शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

 उच्च शिक्षणातील आरक्षणाला नख लावण्याची चाचपणी; तज्ज्ञांची टीका, युजीसीचे घुमजाव, आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नाहीच

By निशांत वानखेडे | Updated: January 31, 2024 18:57 IST

शैक्षणिक, सामाजिक आरक्षण ही संविधानिक व्यवस्था आहे, त्यामुळे सरकार किंवा युजीसीसारख्या संस्थांना ती रद्द करता येत नाही.

नागपूर: उच्च शिक्षणातील आरक्षित जागेवर संबंधित प्रवर्गाचे विद्यार्थी मिळाले नाही तर ते आरक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावावरून विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) घुमजाव केले आहे. असा कोणताच निर्णय घेतला जाणार नाही, असे युजीसीने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर जाहीर केले असले तरी हा संविधानातील आरक्षण धोरणाला नख लावण्याचाच प्रयत्न असल्याची टीका तज्ज्ञांनी केली आहे.

उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आरक्षित केलेल्या जागांवर जर त्या समाजाच्या पुरेशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, तर त्या जागांचे आरक्षण रद्द करून इतर समाजाला संधी देण्यात येईल, असा निर्णय युजीसीने घेतला होता व २८ जानेवारीपर्यंत सुचना व आक्षेप मागविले होते. 

या प्रस्तावाविरोधात युजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर बरेच आक्षेप व सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाल्यानंतर युजीसीने घुमजाव केले. युजीसीने असा कुठलाही निर्णय घेतला नाही व घेणार नाही, असे ट्विटर हॅन्डलवर जाहीर केले. शिवाय उच्च शिक्षण मंत्रालयानेही अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते हा चाचपणी करण्याचाच प्रकार आहे. नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीनंतर आरक्षणाला जागाच उरणार नाही, त्याची चाचपणी करण्याचाच हा प्रकार होय, असा आरोप करण्यात येत आहे.

एनईपीमध्ये आरक्षण बादच होईलकेंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी जोरात सुरू आहे. यात खाजगी संस्थांना भरमसाठ सवलती देऊन शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. परदेशी विद्यापीठासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. या बाजारीकरणात आरक्षण बादच होणार आहे. शैक्षणिक अर्ज करताना पर्याय निवडताना एका क्लिकवर आरक्षण कायमचे रद्द होण्याची भीती आहे. यावेळी लोकांच्या विरोधामुळे निर्णय फिरविला असला तरी त्यांचे लक्ष्य स्पष्ट आहे. - रमेश बिजेकर, शिक्षण तज्ज्ञ

ही डि-रिझर्वेशनचा असफल प्रयत्नशैक्षणिक, सामाजिक आरक्षण ही संविधानिक व्यवस्था आहे, त्यामुळे सरकार किंवा युजीसीसारख्या संस्थांना ती रद्द करता येत नाही. त्यामुळे मागच्या दारातून हा प्रयत्न चालला आहे. एनईपीची अंमलबजावणी झाल्यानंतर तसेही आरक्षणाला जागाच उरणार नाही, कारण पैसा ओतणाऱ्या खाजगी संस्था ते मान्य करणार नाही. त्याची वेगवेगळ्या मार्गाने चाचपणी सुरू आहे. हा सुद्धा डि-रिझर्वेशनचा असफल प्रयत्न होय. - डॉ. नितीन कोंगरे, सदस्य, नुटा 

टॅग्स :nagpurनागपूर