शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पांडव कॉलेजच्या वसतिगृहात २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:46 IST

उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव कॉलेजच्या वसतिगृहातून परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री समोर आली. यातील ११ विद्यार्थिनींवर मेडिकलमध्ये उपचार करून परत पाठविण्यात आले, तर १४ विद्यार्थिनींना वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये दाखल करून घेण्यात आले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव कॉलेजच्या वसतिगृहातून परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री समोर आली. यातील ११ विद्यार्थिनींवर मेडिकलमध्ये उपचार करून परत पाठविण्यात आले, तर १४ विद्यार्थिनींना वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये दाखल करून घेण्यात आले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ‘स्कील इंडिया’कार्यक्रमांतर्गत उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन महिन्यांचे ‘नर्सिंग’चे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थिनी पांडव कॉलेजच्या वसतिगृहात निवासी राहून हे प्रशिक्षण घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, या वसतिगृहात ३०० च्यावर विद्यार्थिनी आहेत. रविवार ९ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थिनींनी जेवण केले. जेवण केल्यानंतर थोड्या वेळाने ५० च्यावर विद्यार्थिनींना उलटी, मळमळ व चक्कर येणे सुरू झाले. विद्यार्थिनींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. काही विद्यार्थिनींना खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले, तर साधारण २५ वर विद्यार्थिनींना एका वसतिगृहाच्या महिला कर्मचारीने रात्री १० वाजताच्या सुमारास मेडिकल रुग्णालयात आणले. मेडिसीन अपघात विभागात तातडीने उपचाराला सुरुवात झाली. २५ पैकी नऊ ते दहा विद्यार्थिनींना प्राथमिक उपचारानंतर त्याचवेळी सुटी देण्यात आली, तर १४ विद्यार्थिनींची प्रकृती बघता त्यांना डॉ. दीप्ती चांद यांच्या नियंत्रणाखाली वॉर्ड ४९ मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.प्रकृती धोक्याबाहेरमेडिकलचे उपअधीक्षक डॉ. गिरीश भुयार यांनी सांगितले, अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयित १४ विद्यार्थिनींची प्रकृती उपचारानंतर धोक्याबाहेर आहे. मंगळवार किंवा बुधवारी त्यांना सुटी देण्यात येईल.

 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी