शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपूरमध्ये देशाचे केंद्र होण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:32 IST

नागपूरचा विकास गतीने होत आहे. गडकरी व फडणवीस हे दोन्ही नेते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन : कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचा विकास गतीने होत आहे. गडकरी व फडणवीस हे दोन्ही नेते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नागपूर स्मार्ट सिटी होणार आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात नागपूरचा विकास होत आहे. देशाचे हृदयस्थान असलेल्या या शहरात देशाच्या विकासाचे केंद्र होण्याची क्षमता आहे, अशा शब्दात राष्ट्रपती कोविंद यांनी नागपूरचे महत्त्व अधोरेखित केले. नागपूर महापालिकेतर्फे रेशीमबाग मैदानावर उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण व कवी सुरेश भट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल उपस्थित होते.नागपूरचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध होणार : गडकरीयावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेला सांस्कृतिक क्षेत्राने समृद्ध केले आहे. यात कवी, साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र ही गुणवंतांची खाणच आहे. सुरेश भट सभागृह प्रत्यक्ष साकारणे ही स्वप्नपूर्तीच आहे. यामुळे नागपुरातील सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार असून हे क्षेत्र आणखी प्रगल्भ व समृद्ध होणार आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. देशातील आकर्षक सभागृहांमध्ये याचा समावेश होणार असून याच्या उभारणीत अनेक अडचणीदेखील आल्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी यात मोठे सहकार्य केले. हे काम सर्वोत्कृष्ट व्हावे हा माझा सुरुवातीपासूनचा आग्रह होता. एरवी मी कामातील त्रुटी शोधतच असतो. मात्र या सभागृहाचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे आहे, असेदेखील गडकरी म्हणाले. या सभागृहाचा विधायक उपयोग व्हायला हवा. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांना सभागृह कमी किमतीत उपलब्ध करून द्यावे. पाच हजार रुपयांच्या वर याचे भाडे अशा लोकांकडून घेण्यात येऊ नये, असे आवाहन गडकरींनी मनपा प्रशासनाला केले. नागपूर मनपाने देशातील सर्व महानगरपालिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असेदेखील गडकरी म्हणाले. यावेळी गडकरी यांनी सुरेश भट यांच्या आठवणींना उजाळा दिला.‘भट हे प्रतिभाशाली कवी तर होतेच, शब्दांचे जादुगारही होते. त्यांचे काव्य मनाचा वेध घ्यायचे. ते तितकेच स्फोटकदेखील होते. अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली.’महाराष्ट्र देशाला नवी शक्ती देऊ शकतोमहाराष्ट्र ही वीर, क्रांतिकारी, संत व महापुरुषांची भूमी आहे. या राज्याने देशाला रत्न प्रदान केले असून नेतृत्वाचा एक प्रवाह दिला आहे. सामाजिक बदलांसाठी महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रानेच देशाला स्त्री शिक्षणाचा मार्ग दाखविला. संगीत, कला, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान मोठे आहे. २१ व्या शतकात महाराष्ट्र देशाला नवी शक्ती देऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.यावेळी राष्ट्रपती कोविंद म्हणाले, नागपुरात साक्षरतेचे प्रमाण ९२ टक्के झाले असून पुणे, औरंगाबाद व मुंबईलाही मागे टाकले आहे. नागपूर हा राज्यातील सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूरचे लोक देशाच्या विकासात आपली भूमिका पार पाडत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कवी सुरेश भट यांनी मराठी भाषेचा सन्मान द्विगुणित केला. त्यांचा पाय लहानपणापासून पोलिओग्रस्त होता. मात्र, शारीरिक व्याधीवर मात करीत त्यांनी प्रतिभेच्या बळावर लोकप्रियता मिळवली. परिस्थितीवर मात करून यश मिळविण्याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.जुन्या नागपूरने जपलीय संस्कृतीनागपुरात पुलाच्या पलीकडचे व अलीकडचे असे जुने व नवीन नागपूर आहे. पश्चिम नागपूरला नवीन व मॉडर्न भाग मानण्यात येते. मात्र मी जुन्या शहरात राहत असल्याचा मला अभिमान आहे. जुन्या नागपूरने संस्कृती, परंपरा जपली आहे. येथील गरीब लोक, आठवडी बाजार यात आजही आत्मीयता दिसून येते. हा भाग मी कधीच सोडणार नाही, अशी भावना गडकरींनी व्यक्त केली.