शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रोजगारासाठी तरुणांवर कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2022 19:12 IST

Nagpur News सुरक्षा रक्षकांच्या नोकरीसाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या युवकांवर गारठलेल्या थंडीत रात्री फूटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या फुटपाथवर काढली रात्रसुरक्षा रक्षकाच्या भरतीसाठी उत्तर प्रदेशातून आले युवक

नागपूर : परमाणू खनिज निदेशालयातर्फे नागपुरात सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर राबविली जात आहे. या भरतीसाठी उत्तर प्रदेशातून शेकडो युवक रोज येताहेत. हे युवक नागपुरातील गारठलेल्या थंडीमध्ये फुटपाथवर रात्र काढत आहे. सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी उत्तर प्रदेशातून युवकांना बोलावून त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था न करता त्यांना थंडीत कुडकुड ठेवण्याचा हा प्रकार वेदनादायी आहे.

शुक्रवारी मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या या युवकांशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला. थंडीत कुडकुड पडलेले हे युवक खाली प्लास्टिकचे बॅनर, एखादी चादर टाकून अंगावर ब्लँकेट ओढून झोपलेले होते. त्यांना फुटपाथवर झोपण्यामागचे कारण विचारल्यावर म्हणाले की उद्या सुरक्षा रक्षकाची भरती आहे. आम्ही उत्तर प्रदेशातून आलो आहे. सकाळी येथे शारीरिक चाचणी आहे. म्हणून फुटपाथवर झोपलो आहे. ही कायमस्वरूपी नोकरी असल्याचे हे युवक म्हणाले. युवकांना प्रात:विधी, जेवणासंदर्भात विचारल्यावर म्हणाले की, अशी कुठलीही सोय येथे नाही. प्रात:विधी सुलभ शौचालय आहे तेथे करतो. जेवणाचीही सोय स्वत:च केली आहे. या युवकांनी योगी सरकारवरही ताशेरे ओढले. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. रोजगाराच्या संधीच नसल्याने आम्हाला नागपुरात येऊन सुरक्षा रक्षकाच्या भरतीसाठी यावे लागले. थंडीच्या दिवसात रस्त्याच्या फुटपाथवर या युवकांनी रात्र काढली, हा प्रकार त्यांच्या आरोग्यासाठी व जीवासाठी धोकादायक आहे. परिसरात काही सभागृह आहे. तिथे त्यांच्या राहण्याची सोय करता आली असती.

- भरती प्रक्रिया राबविताहेत की वाईट कामे करताहेत

सकाळी भरती प्रक्रिया सुरू असताना, या मुलांच्या बाबतीत विचारणा करण्यासाठी लोकमत प्रतिनिधी गेले होते. मैदानावर सुरू असलेल्या शारीरिक कसरतीचे काही फोटो काढत असताना, सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला. भरती प्रक्रियेतील अधिकारी त्यावेळी आले. मोबाईलमध्ये काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगितले. आमचा उद्देश भरती प्रक्रिया राबविणाऱ्यांनी रात्री फुटपाथवर झोपलेल्या युवकांसाठी कुठेतरी सोय करावी, अशी भावना होती. या भरती प्रक्रियेसंदर्भात स्थानिक पोलिस अथवा प्रशासनालाही जाणीव आहे की नाही, हा प्रश्नच आहे. अशात फुटपाथवर झोपलेल्या युवकांच्या आरोग्याशी कमीजास्त झाल्यास जबाबदारी कोण घेणार?

टॅग्स :Socialसामाजिक