शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

 उच्च शिक्षणातील आरक्षणाला नख लावण्याची चाचपणी; तज्ज्ञांची टीका, युजीसीचे घुमजाव, आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नाहीच

By निशांत वानखेडे | Updated: January 31, 2024 18:57 IST

शैक्षणिक, सामाजिक आरक्षण ही संविधानिक व्यवस्था आहे, त्यामुळे सरकार किंवा युजीसीसारख्या संस्थांना ती रद्द करता येत नाही.

नागपूर: उच्च शिक्षणातील आरक्षित जागेवर संबंधित प्रवर्गाचे विद्यार्थी मिळाले नाही तर ते आरक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावावरून विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) घुमजाव केले आहे. असा कोणताच निर्णय घेतला जाणार नाही, असे युजीसीने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर जाहीर केले असले तरी हा संविधानातील आरक्षण धोरणाला नख लावण्याचाच प्रयत्न असल्याची टीका तज्ज्ञांनी केली आहे.

उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आरक्षित केलेल्या जागांवर जर त्या समाजाच्या पुरेशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, तर त्या जागांचे आरक्षण रद्द करून इतर समाजाला संधी देण्यात येईल, असा निर्णय युजीसीने घेतला होता व २८ जानेवारीपर्यंत सुचना व आक्षेप मागविले होते. 

या प्रस्तावाविरोधात युजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर बरेच आक्षेप व सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाल्यानंतर युजीसीने घुमजाव केले. युजीसीने असा कुठलाही निर्णय घेतला नाही व घेणार नाही, असे ट्विटर हॅन्डलवर जाहीर केले. शिवाय उच्च शिक्षण मंत्रालयानेही अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते हा चाचपणी करण्याचाच प्रकार आहे. नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीनंतर आरक्षणाला जागाच उरणार नाही, त्याची चाचपणी करण्याचाच हा प्रकार होय, असा आरोप करण्यात येत आहे.

एनईपीमध्ये आरक्षण बादच होईलकेंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी जोरात सुरू आहे. यात खाजगी संस्थांना भरमसाठ सवलती देऊन शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. परदेशी विद्यापीठासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. या बाजारीकरणात आरक्षण बादच होणार आहे. शैक्षणिक अर्ज करताना पर्याय निवडताना एका क्लिकवर आरक्षण कायमचे रद्द होण्याची भीती आहे. यावेळी लोकांच्या विरोधामुळे निर्णय फिरविला असला तरी त्यांचे लक्ष्य स्पष्ट आहे. - रमेश बिजेकर, शिक्षण तज्ज्ञ

ही डि-रिझर्वेशनचा असफल प्रयत्नशैक्षणिक, सामाजिक आरक्षण ही संविधानिक व्यवस्था आहे, त्यामुळे सरकार किंवा युजीसीसारख्या संस्थांना ती रद्द करता येत नाही. त्यामुळे मागच्या दारातून हा प्रयत्न चालला आहे. एनईपीची अंमलबजावणी झाल्यानंतर तसेही आरक्षणाला जागाच उरणार नाही, कारण पैसा ओतणाऱ्या खाजगी संस्था ते मान्य करणार नाही. त्याची वेगवेगळ्या मार्गाने चाचपणी सुरू आहे. हा सुद्धा डि-रिझर्वेशनचा असफल प्रयत्न होय. - डॉ. नितीन कोंगरे, सदस्य, नुटा 

टॅग्स :nagpurनागपूर