शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सहकार क्षेत्राने तंत्रज्ञानातील बदल स्वीकारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांनी एकत्र येऊन काम करणे म्हणजे सहकार. सहकारी संस्थांना एनपीए सक्तीचे केले त्यावेळी या क्षेत्रातील लोक संभ्रमावस्थेत होते. आयकर कायदा आणि जीएसटी संदर्भातही हीच स्थिती आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू कमी झाल्या आहेत. सहकार कायद्यात वेळोवेळी होणाºया बदलांमुळे संचालक व सभासदांना भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. बदलत्या ...

ठळक मुद्देशेखर चरेगांवकर : सहकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांनी एकत्र येऊन काम करणे म्हणजे सहकार. सहकारी संस्थांना एनपीए सक्तीचे केले त्यावेळी या क्षेत्रातील लोक संभ्रमावस्थेत होते. आयकर कायदा आणि जीएसटी संदर्भातही हीच स्थिती आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू कमी झाल्या आहेत. सहकार कायद्यात वेळोवेळी होणाºया बदलांमुळे संचालक व सभासदांना भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचा सहकार क्षेत्राने सकारात्मक दृष्टीने स्वीकार करावा, असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी येथे व्यक्त केले.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर आणि सहकार भारती नागपूरच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहकारी परिषदेचे आयोजन गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, समृद्धी सहकारी बँक लि. नागपूरच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मुकुंदराव तापकीर, संघटन मंत्री नीळकंठ देवांगण, विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संस्था मर्या.नागपूरचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था, नागपूरचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, सहकारी संस्था नागपूरचे जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, सहकार भारती विदर्भचे प्रकोष्ठ प्रमुख मनोज पांडे उपस्थित होते.सहकार चळवळीलागतवैभव प्राप्त व्हावेचरेगावकर म्हणाले, ९७ व्या घटनादुरुस्तीत सहकाराला स्वायत्तता द्या, व्यावसायिकता आणा आणि लोकशाहीने नियंत्रण आणण्याचा सूचना केल्या आहेत. जे सभासद प्रश्न विचारतात ते विरोधक होतात. तर दुसरीकडे सभासद पतसंस्थेचे मालक आहेत, असे अध्यक्ष सांगतात. हा विरोधाभास आहे. समाजाचा सहकारावर विश्वास आहे. सभासद व संचालकांना प्रशिक्षण देण्यासाठी संगणक साक्षरता विभाग बनवावा लागेल. राज्यातील १७ हजार पतसंस्थांमध्ये लोकांच्या ५९ हजार कोटींच्या ठेवी आहेत. सहकारी संस्थांचा नफा सभासदांमध्ये वाटला जातो. पण पतसंस्था, दूध डेअरी असो वा साखर कारखाने, यांचे वय वाढल्यामुळे आजार जडले. सहकार चळवळ समाजाचा विश्वास संपादन करण्यास कमी पडली. नागरी बँकांचे विश्वस्त न राहता मालक झाले आणि बँकांना गालबोट लागले. मोठे उद्योजक समाजाच्या पैशावर खासगी उद्योग चालवितात. मग सहकार चळवळ का नाही? असा सवाल करीत त्यांनी सहकार चळवळीतील मरगळ दूर करून गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.कांचन गडकरी यांनी महिला बचत गटांना सक्षम करून त्यांना सोयीसुविधा पुरविण्याचे आवाहन केले. महिलांचा सहकारात सहभाग कसा राहील, यावर त्यांनी भाष्य केले.संचालन सहकार भारतीचे विदर्भ प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले तर सहकार भारती नागपूरचे अध्यक्ष भरत महाशब्दे यांनी आभार मानले. समापन मंत्र अंजली मुळे यांनी म्हटला.परिषदेत नागपुरातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.