शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

भ्रष्टाचाराची वाळवी संपवूनच देश विश्वगुरु होऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2022 21:14 IST

Nagpur News आज आपण सारे हा देश विश्वगुरू होण्याची स्वप्न पाहतोय. मात्र, देशाला वाळवीसारख्या खाणाऱ्या भ्रष्टाचाराला आधी संपविण्याची गरज आहे. आपण सारे मिळून तो संपवू शकतो, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

ठळक मुद्देब्रह्माकुमारी नागपूरच्या सुवर्ण महोत्सव समारंभात पंजाब राज्यपाल पुरोहित यांचे प्रतिपादन

नागपूर : देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. आज आपण सारे हा देश विश्वगुरू होण्याची स्वप्न पाहतोय. मात्र, देशाला वाळवीसारख्या खाणाऱ्या भ्रष्टाचाराला आधी संपविण्याची गरज आहे. आपण सारे मिळून तो संपवू शकतो. यासाठी महात्मा गांधींच्या ‘साधे जीवन उच्च विचार’ या आचरणाचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

जामठा येथील विश्व शांती सरोवर सभागृहात ब्रह्माकुमारी नागपूरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गुरुवारी झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, आमदार मोहन मते, ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासक राजयोगिनी संतोष दीदी, ब्रह्माकुमारी नागपूरच्या ब्रह्माकुमारी रजनी दीदी, कार्यकारी सचिव व शिक्षा विभाग(माउंट आबू)चे अध्यक्ष राजयोगी ब्रह्मकुमार मृत्युंजय व उपाध्यक्ष राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिलु दीदी, भाजपचे कोषाध्यक्ष किरीट भन्साली, ब्रह्माकुमारीज मीडिया मुंबईचे नॅशनल समन्वयक राजयोगी निकुंज भाई, मेडिकल निदेशक राजयोगी डॉ. प्रताप मिढ्डा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुरोहित म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाने साधी जीवनशैली स्वीकारली तर गरजा मर्यादित होतील. लालसा थांबेल. या मार्गाने गेलात तर पुढच्या पाच वर्षांत देश विश्वगुरु झालेला दिसेल.

जगाच्या नजरा भारताकडे : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगाला एकमेव भारतच नैतिक मूल्य, विचार व उत्तम भविष्य देऊ शकतो, याचा त्यांना विश्वास आहे. जगाची ही भावना लक्षात घेता आता आचरणात बदल करणे ही आपली जबाबदारी आहे. नैतिकता व मूल्य यावरच आपली संस्कृती टिकून आहे. जगात शांतता स्थापन करण्यात ब्रह्माकुमारीच्या योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

मनातील विचार आचरणात आणणे आवश्यक : विजय दर्डा

विजय दर्डा म्हणाले, समाजात महिलाच परिवर्तन घडवू शकतात. त्या परिवर्तनात पुरूषांची साथ आवश्यक आहे. आपण सारे महिला सशक्तीकरणावर बोलतो. मात्र, संपूर्ण जगात हे एकमेव संस्थान असे आहे की ज्याचे संचलन फक्त महिला करतात. जगात जेथून शांती हरवत चालली त्यांच्याकडे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बैठक नाही. भारतच जगाला शांती देऊ शकतो. ब्रह्माकुमारीजच्या नि:स्वार्थ सेवाभावाचाही त्यांनी गौरव केला.

भारताचा झेंडा जगात फडकावा : संतोष दीदी

ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासक राजयोगिनी संतोष दीदी म्हणाल्या, नागपूर ही पुण्यभूमी आहे. येथे अनेकांचे जीवन घडले, भातृभाव वाढला आहे. समाजाची सेवा करून विश्वभावना व्यापक करणे ही आमच्या परिवाराची भावना आहे. आपण सारे एक आहोत, एकाच पित्याची लेकरे आहेत. आपणा सर्वांची भावना एक आहे. आपला सर्वांचा शुभ कार्यात सहयोग लाभला तर हे जग सुखी करण्यास वेळ लागणार नाही.

यांचा झाला सत्कार

मागील ४० ते ५० वर्षांपासून निरंतर सेवा देणाऱ्या सीता दीदी (अमरावती), इंद्रा दीदी (अमरावती), बिंदु दीदी (वरुड), रत्नमाला दीदी (गोंदिया), मंगला दीदी (यवतमाळ), जयमाला दीदी (हिंगणघाट), नलिनी दीदी (गडचिरोली), शोभा दीदी (भंडारा), रुक्मिणी दीदी (अकोला) यांचा समारंभादरम्यान सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी ‘कौन कहते हैं भगवान आते नही’ हे भजन गायले.

...

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहितVijay Dardaविजय दर्डा