शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शैक्षणिक सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:19 IST

विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शैक्षणिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव देणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षण विभागात प्रात्यक्षिक ज्ञानातून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले शैक्षणिक सामंजस्य करार (एमओयु) फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन नागपूर तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देगुलाबराव ठाकरे : शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचा २० कंपन्यांशी करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शैक्षणिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव देणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षण विभागात प्रात्यक्षिक ज्ञानातून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले शैक्षणिक सामंजस्य करार (एमओयु) फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन नागपूर तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी केले.शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाने विदर्भातील २० विविध औद्योगिक संस्थाशी शैक्षणिक उपक्रमांचे सामंजस्य करार केले. एमओयु स्वाक्षरीच्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्हीएनआयटीचे विश्वस्त व्ही. आर. जामदार, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आणि प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, भारतातील अभियंता जगात सर्वोत्तम आहेत. अशा सामंजस्य करारांमुळे तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उद्योगसमूहाशी थेट संबंध साधता येतो. काळानुसार गुणवत्तेची संकल्पना बदलत आहे. अशा बदलत्या संकल्पनेची डोळसपणे दखल घेऊन शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाने स्वयंस्फूतीर्ने हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. त्यातून शैक्षणिक ज्ञानाला उद्योगसमूहातील प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड मिळेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. शैक्षणिक उपक्रमात उद्योगसमूहांच्या प्रकल्प भेटींचे अहवाल तयार करणे, तज्ज्ञांची व्याख्याने यातून विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला उद्योगाभिमुखतेची जोड मिळेल. विद्यापीठ व तंत्रशिक्षण संस्था यांच्यात असे करार करण्याची गरज असून, समाजाला हवा असलेला उद्योगाभिमुख अभियंता अशा करारांमधूनच मिळेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.विश्वास जामदार म्हणाले, पुस्तकी ज्ञानाचे दिवस आता संपले असून, प्रात्यक्षिक अनुभव असलेल्या कुशल मनुष्यबळाला आज मागणी आहे. देशात खूप मोठ्या कंपन्या असून, अशा कंपन्यांना आयआयटीच्या माध्यमातून कुशल अभियंते मिळत आहे. मात्र सर्वजण आयआयटीमधून शिक्षण घेऊ शकत नाही. आपण काळानुसार आव्हान स्वीकारत आहोत. या करारातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जातील. उद्योगभिमुख नोकरी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. अतुल पांडे यांनी संस्थेच्या इतिहासात हा सुवर्णक्षण असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विविध कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या करारासाठी समन्वयक डॉ. राजेश्वरी वानखेडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनिया राऊत यांनी केले. तर संचालन डॉ. रुपाली हिरुरकर यांनी केले. डॉ. राजेश्वरी वानखेडे यांनी आभार मानले.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजnagpurनागपूर