शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 10:44 IST

Nagpur News राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली.

ठळक मुद्देमेडिकलने दिली कोरोनाच्या मृत्यूची कारणे ५३.७ टक्के रुग्णांचे शरीरातील ऑक्सिजन प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी होते

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनुकीय बदल (म्युटेशन) झालेल्या ‘बी.१.६.१७’ या कोरोना विषाणूचा जवळपास ७० टक्के रुग्णांना गंभीर संसर्ग झाल्याने मृत्यूची संख्या वाढल्याचे कारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढे केले आहे. या शिवाय, कोरोना रुग्णांना अत्यावश्यक सोयी देण्यास कमी पडलेली महानगरपालिका व आरोग्य विभाग, ग्रामीण व इतर भागातून उपचारासाठी उशिरा आलेले रुग्ण, यात ५३.७ टक्के रुग्णांच्या शरीरातील ९० टक्क्यांपेक्षा कमी असलेली ऑक्सिजनची पातळी, औषधांचा तुटवडा आदी कारणेही दिली आहेत.

राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली. दैनंदिन मृत्यूचे प्रमाणही ५० ते १००च्या दरम्यान होते. विशेष म्हणजे, जुलै ते सप्टेंबर २०२० या कोरोनाचा पहिल्या लाटेत शासकीयसह खासगी रुग्णालयात २३४५८ रुग्णांपैकी २६४१ (११.२६टक्के) तर, एप्रिल ते मे २०२१ या दुसऱ्या लाटेत ३७२३४ रुग्णांपैकी ७३११ (१९.६४ टक्के ) रुग्णांचे जीव गेले. या मागे ‘म्युटेशन’ झालेला घातक विषाणू व इतरही कारणे असल्याचे मेडिकलने स्पष्ट केले आहे.

-मेडिकलमध्ये दुसऱ्या लाटेत २४७२ रुग्णांचा मृत्यू

मेडिकलमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२१ या दरम्यान ६३४७ कोरोनाचे गंभीर रुग्ण भरती झाले. यातील २४७२ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील केवळ ११ टक्के रुग्णांचा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. उर्वरीत रुग्णांची पातळी धोकादायक स्थितीत होती. शिवाय, ३६८ (१५ टक्के) रुग्ण म्हणजे मृतावस्थेत दाखल झाले. ४६९ रुग्ण (१९ टक्के ) गंभीर होऊन आल्याने त्यांचा २४ तासाच्या आतच मृत्यू झाला.

-रुग्ण गंभीर होऊन येणाऱ्यांची संख्या मोठी

मेडिकल हे ‘टर्शरी केअर सेंटर’ आहे. यामुळे शहरातील खासगीसह ग्रामीण भागातील रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला मेडिकलमध्ये पाठविण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळेही मृत्यूची संख्या वाढल्याचे मेडिकलचे म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेत बाहेरगावावरून आलेल्या १३.८ टक्के म्हणजे, ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला. इतर शासकीय व खासगी रुग्णालयातून आलेल्या ५.० टक्के म्हणजे, १२४ रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांना भरती करून घेतले जात नसल्याचेही एक कारण आहे.

-ग्रामीण भागात व्हेंटिलेटरचा एकही बेड नाही

पहिल्या लाटेत सुरुवातीला कोविड केअर सेंटर नसल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही मेडिकलमध्ये भरती केले जात होते. यामुळे मेडिकलमध्ये मृत्यूचा दर ११.२६ टक्के होता. परंतु दुसऱ्या लाटेत विशेषत: ग्रामीण भागात ‘व्हेंटिलेटर’बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. यामुळे मृत्यूचा दर वाढून १९.६४ टक्क्यांवर गेल्याचे कारण मेडिकलने दिले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस