शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
2
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
3
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
4
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
5
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
6
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
7
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
10
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
11
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
12
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
13
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
14
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
15
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
16
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
19
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

प्रभातफेरी काढली, झेंडा फडकाविला म्हणून वर्षभराचा कारावास

By निशांत वानखेडे | Updated: August 9, 2023 11:08 IST

ऑगस्ट क्रांतिदिन विशेष : स्वातंत्र्याचे ते मंतरलेले दिवस : पुंडलिकराव गेडाम यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण

 निशांत वानखेडे

नागपूर : ताे खराेखर मंतरलेला काळ हाेता. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने देशवासीयांच्या तनामनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटली हाेती. या संग्रामात मीही उडी घेतली. भूमिगत नेत्यांच्या आदेशानुसार सीताबर्डी येथे प्रभातफेरी काढली व तिरंगा ध्वज फडकविला. इंग्रज पाेलिसांनी पकडले आणि वर्षभरासाठी कारागृहात डांबले. १८व्या वर्षी कालकाेठडी व कंबल परेड अनुभवलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक डाॅ. पुंडलिकराव गेडाम यांनी ‘भारत छाेडाे आंदाेलना’च्या आठवणींना उजाळा दिला.

१९२४ ला जन्मलेल्या डाॅ. गेडाम यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले, पण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगताना त्यांचा उत्साह तरुणांसारखा वाटताे. १९४२च्या भारत छाेडाे आंदाेलनाच्या वेळी पुंडलिकराव पटवर्धन शाळेत शिकत हाेते व नवव्या वर्गात प्रवेश केला हाेता. नागपुरातही स्वातंत्र्याच्या प्रेरणेने वातावरण भारावले हाेते. त्यावेळी महात्मा गांधी यांच्या मुंबईत झालेल्या सभेत मी सहभागी झालाे हाेताे. महात्मा गांधी यांनी ‘अंग्रेजाे भारत छाेडाे’चा नारा दिला.

संपूर्ण देश इंग्रज राजवटीविरुद्ध पेटून उठला हाेता. आंदाेलन दडपण्यासाठी इंग्रजांनी माेठ्या नेत्यांना एका रात्रीतून अटक केली. त्यातून जयप्रकाश नारायण, अरुण आसफ अली हे सभेतील नेते भूमिगत झाले हाेते. या नेत्यांचा संदेश लाेकांपर्यंत पाेहोचविणे, भूमिगत लाेकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरविणे, लाेकांमध्ये पत्रक वाटणे, पाेस्टर चिकटविणे, विद्यापीठाच्या परीक्षा उधळून लावणे, अशी कामे आमच्या तिसऱ्या फळीतील तरुणांकडे हाेती. यावेळी एकमेव सरकारी असलेल्या पटवर्धन शाळेच्या परीक्षा हाॅलमध्ये मिरचीची पावडर टाकून परीक्षा उधळल्याची आठवणही डाॅ. गेडाम यांनी सांगितली. डाॅ. गेडाम यांच्या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सन्मानपत्र, ताम्रपत्र व २०१७ साली राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नागड्या शरीरावर काठीचा मार : कंबल परेड

प्रभातफेरी काढताना इंग्रजांच्या हाती लागलाे आणि वर्षभर कारागृहात गेलो. नागड्या शरीरावर घाेंगडे पांघरून लाठीने बेदम मारण्याची कंबल परेड अनुभवली. कालकाेठडीतही २४ तास काढले. वर्षभरानंतर सुटका झाली, पुन्हा शाळेत गेलाे. त्यावेळी शिक्षकांनी आंदाेलनात सहभागी हाेणार नाही, असे लेखी आश्वासन देण्यास सांगितले. तसे करण्यास साफ नकार दिला, त्यामुळे शाळेत प्रवेशच मिळाला नाही. त्यामुळे बुटीवाडा येथे टिळक विद्यालयात प्रवेश घेतला.

पदवीच्या वर्षी गांधीजींचा खून

दहावी उत्तीर्ण केली व पुढे सातारा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. हे साडेचार वर्षांचे पदवीचे शिक्षण घेत असताना महात्मा गांधीजींचा खून झाल्याची आठवण डाॅ. गेडाम यांनी सांगितली. १९५२ साली विदर्भात परतल्यानंतर आधी त्यांनी काटाेल व नरखेड येथे स्वत:चा दवाखाना टाकला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून नाेकरी मिळाली. १९८४ साली ते सेवानिवृत्त झाले.

टॅग्स :Socialसामाजिकhistoryइतिहास