शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

विवेक-भावनांचा अनोखा मेळ 'मनाचिये द्वारी'

By जितेंद्र ढवळे | Updated: February 27, 2024 19:18 IST

शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठाचे आयोजन.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने (काव्य आणि मानसशास्त्र यांचा लपंडाव) 'मनाचिये द्वारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मिलिंद देशपांडे, डॉ. मिलिंद आपटे व लक्षती काजळकर यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

उद्घाटन या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची उपस्थिती होती. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून नातेसंबंधातील तसेच कौटुंबिक नात्यातील क्लिष्टता कशाप्रकारे सोडवायची याचे सादरीकरण 'मनाचिये द्वारी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. मिलिंद देशपांडे यांनी कविता सादर करायची. लक्षिता काजळकर (भुसारी) यांनी प्रसंगानुरूप गायन करावे तर डॉ. मिलिंद आपटे यांनी परस्पर संबंधातील निर्माण झालेली क्लिष्टता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडविण्याबाबत सल्ला द्यायचा, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. पुरुष व स्त्री यांच्या तारुण्य ते वृद्धापकाळतील आयुष्यादरम्यान येणाऱ्या विविध प्रसंगाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुंदर असे विवेचन या कार्यक्रमातून करण्यात आले. प्रेम विवाह झालेल्या तरुण-तरुणी दरम्यान लग्नापूर्वी चांगला सुसंवाद राहतो. मात्र, लग्न झाल्यानंतर त्यांच्या दरम्यान गैरसमज निर्माण होतात. त्याचप्रमाणे समाजातील वाढती घटस्फोटाची प्रकरणे लक्षात घेता पती-पत्नी दोघांनाही योग्य समुपदेशनाची गरज असल्याचे कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. आपटे यांनी निदर्शनास आणून दिले.

मुलांची जडणघडण करताना योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-वडिलांवर असते. मात्र, त्यांच्याच दरम्यान वाद होत असेल तर मुलांवर काय संस्कार होणार याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक शिरीष वैद्य यांनी केले. कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, शताब्दी महोत्सव कक्षाचे विशेष कार्य अधिकारी प्रदीप बिनीवाले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर