शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नागपूर जिल्ह्यातील  नरखेडला येणार आमिर खान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:05 IST

दुष्काळाने होरपळलेल्या गावामध्ये जलक्रांती व्हावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियमात पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा समावेश झाला असून, नरखेड तालुक्यातील ६६ गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

ठळक मुद्देवॉटरकप स्पर्धेत नरखेडातील ६६ गाव सहभागी : गावागावात स्पर्धेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दुष्काळाने होरपळलेल्या गावामध्ये जलक्रांती व्हावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियमात पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा समावेश झाला असून, नरखेड तालुक्यातील ६६ गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ‘जलसंधारणातून मनसंधारण’ हे ब्रीद या स्पर्धेचे असून, सिने अभिनेता आमिर खान खुद्द या स्पर्धेत सहभागी गावांना भेटी देऊन गावकऱ्यांना प्रोत्साहित करतो. स्पर्धेतील गावकऱ्यांचा जोश बघता नरखेडातही आमिर खान येऊ शकतो.डिसेंबरपासून वॉटरकप स्पर्धेसाठी नरखेड तालुक्यात पाणी फाऊंडेशन व जिल्हा प्रशासनाने वातावरण निर्मिती केली आहे. जिल्ह्यात नरखेड तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने, हा तालुका दुष्काळाच्या सावटात आला आहे. पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमातून जलक्रांती व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. तालुक्यातील १५५ गावापैकी सुरुवातीला १०१ गावकऱ्यांनी सहमती दर्शविली. परंतु या स्पर्धेतील काही टप्पे काही गावांना पुर्ण करणे शक्य झाले नाही. अखेर या स्पर्धेसाठी ६६ गावांचे गावकरी पुढे आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या गावांनी स्पर्धेपुर्वीची सांडपाण्याचे शोष खड्डे, नर्सरी, आगपेटीमुक्त शिवार, माती परीक्षण ही कामे पुर्ण केली आहे. ८ एप्रिल ते २२ मार्च हा स्पर्धेचा कालावधी असून, गावकरी जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. गावागावात बैठका, चर्चा, नियोजनाचे फड रंगत आहे. लहान थोराबरोबरच महिलाही या स्पर्धेत खांद्याला खांद्या लावून उतरल्या आहे. गावकऱ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे, कृषी अधिकारी वर्ग २ पल्लवी तलमले सातत्याने गावकऱ्यांशी संपर्कात आहे. विशेष म्हणजे डॉ. बलकवडे यांना या प्रकल्पाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावात एकोपा निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून राज्याचे पहिले पारितोषिक पटकाविण्याचा मानस बनविला आहे.

टॅग्स :WaterपाणीSportsक्रीडा