शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

हार्ट अटॅकच्या तीव्रतेमुळे हृदयाला पडले छिद्र; शस्त्रक्रिया न करता ‘छत्री’ने केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2022 22:23 IST

Nagpur News तीव्र हृदय विकाराचा झटका आल्याने ५० वर्षीय रुग्णाच्या हृदयाच्या पडद्याला छिद्र पडले. रुग्णाचा जीव धोक्यात आला. मांडीतून ‘कॅथेटर’ सारखी नळी टाकून त्याद्वारे छत्रीसारखी रचना असलेल्या उपकरणाने छिद्र बंद करण्यात आले.

ठळक मुद्दे ५० वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान

नागपूर : तीव्र हृदय विकाराचा झटका आल्याने ५० वर्षीय रुग्णाच्या हृदयाच्या पडद्याला छिद्र पडले. रुग्णाचा जीव धोक्यात आला. छिद्र बंद करण्यासाठी ‘ओपन हार्ट’ सर्जरीचा पर्याय होता. परंतु, मृत्यूचा धोका १५ ते २० टक्के होता. यामुळे मांडीतून ‘कॅथेटर’ सारखी नळी टाकून त्याद्वारे छत्रीसारखी रचना असलेल्या उपकरणाने छिद्र बंद करण्यात आले. रुग्णाला जीवनदान मिळाले.

कामताप्रसाद दिवांगन (५०) त्या रुग्णाचे नाव. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु प्रकृती गंभर होत असल्याचे पाहत त्यांना तातडीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटचले हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निधीश मिश्रा म्हणाले, की रुग्णाची तपासणी केल्यावर ‘व्हेंट्रिक्युलर सेप्टल रप्चर’ नावाचा दुर्मिळ आजाराचे निदान झाले. यामध्ये हृदयाच्या डाव्या आणि उजव्या ‘वेंट्रिकल्स’ला विभाजित करणाऱ्या पडद्याला छिद्र पडले होते. तातडीने उपचार न केल्यास ९० टक्के मृत्यूचा धोका होता. यावर ‘ओपन हार्ट सर्जरी’चा पर्याय होता. परंतु १५ ते २० टक्के जिवाला धोका होता. यामुळे शस्त्रक्रियेविना उपकरणाने छिद्र बंद करण्याचा दुसरा पर्याय निवळला.

-हृदयाला पडलेले छिद्र मोठे होते

डॉ. मिश्रा म्हणाले, की जन्मत: दोष असलेल्या काही रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या हृदयाला असलेले छिद्राच्या तुलनेत हे छिद्र मोठे होते. यामुळे उपचाराची प्रक्रिया गुंतागुंतीची होती. छत्रीसारखे दिसणारे ‘सेप्टल ऑक्लुड’ यंत्राद्वारे हा दोष बंद करण्याचे आम्ही नियोजन केले. अनुभव व कौशल्याचा मदतीने छिद्र बंद करण्यात यश मिळाले. यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनीष चौखंद्रे, डॉ. निधीश मिश्रा, वरिष्ठ कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. आनंद संचेती यांच्यासह डॉ. संदीप धूत, डॉ आयुष्मा जेजानी आणि कॅथ लॅब तंत्रज्ञानी सहाकार्य केले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीलेश अग्रवाल म्हणाले, की प्रगत तंत्रज्ञानामुळे अशा गंभीर प्रकरणांना हाताळण्यास मदत झाली.

-तीन दिवसांत रुग्णालयातून सुटी

२३ नोव्हेंबर रोजी रुग्णांवर ही प्रक्रिया पार पडली आणि काही तासांतच रुग्णाला बरे वाटू लागले. २६ नोव्हेंबरला रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मध्य भारतातील ही पहिली यशस्वी प्रक्रिया असल्याचे डॉक्टरांनी दावा केला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य