शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘आप’ राज्यातील सर्व जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:01 IST

गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. सातत्याने प्रयत्न करूनदेखील ‘आप’ला राज्यात आपले हवे तसे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. अशा स्थितीत ग्रामीण पातळीवर संघटन मजबुतीवर ‘आप’तर्फे भर देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांच्या नियोजनाबाबत मंथन : शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. सातत्याने प्रयत्न करूनदेखील ‘आप’ला राज्यात आपले हवे तसे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. अशा स्थितीत ग्रामीण पातळीवर संघटन मजबुतीवर ‘आप’तर्फे भर देण्यात येणार आहे.२ व ३ नोव्हेंबर ला ‘आप’चे महाराष्ट्र राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या नियोजनावर सखोल मंथन करण्यात आले. नेमक्या कुठल्या मतदारसंघात ‘आप’चे प्राबल्य आहे, तसेच मतांच्या गणितात ‘आप’ कसा बदल घडवून आणू शकेल यावर चर्चा झाली. राज्यातील सर्व लोकसभा क्षेत्रांसाठी संघटन प्रमुख नियुक्त करण्यात आले. तसेच पुढील दोन महिन्यात गाव व वॉर्ड स्तराची जबाबदारी निश्चित करण्याचादेखील निर्णय यावेळी झाला.बैठकीला ‘आप’चे राज्य संयोजक सुधीर सावंत, सहसंयोजक रंगा राचुरे, सचिव सुभाष तंवर, कोषाध्यक्ष जगजितसिंग, अजिंक्य शिंदे, उन्मेष बागवे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.गावित, अलीम पटेल, धनंजय शिंदे, किशोर मानध्यान, डॉ.देवेंद्र वानखडे, कविता सिंघल प्रामुख्याने उपस्थित होते.संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावाया बैठकीत शेतकरी समस्या व दुष्काळग्रस्त परिस्थितीवरदेखील चर्चा झाली. राज्य शासनाने सर्व राज्यात दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पक्षातर्फे व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.

टॅग्स :AAPआपElectionनिवडणूक