याला सुरक्षा कवच मिळावे, त्याचे जीवन सुरक्षित व्हावे, त्याच्या कुटुंबाला वेळीच मदत मिळावी,

८६ शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारले : कृषी विभाग गप्प का? जीवन रामावत  नागपूर शेतकऱ्याला सुरक्षा कवच मिळावे, त्याचे जीवन सुरक्षित व्हावे, त्याच्या कुटुंबाला वेळीच मदत मिळावी, या हेतूने राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ राबविली जात आहे. मात्र कृषी विभागाच्या करंटेपणामुळे एका चांगल्या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार मागील सात वर्षांत नागपूर जिल्ह्यातील एकूण ३५७ शेतकऱ्यांनी या अपघात विमा योजनेच्या लाभासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले. मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ २१४ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला असून, तब्बल ८६ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर ४३ प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. जेव्हा की, राज्य शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत मागील २५ नोव्हेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकात कागदपत्रांअभावी एखाद्या शेतकऱ्याचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित राहिल्यास त्याची पूर्तता करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका अधिकाऱ्यांची राहील. असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु असे असताना मागील पाच वर्षांपासून प्रलंबित ४३ प्रकरणाची कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. शिवाय शेतकऱ्यांना त्याचा लाभही मिळाला नाही. शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यासोबत अनेकदा अपघात घडतो. वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, अशा अनेक नैसर्गिक घटना घटतात. शिवाय वाहन अपघात घडतो. यात अनेकदा शेतकऱ्याचा मृत्यू होतो, किंवा काहींना अपंगत्व येते. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. त्यामुळे अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने मागील २००५-०६ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.