शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विवेक-भावनांचा अनोखा मेळ 'मनाचिये द्वारी'

By जितेंद्र ढवळे | Updated: February 27, 2024 19:18 IST

शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठाचे आयोजन.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने (काव्य आणि मानसशास्त्र यांचा लपंडाव) 'मनाचिये द्वारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मिलिंद देशपांडे, डॉ. मिलिंद आपटे व लक्षती काजळकर यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

उद्घाटन या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची उपस्थिती होती. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून नातेसंबंधातील तसेच कौटुंबिक नात्यातील क्लिष्टता कशाप्रकारे सोडवायची याचे सादरीकरण 'मनाचिये द्वारी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. मिलिंद देशपांडे यांनी कविता सादर करायची. लक्षिता काजळकर (भुसारी) यांनी प्रसंगानुरूप गायन करावे तर डॉ. मिलिंद आपटे यांनी परस्पर संबंधातील निर्माण झालेली क्लिष्टता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडविण्याबाबत सल्ला द्यायचा, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. पुरुष व स्त्री यांच्या तारुण्य ते वृद्धापकाळतील आयुष्यादरम्यान येणाऱ्या विविध प्रसंगाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुंदर असे विवेचन या कार्यक्रमातून करण्यात आले. प्रेम विवाह झालेल्या तरुण-तरुणी दरम्यान लग्नापूर्वी चांगला सुसंवाद राहतो. मात्र, लग्न झाल्यानंतर त्यांच्या दरम्यान गैरसमज निर्माण होतात. त्याचप्रमाणे समाजातील वाढती घटस्फोटाची प्रकरणे लक्षात घेता पती-पत्नी दोघांनाही योग्य समुपदेशनाची गरज असल्याचे कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. आपटे यांनी निदर्शनास आणून दिले.

मुलांची जडणघडण करताना योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-वडिलांवर असते. मात्र, त्यांच्याच दरम्यान वाद होत असेल तर मुलांवर काय संस्कार होणार याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक शिरीष वैद्य यांनी केले. कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, शताब्दी महोत्सव कक्षाचे विशेष कार्य अधिकारी प्रदीप बिनीवाले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर