शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

अवयव प्रत्यारोपण झालेले ७५ टक्क्यांवर रुग्ण पाच वर्षापर्यंत जगतात; नागपूर विभागातील अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 07:45 IST

Nagpur News मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षात जवळपास ८८ टक्के तर पाच वर्षांत ७५ टक्के रुग्णांना आयुष्य जगण्याची आणखी एक संधी मिळत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपहिल्या वर्षात जगण्याचा दर ८८ टक्क्यांवर

सुमेध वाघमारे

नागपूर : अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णावर ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळालेल्या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण होत असल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. नागपुरातील तज्ज्ञांनी प्रत्यारोपणानंतर रुग्णांचा जगण्याचा अभ्यास केला असता, मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षात जवळपास ८८ टक्के तर पाच वर्षांत ७५ टक्के रुग्णांना आयुष्य जगण्याची आणखी एक संधी मिळत असल्याचे दिसून आले.

जो जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. केवळ आप्तेष्टांच्या आठवणीत जिवंत राहते. परंतु अवयवदानाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे अस्तित्व प्रत्यक्षात जिवंत राहते. याची जनजागृती वाढल्याने व काही लोक यासाठी पुढाकार घेत असल्याने, अनेक गरजू रुग्णांना नवआयुष्य मिळत आहे. ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या वतीने (झेडटीसीसी) २०१३ ते ३१ मार्च २०२२ यादरम्यान ८९ ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवांचे दान झाले. यात १५४ मूत्रपिंड तर ६० यकृत प्रत्यारोपण झाले. हा आकडा समाधानकारक असला तरी गरजू रुग्णांची संख्या पाहता, यात आणखी वाढ होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 अमेरिकेत मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर पाच वर्षांपर्यंत ८६ टक्के रुग्ण जगतात

झेडटीसीसीच्या मूत्रपिंड समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एल. गुप्ता यांनी १४० मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणानंतर जगत असलेल्या रुग्णांचा छोटेखानी अभ्यास केला. यात त्यांना नागपूर विभागात पहिल्या वर्षापर्यंत ८८.१३ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ७४.५७ टक्के रुग्ण जगत असल्याचे दिसून आले. भारतात एकूण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षापर्यंत ८८.२ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ६१.७१ टक्के रुग्ण जगतात. अमेरिकेत पहिल्या वर्षापर्यंत ९५ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ८६ टक्के रुग्ण जगत असल्याची माहिती आहे.

- नागपूर विभागात यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षापर्यंत ८३ टक्के रुग्ण जगतात

झेडटीसीसीच्या यकृत प्रत्यारोपणाचे सहसचिव डॉ. राहुल सक्सेना यांनी सांगितले, नागपूर विभागात यकृत प्रत्यारोपण सुरू होऊन तीनच वर्षे झाली आहेत. आतापर्यंत ६० यकृतांचे प्रत्यारोपण झाले. त्यानुसार नागपूर विभागात पहिल्या वर्षापर्यंत ८८ टक्के एकूण भारतात ८५ टक्के तर अमेरिकेत ९३ टक्के रुग्ण जगतात. तीन वर्षानंतर हेच प्रमाण नागपूर विभागासह भारतात व अमेरिकेत ८५ टक्क्यांपर्यंत आहे.

- प्रत्यारोपणानंतर तरुण रुग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण अधिक 

मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर रुग्ण जगण्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. प्रत्यारोपणानंतर तरुण रुग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण अधिक आहे. पाच वर्षांपर्यंत जगण्याचे प्रमाण कमी होण्यामागे इतर गंभीर आजार कारणीभूत ठरतात.

- डॉ. व्ही. एल. गुप्ता, अध्यक्ष मूत्रपिंड समिती झेडटीसीसी

 यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षात संसर्गाचा धोका अधिक 

यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षात संसर्गाचा धोका अधिक राहतो. त्यानंतर रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. परंतु औषधांच्या दुष्परिणामामुळे इतर अवयवांचे आजार वाढण्याचा धोका असतो. यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.

- डॉ. राहुल सक्सेना, सहसचिव यकृत प्रत्यारोपण झेडटीसीसी

टॅग्स :Healthआरोग्य