शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अहमदनगरला होणार सहकार तत्त्वावरील नवे शेळी मेंढी विकास महामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 20:33 IST

Nagpur News राज्यात दुसरे नवे शेळी-मेंढी विकास महामंडळ स्थापन होणार असून सहकार तत्त्वावरील या महामंडळाच्या मुख्यालयासाठी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गृहजिल्हा अहमदनगरचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.

नागपूर : राज्यात दुसरे नवे शेळी-मेंढी विकास महामंडळ स्थापन होणार असून सहकार तत्त्वावरील या महामंडळाच्या मुख्यालयासाठी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गृहजिल्हा अहमदनगरचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.

सध्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळ सहकार तत्त्वावर नाही आणि केंद्र सरकारने मेष पालनासाठी देऊ केलेल्या दहा हजार कोटींसाठी सहकार तत्त्वाची अट घातल्याने या नव्या महामंडळाची स्थापना केली जात आहे. सध्याच्या महामंडळाला दिलेल्या भाग भांडवलातील ९० कोटींची रक्कम नव्या महामंडळाच्या स्थापनेसाठी खर्च करण्याचा विचार सुरू असून नव्या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील बारा लाख शेळी-मेंढीपालक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज, गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नव्या महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात मंडळाची रचना, व्याप्ती, करावयाची कामे आदी बाबी निश्चित केल्या जातील.

‘अहिल्यादेवी’ महामंडळाचे ९० कोटी वळवणार

-पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाला भाग भांडवलाच्या रूपात दिलेल्या शंभर कोटींपैकी अखर्चित असलेला ९० कोटी रुपयांचा निधी देखील या नव्या महामंडळासाठी वळविण्यात येणार आहे. या निधीतून नव्या महामंडळाच्या कामकाजासाठी जमीन खरेदी, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आदी कामे केली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Governmentसरकार