शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नागपूर जिल्ह्यातील  नरखेडला येणार आमिर खान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:05 IST

दुष्काळाने होरपळलेल्या गावामध्ये जलक्रांती व्हावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियमात पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा समावेश झाला असून, नरखेड तालुक्यातील ६६ गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

ठळक मुद्देवॉटरकप स्पर्धेत नरखेडातील ६६ गाव सहभागी : गावागावात स्पर्धेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दुष्काळाने होरपळलेल्या गावामध्ये जलक्रांती व्हावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियमात पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा समावेश झाला असून, नरखेड तालुक्यातील ६६ गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ‘जलसंधारणातून मनसंधारण’ हे ब्रीद या स्पर्धेचे असून, सिने अभिनेता आमिर खान खुद्द या स्पर्धेत सहभागी गावांना भेटी देऊन गावकऱ्यांना प्रोत्साहित करतो. स्पर्धेतील गावकऱ्यांचा जोश बघता नरखेडातही आमिर खान येऊ शकतो.डिसेंबरपासून वॉटरकप स्पर्धेसाठी नरखेड तालुक्यात पाणी फाऊंडेशन व जिल्हा प्रशासनाने वातावरण निर्मिती केली आहे. जिल्ह्यात नरखेड तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने, हा तालुका दुष्काळाच्या सावटात आला आहे. पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमातून जलक्रांती व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. तालुक्यातील १५५ गावापैकी सुरुवातीला १०१ गावकऱ्यांनी सहमती दर्शविली. परंतु या स्पर्धेतील काही टप्पे काही गावांना पुर्ण करणे शक्य झाले नाही. अखेर या स्पर्धेसाठी ६६ गावांचे गावकरी पुढे आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या गावांनी स्पर्धेपुर्वीची सांडपाण्याचे शोष खड्डे, नर्सरी, आगपेटीमुक्त शिवार, माती परीक्षण ही कामे पुर्ण केली आहे. ८ एप्रिल ते २२ मार्च हा स्पर्धेचा कालावधी असून, गावकरी जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. गावागावात बैठका, चर्चा, नियोजनाचे फड रंगत आहे. लहान थोराबरोबरच महिलाही या स्पर्धेत खांद्याला खांद्या लावून उतरल्या आहे. गावकऱ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे, कृषी अधिकारी वर्ग २ पल्लवी तलमले सातत्याने गावकऱ्यांशी संपर्कात आहे. विशेष म्हणजे डॉ. बलकवडे यांना या प्रकल्पाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावात एकोपा निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून राज्याचे पहिले पारितोषिक पटकाविण्याचा मानस बनविला आहे.

टॅग्स :WaterपाणीSportsक्रीडा