शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

भ्रष्टाचाराची वाळवी संपवूनच देश विश्वगुरु होऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2022 21:14 IST

Nagpur News आज आपण सारे हा देश विश्वगुरू होण्याची स्वप्न पाहतोय. मात्र, देशाला वाळवीसारख्या खाणाऱ्या भ्रष्टाचाराला आधी संपविण्याची गरज आहे. आपण सारे मिळून तो संपवू शकतो, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

ठळक मुद्देब्रह्माकुमारी नागपूरच्या सुवर्ण महोत्सव समारंभात पंजाब राज्यपाल पुरोहित यांचे प्रतिपादन

नागपूर : देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. आज आपण सारे हा देश विश्वगुरू होण्याची स्वप्न पाहतोय. मात्र, देशाला वाळवीसारख्या खाणाऱ्या भ्रष्टाचाराला आधी संपविण्याची गरज आहे. आपण सारे मिळून तो संपवू शकतो. यासाठी महात्मा गांधींच्या ‘साधे जीवन उच्च विचार’ या आचरणाचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

जामठा येथील विश्व शांती सरोवर सभागृहात ब्रह्माकुमारी नागपूरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गुरुवारी झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, आमदार मोहन मते, ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासक राजयोगिनी संतोष दीदी, ब्रह्माकुमारी नागपूरच्या ब्रह्माकुमारी रजनी दीदी, कार्यकारी सचिव व शिक्षा विभाग(माउंट आबू)चे अध्यक्ष राजयोगी ब्रह्मकुमार मृत्युंजय व उपाध्यक्ष राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिलु दीदी, भाजपचे कोषाध्यक्ष किरीट भन्साली, ब्रह्माकुमारीज मीडिया मुंबईचे नॅशनल समन्वयक राजयोगी निकुंज भाई, मेडिकल निदेशक राजयोगी डॉ. प्रताप मिढ्डा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुरोहित म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाने साधी जीवनशैली स्वीकारली तर गरजा मर्यादित होतील. लालसा थांबेल. या मार्गाने गेलात तर पुढच्या पाच वर्षांत देश विश्वगुरु झालेला दिसेल.

जगाच्या नजरा भारताकडे : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगाला एकमेव भारतच नैतिक मूल्य, विचार व उत्तम भविष्य देऊ शकतो, याचा त्यांना विश्वास आहे. जगाची ही भावना लक्षात घेता आता आचरणात बदल करणे ही आपली जबाबदारी आहे. नैतिकता व मूल्य यावरच आपली संस्कृती टिकून आहे. जगात शांतता स्थापन करण्यात ब्रह्माकुमारीच्या योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

मनातील विचार आचरणात आणणे आवश्यक : विजय दर्डा

विजय दर्डा म्हणाले, समाजात महिलाच परिवर्तन घडवू शकतात. त्या परिवर्तनात पुरूषांची साथ आवश्यक आहे. आपण सारे महिला सशक्तीकरणावर बोलतो. मात्र, संपूर्ण जगात हे एकमेव संस्थान असे आहे की ज्याचे संचलन फक्त महिला करतात. जगात जेथून शांती हरवत चालली त्यांच्याकडे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बैठक नाही. भारतच जगाला शांती देऊ शकतो. ब्रह्माकुमारीजच्या नि:स्वार्थ सेवाभावाचाही त्यांनी गौरव केला.

भारताचा झेंडा जगात फडकावा : संतोष दीदी

ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासक राजयोगिनी संतोष दीदी म्हणाल्या, नागपूर ही पुण्यभूमी आहे. येथे अनेकांचे जीवन घडले, भातृभाव वाढला आहे. समाजाची सेवा करून विश्वभावना व्यापक करणे ही आमच्या परिवाराची भावना आहे. आपण सारे एक आहोत, एकाच पित्याची लेकरे आहेत. आपणा सर्वांची भावना एक आहे. आपला सर्वांचा शुभ कार्यात सहयोग लाभला तर हे जग सुखी करण्यास वेळ लागणार नाही.

यांचा झाला सत्कार

मागील ४० ते ५० वर्षांपासून निरंतर सेवा देणाऱ्या सीता दीदी (अमरावती), इंद्रा दीदी (अमरावती), बिंदु दीदी (वरुड), रत्नमाला दीदी (गोंदिया), मंगला दीदी (यवतमाळ), जयमाला दीदी (हिंगणघाट), नलिनी दीदी (गडचिरोली), शोभा दीदी (भंडारा), रुक्मिणी दीदी (अकोला) यांचा समारंभादरम्यान सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी ‘कौन कहते हैं भगवान आते नही’ हे भजन गायले.

...

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहितVijay Dardaविजय दर्डा