शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 10:44 IST

Nagpur News राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली.

ठळक मुद्देमेडिकलने दिली कोरोनाच्या मृत्यूची कारणे ५३.७ टक्के रुग्णांचे शरीरातील ऑक्सिजन प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी होते

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनुकीय बदल (म्युटेशन) झालेल्या ‘बी.१.६.१७’ या कोरोना विषाणूचा जवळपास ७० टक्के रुग्णांना गंभीर संसर्ग झाल्याने मृत्यूची संख्या वाढल्याचे कारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढे केले आहे. या शिवाय, कोरोना रुग्णांना अत्यावश्यक सोयी देण्यास कमी पडलेली महानगरपालिका व आरोग्य विभाग, ग्रामीण व इतर भागातून उपचारासाठी उशिरा आलेले रुग्ण, यात ५३.७ टक्के रुग्णांच्या शरीरातील ९० टक्क्यांपेक्षा कमी असलेली ऑक्सिजनची पातळी, औषधांचा तुटवडा आदी कारणेही दिली आहेत.

राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली. दैनंदिन मृत्यूचे प्रमाणही ५० ते १००च्या दरम्यान होते. विशेष म्हणजे, जुलै ते सप्टेंबर २०२० या कोरोनाचा पहिल्या लाटेत शासकीयसह खासगी रुग्णालयात २३४५८ रुग्णांपैकी २६४१ (११.२६टक्के) तर, एप्रिल ते मे २०२१ या दुसऱ्या लाटेत ३७२३४ रुग्णांपैकी ७३११ (१९.६४ टक्के ) रुग्णांचे जीव गेले. या मागे ‘म्युटेशन’ झालेला घातक विषाणू व इतरही कारणे असल्याचे मेडिकलने स्पष्ट केले आहे.

-मेडिकलमध्ये दुसऱ्या लाटेत २४७२ रुग्णांचा मृत्यू

मेडिकलमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२१ या दरम्यान ६३४७ कोरोनाचे गंभीर रुग्ण भरती झाले. यातील २४७२ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील केवळ ११ टक्के रुग्णांचा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. उर्वरीत रुग्णांची पातळी धोकादायक स्थितीत होती. शिवाय, ३६८ (१५ टक्के) रुग्ण म्हणजे मृतावस्थेत दाखल झाले. ४६९ रुग्ण (१९ टक्के ) गंभीर होऊन आल्याने त्यांचा २४ तासाच्या आतच मृत्यू झाला.

-रुग्ण गंभीर होऊन येणाऱ्यांची संख्या मोठी

मेडिकल हे ‘टर्शरी केअर सेंटर’ आहे. यामुळे शहरातील खासगीसह ग्रामीण भागातील रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला मेडिकलमध्ये पाठविण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळेही मृत्यूची संख्या वाढल्याचे मेडिकलचे म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेत बाहेरगावावरून आलेल्या १३.८ टक्के म्हणजे, ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला. इतर शासकीय व खासगी रुग्णालयातून आलेल्या ५.० टक्के म्हणजे, १२४ रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांना भरती करून घेतले जात नसल्याचेही एक कारण आहे.

-ग्रामीण भागात व्हेंटिलेटरचा एकही बेड नाही

पहिल्या लाटेत सुरुवातीला कोविड केअर सेंटर नसल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही मेडिकलमध्ये भरती केले जात होते. यामुळे मेडिकलमध्ये मृत्यूचा दर ११.२६ टक्के होता. परंतु दुसऱ्या लाटेत विशेषत: ग्रामीण भागात ‘व्हेंटिलेटर’बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. यामुळे मृत्यूचा दर वाढून १९.६४ टक्क्यांवर गेल्याचे कारण मेडिकलने दिले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस