शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

अवयव प्रत्यारोपण झालेले ७५ टक्क्यांवर रुग्ण पाच वर्षापर्यंत जगतात; नागपूर विभागातील अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 07:45 IST

Nagpur News मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षात जवळपास ८८ टक्के तर पाच वर्षांत ७५ टक्के रुग्णांना आयुष्य जगण्याची आणखी एक संधी मिळत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपहिल्या वर्षात जगण्याचा दर ८८ टक्क्यांवर

सुमेध वाघमारे

नागपूर : अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णावर ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळालेल्या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण होत असल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. नागपुरातील तज्ज्ञांनी प्रत्यारोपणानंतर रुग्णांचा जगण्याचा अभ्यास केला असता, मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षात जवळपास ८८ टक्के तर पाच वर्षांत ७५ टक्के रुग्णांना आयुष्य जगण्याची आणखी एक संधी मिळत असल्याचे दिसून आले.

जो जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. केवळ आप्तेष्टांच्या आठवणीत जिवंत राहते. परंतु अवयवदानाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे अस्तित्व प्रत्यक्षात जिवंत राहते. याची जनजागृती वाढल्याने व काही लोक यासाठी पुढाकार घेत असल्याने, अनेक गरजू रुग्णांना नवआयुष्य मिळत आहे. ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या वतीने (झेडटीसीसी) २०१३ ते ३१ मार्च २०२२ यादरम्यान ८९ ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवांचे दान झाले. यात १५४ मूत्रपिंड तर ६० यकृत प्रत्यारोपण झाले. हा आकडा समाधानकारक असला तरी गरजू रुग्णांची संख्या पाहता, यात आणखी वाढ होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 अमेरिकेत मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर पाच वर्षांपर्यंत ८६ टक्के रुग्ण जगतात

झेडटीसीसीच्या मूत्रपिंड समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एल. गुप्ता यांनी १४० मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणानंतर जगत असलेल्या रुग्णांचा छोटेखानी अभ्यास केला. यात त्यांना नागपूर विभागात पहिल्या वर्षापर्यंत ८८.१३ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ७४.५७ टक्के रुग्ण जगत असल्याचे दिसून आले. भारतात एकूण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षापर्यंत ८८.२ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ६१.७१ टक्के रुग्ण जगतात. अमेरिकेत पहिल्या वर्षापर्यंत ९५ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ८६ टक्के रुग्ण जगत असल्याची माहिती आहे.

- नागपूर विभागात यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षापर्यंत ८३ टक्के रुग्ण जगतात

झेडटीसीसीच्या यकृत प्रत्यारोपणाचे सहसचिव डॉ. राहुल सक्सेना यांनी सांगितले, नागपूर विभागात यकृत प्रत्यारोपण सुरू होऊन तीनच वर्षे झाली आहेत. आतापर्यंत ६० यकृतांचे प्रत्यारोपण झाले. त्यानुसार नागपूर विभागात पहिल्या वर्षापर्यंत ८८ टक्के एकूण भारतात ८५ टक्के तर अमेरिकेत ९३ टक्के रुग्ण जगतात. तीन वर्षानंतर हेच प्रमाण नागपूर विभागासह भारतात व अमेरिकेत ८५ टक्क्यांपर्यंत आहे.

- प्रत्यारोपणानंतर तरुण रुग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण अधिक 

मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर रुग्ण जगण्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. प्रत्यारोपणानंतर तरुण रुग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण अधिक आहे. पाच वर्षांपर्यंत जगण्याचे प्रमाण कमी होण्यामागे इतर गंभीर आजार कारणीभूत ठरतात.

- डॉ. व्ही. एल. गुप्ता, अध्यक्ष मूत्रपिंड समिती झेडटीसीसी

 यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षात संसर्गाचा धोका अधिक 

यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षात संसर्गाचा धोका अधिक राहतो. त्यानंतर रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. परंतु औषधांच्या दुष्परिणामामुळे इतर अवयवांचे आजार वाढण्याचा धोका असतो. यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.

- डॉ. राहुल सक्सेना, सहसचिव यकृत प्रत्यारोपण झेडटीसीसी

टॅग्स :Healthआरोग्य