शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी तरुणांवर कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2022 19:12 IST

Nagpur News सुरक्षा रक्षकांच्या नोकरीसाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या युवकांवर गारठलेल्या थंडीत रात्री फूटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या फुटपाथवर काढली रात्रसुरक्षा रक्षकाच्या भरतीसाठी उत्तर प्रदेशातून आले युवक

नागपूर : परमाणू खनिज निदेशालयातर्फे नागपुरात सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर राबविली जात आहे. या भरतीसाठी उत्तर प्रदेशातून शेकडो युवक रोज येताहेत. हे युवक नागपुरातील गारठलेल्या थंडीमध्ये फुटपाथवर रात्र काढत आहे. सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी उत्तर प्रदेशातून युवकांना बोलावून त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था न करता त्यांना थंडीत कुडकुड ठेवण्याचा हा प्रकार वेदनादायी आहे.

शुक्रवारी मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या या युवकांशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला. थंडीत कुडकुड पडलेले हे युवक खाली प्लास्टिकचे बॅनर, एखादी चादर टाकून अंगावर ब्लँकेट ओढून झोपलेले होते. त्यांना फुटपाथवर झोपण्यामागचे कारण विचारल्यावर म्हणाले की उद्या सुरक्षा रक्षकाची भरती आहे. आम्ही उत्तर प्रदेशातून आलो आहे. सकाळी येथे शारीरिक चाचणी आहे. म्हणून फुटपाथवर झोपलो आहे. ही कायमस्वरूपी नोकरी असल्याचे हे युवक म्हणाले. युवकांना प्रात:विधी, जेवणासंदर्भात विचारल्यावर म्हणाले की, अशी कुठलीही सोय येथे नाही. प्रात:विधी सुलभ शौचालय आहे तेथे करतो. जेवणाचीही सोय स्वत:च केली आहे. या युवकांनी योगी सरकारवरही ताशेरे ओढले. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. रोजगाराच्या संधीच नसल्याने आम्हाला नागपुरात येऊन सुरक्षा रक्षकाच्या भरतीसाठी यावे लागले. थंडीच्या दिवसात रस्त्याच्या फुटपाथवर या युवकांनी रात्र काढली, हा प्रकार त्यांच्या आरोग्यासाठी व जीवासाठी धोकादायक आहे. परिसरात काही सभागृह आहे. तिथे त्यांच्या राहण्याची सोय करता आली असती.

- भरती प्रक्रिया राबविताहेत की वाईट कामे करताहेत

सकाळी भरती प्रक्रिया सुरू असताना, या मुलांच्या बाबतीत विचारणा करण्यासाठी लोकमत प्रतिनिधी गेले होते. मैदानावर सुरू असलेल्या शारीरिक कसरतीचे काही फोटो काढत असताना, सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला. भरती प्रक्रियेतील अधिकारी त्यावेळी आले. मोबाईलमध्ये काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगितले. आमचा उद्देश भरती प्रक्रिया राबविणाऱ्यांनी रात्री फुटपाथवर झोपलेल्या युवकांसाठी कुठेतरी सोय करावी, अशी भावना होती. या भरती प्रक्रियेसंदर्भात स्थानिक पोलिस अथवा प्रशासनालाही जाणीव आहे की नाही, हा प्रश्नच आहे. अशात फुटपाथवर झोपलेल्या युवकांच्या आरोग्याशी कमीजास्त झाल्यास जबाबदारी कोण घेणार?

टॅग्स :Socialसामाजिक