शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

प्रभातफेरी काढली, झेंडा फडकाविला म्हणून वर्षभराचा कारावास

By निशांत वानखेडे | Updated: August 9, 2023 11:08 IST

ऑगस्ट क्रांतिदिन विशेष : स्वातंत्र्याचे ते मंतरलेले दिवस : पुंडलिकराव गेडाम यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण

 निशांत वानखेडे

नागपूर : ताे खराेखर मंतरलेला काळ हाेता. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने देशवासीयांच्या तनामनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटली हाेती. या संग्रामात मीही उडी घेतली. भूमिगत नेत्यांच्या आदेशानुसार सीताबर्डी येथे प्रभातफेरी काढली व तिरंगा ध्वज फडकविला. इंग्रज पाेलिसांनी पकडले आणि वर्षभरासाठी कारागृहात डांबले. १८व्या वर्षी कालकाेठडी व कंबल परेड अनुभवलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक डाॅ. पुंडलिकराव गेडाम यांनी ‘भारत छाेडाे आंदाेलना’च्या आठवणींना उजाळा दिला.

१९२४ ला जन्मलेल्या डाॅ. गेडाम यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले, पण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगताना त्यांचा उत्साह तरुणांसारखा वाटताे. १९४२च्या भारत छाेडाे आंदाेलनाच्या वेळी पुंडलिकराव पटवर्धन शाळेत शिकत हाेते व नवव्या वर्गात प्रवेश केला हाेता. नागपुरातही स्वातंत्र्याच्या प्रेरणेने वातावरण भारावले हाेते. त्यावेळी महात्मा गांधी यांच्या मुंबईत झालेल्या सभेत मी सहभागी झालाे हाेताे. महात्मा गांधी यांनी ‘अंग्रेजाे भारत छाेडाे’चा नारा दिला.

संपूर्ण देश इंग्रज राजवटीविरुद्ध पेटून उठला हाेता. आंदाेलन दडपण्यासाठी इंग्रजांनी माेठ्या नेत्यांना एका रात्रीतून अटक केली. त्यातून जयप्रकाश नारायण, अरुण आसफ अली हे सभेतील नेते भूमिगत झाले हाेते. या नेत्यांचा संदेश लाेकांपर्यंत पाेहोचविणे, भूमिगत लाेकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरविणे, लाेकांमध्ये पत्रक वाटणे, पाेस्टर चिकटविणे, विद्यापीठाच्या परीक्षा उधळून लावणे, अशी कामे आमच्या तिसऱ्या फळीतील तरुणांकडे हाेती. यावेळी एकमेव सरकारी असलेल्या पटवर्धन शाळेच्या परीक्षा हाॅलमध्ये मिरचीची पावडर टाकून परीक्षा उधळल्याची आठवणही डाॅ. गेडाम यांनी सांगितली. डाॅ. गेडाम यांच्या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सन्मानपत्र, ताम्रपत्र व २०१७ साली राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नागड्या शरीरावर काठीचा मार : कंबल परेड

प्रभातफेरी काढताना इंग्रजांच्या हाती लागलाे आणि वर्षभर कारागृहात गेलो. नागड्या शरीरावर घाेंगडे पांघरून लाठीने बेदम मारण्याची कंबल परेड अनुभवली. कालकाेठडीतही २४ तास काढले. वर्षभरानंतर सुटका झाली, पुन्हा शाळेत गेलाे. त्यावेळी शिक्षकांनी आंदाेलनात सहभागी हाेणार नाही, असे लेखी आश्वासन देण्यास सांगितले. तसे करण्यास साफ नकार दिला, त्यामुळे शाळेत प्रवेशच मिळाला नाही. त्यामुळे बुटीवाडा येथे टिळक विद्यालयात प्रवेश घेतला.

पदवीच्या वर्षी गांधीजींचा खून

दहावी उत्तीर्ण केली व पुढे सातारा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. हे साडेचार वर्षांचे पदवीचे शिक्षण घेत असताना महात्मा गांधीजींचा खून झाल्याची आठवण डाॅ. गेडाम यांनी सांगितली. १९५२ साली विदर्भात परतल्यानंतर आधी त्यांनी काटाेल व नरखेड येथे स्वत:चा दवाखाना टाकला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून नाेकरी मिळाली. १९८४ साली ते सेवानिवृत्त झाले.

टॅग्स :Socialसामाजिकhistoryइतिहास