शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सहकार क्षेत्राने तंत्रज्ञानातील बदल स्वीकारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांनी एकत्र येऊन काम करणे म्हणजे सहकार. सहकारी संस्थांना एनपीए सक्तीचे केले त्यावेळी या क्षेत्रातील लोक संभ्रमावस्थेत होते. आयकर कायदा आणि जीएसटी संदर्भातही हीच स्थिती आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू कमी झाल्या आहेत. सहकार कायद्यात वेळोवेळी होणाºया बदलांमुळे संचालक व सभासदांना भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. बदलत्या ...

ठळक मुद्देशेखर चरेगांवकर : सहकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांनी एकत्र येऊन काम करणे म्हणजे सहकार. सहकारी संस्थांना एनपीए सक्तीचे केले त्यावेळी या क्षेत्रातील लोक संभ्रमावस्थेत होते. आयकर कायदा आणि जीएसटी संदर्भातही हीच स्थिती आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू कमी झाल्या आहेत. सहकार कायद्यात वेळोवेळी होणाºया बदलांमुळे संचालक व सभासदांना भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचा सहकार क्षेत्राने सकारात्मक दृष्टीने स्वीकार करावा, असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी येथे व्यक्त केले.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर आणि सहकार भारती नागपूरच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहकारी परिषदेचे आयोजन गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, समृद्धी सहकारी बँक लि. नागपूरच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मुकुंदराव तापकीर, संघटन मंत्री नीळकंठ देवांगण, विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संस्था मर्या.नागपूरचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था, नागपूरचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, सहकारी संस्था नागपूरचे जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, सहकार भारती विदर्भचे प्रकोष्ठ प्रमुख मनोज पांडे उपस्थित होते.सहकार चळवळीलागतवैभव प्राप्त व्हावेचरेगावकर म्हणाले, ९७ व्या घटनादुरुस्तीत सहकाराला स्वायत्तता द्या, व्यावसायिकता आणा आणि लोकशाहीने नियंत्रण आणण्याचा सूचना केल्या आहेत. जे सभासद प्रश्न विचारतात ते विरोधक होतात. तर दुसरीकडे सभासद पतसंस्थेचे मालक आहेत, असे अध्यक्ष सांगतात. हा विरोधाभास आहे. समाजाचा सहकारावर विश्वास आहे. सभासद व संचालकांना प्रशिक्षण देण्यासाठी संगणक साक्षरता विभाग बनवावा लागेल. राज्यातील १७ हजार पतसंस्थांमध्ये लोकांच्या ५९ हजार कोटींच्या ठेवी आहेत. सहकारी संस्थांचा नफा सभासदांमध्ये वाटला जातो. पण पतसंस्था, दूध डेअरी असो वा साखर कारखाने, यांचे वय वाढल्यामुळे आजार जडले. सहकार चळवळ समाजाचा विश्वास संपादन करण्यास कमी पडली. नागरी बँकांचे विश्वस्त न राहता मालक झाले आणि बँकांना गालबोट लागले. मोठे उद्योजक समाजाच्या पैशावर खासगी उद्योग चालवितात. मग सहकार चळवळ का नाही? असा सवाल करीत त्यांनी सहकार चळवळीतील मरगळ दूर करून गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.कांचन गडकरी यांनी महिला बचत गटांना सक्षम करून त्यांना सोयीसुविधा पुरविण्याचे आवाहन केले. महिलांचा सहकारात सहभाग कसा राहील, यावर त्यांनी भाष्य केले.संचालन सहकार भारतीचे विदर्भ प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले तर सहकार भारती नागपूरचे अध्यक्ष भरत महाशब्दे यांनी आभार मानले. समापन मंत्र अंजली मुळे यांनी म्हटला.परिषदेत नागपुरातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.