शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

आकाशवाणीच्या ‘अनुरणन’ स्मरणिकेचे प्रकाशन

By admin | Updated: January 10, 2016 03:34 IST

आकाशवाणी म्हणजे जनमनाची वाणी आहे. नागपूर आकाशवाणीने प्रकाशात आणलेल्या प्रतिभावान कलावंत, ..

नागपूर : आकाशवाणी म्हणजे जनमनाची वाणी आहे. नागपूर आकाशवाणीने प्रकाशात आणलेल्या प्रतिभावान कलावंत, साहित्यिक, कवींच्या अमिट स्मृतीच्या ‘अनुरणन’ स्मरणिकेचे प्रकाशन आकाशवाणीच्या कविसंमेलनात करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे सहायक केंद्र निर्देशक आर. के. गोविंदराजन तसेच सहायक निदेशक आर. आर. ढवळे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, आकाशवाणीने कार्यक्रमांचा दर्जा अधिक वाढवावा. गतिशीलतेने देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती पोहचविणारे हे सर्वाधिक सशक्त माध्यम आहे, असे ते म्हणाले. गोविंदराजन यांनी आकाशवाणीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आकाशवाणी वार्षिक पुरस्कार स्पर्धेत २०१४ साली संपूर्ण देशातून द्वितीय स्थानी आलेल्या ‘पानी डूब रहा है’ या हिंदी आणि ‘हलन्त’ या मराठी रुपकाचे सादरकर्ते हरीश पाराशर, संगीता अरजपुरे, रवींद्र भुसारी यांचा बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे रुपक नागपूर केंद्रातर्फे सादर करण्यात आले होेते. कार्यक्रमाचे निवेदन अशोक जांभुळकर यांनी केले. अनुरणन स्मरणिकेचे संपादन आर. के. गोविंदराजन, रवींद्र भुसारी, राधिका पात्रीकर यांनी केले. याप्रसंगी आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रसारभारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश, जवाहर सरकार, केंद्रीय सूचना व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, विख्यात उद्घोषक अमिन सायानी, भजन सम्राट अनुप जलोटा, मंगला खाडिलकर, संगीतकार राम लक्ष्मण, स्व. रवीन्द्र जैन यांच्या शुभेच्छांनी हा कार्यक्रम लक्षणीय ठरला. (प्रतिनिधी)