शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

डेंग्यूने घेतला १७ वर्षीय तरुणाचा बळी

By गणेश हुड | Updated: May 24, 2024 22:01 IST

एकाच गावात आढळले ८ डेंग्यूचे रुग्ण :  आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क

नागपूर : वातावरणातील बदल, अवकाळी पावसामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे.  डासांचाही प्रकोप शहरासोबतच ग्रामीणमध्येही मोठयाप्रमाणात वाढला आहे.  मौदा तालुक्यातील राजोली येथील एका १७ वर्षीय तरुणाचा योंग्य उपचाराअभावी डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

साहील मेघश्याम श्रावणकर असे डेंग्यू आजाराने दगाविलेल्या तरुणाचे नाव आहे. राऊत यांनी सांगितले की, १२ मे रोजी त्या तरुणाला ताप आल्यानंतर त्याने कोदामेंढी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु त्यानंतरही त्याचा ताप कमी होत नसल्याने त्याची खासगीमध्येच रक्त तपासणी होऊन सलाईन लावण्यात आली. परंतु त्याची प्रकृती त्यातुनही बरी न झाल्याने त्याला १५ मे रोजी भंडाऱ्यातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे त्याचे प्लेटलेट व रक्तदाब कमी झाल्याने १६ मे रोजी त्याला रुग्णालयातुन सुटी देत नागपूरच्या रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत सांगण्यात आले. याचदरम्यान नागपूरला जात असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जि.प. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याची डेंग्यूची चाचणी केली असता, त्यात तो सकारात्मक आढळून  आला.  या तरुणाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात घराघरामध्ये धुरफवारणी करण्यात आली. साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या गावातील  १७ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले असता, त्यापैकी ८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या सर्व रुग्णांची प्रकृती आता ठणठणीत आहे.  संपूर्ण गावामध्ये कोदामेंढी पीएचसी व ग्रा.पं.च्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. आपण स्वत: गावभेटीतुन आजारावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या असल्याचे राऊत यांनी सांगितले....जिल्ह्याभरात आशा देणार ‘डोअर टू डोअर’ भेटीसातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. याशिवाय जिल्ह्यात डेंग्यूचेही रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांचे वेळीच उपचार होऊन निदान व्हावे, यासाठी आशा सेविकांच्या माध्यमातून येत्या सोमवारपासून जिल्ह्याभरात ‘डोअर टू डोअर’ भेटी देण्यात येणार आहे. या माध्यमातून लक्षणे असलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), उपकेंद्रामध्ये आणून त्यांची रक्तपासणी करून, त्यानंतर येणा-या अहवालाच्या आधारावर त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार असल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर