शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
3
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
4
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
5
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
6
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
7
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
8
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
9
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
10
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
11
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
12
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
13
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
14
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
15
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
16
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
17
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
19
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
20
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन; नाट्यसंमेलनाने वाढविल्या अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:19 IST

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या ९९ व्या अंकाचा समारोप झाला. प्रचलित शब्दानुसार संमेलनाचे सूप वाजले. साडेतीन दशकाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागपुरात आणि पर्यायाने विदर्भात झालेले हे संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्णच ठरले.

ठळक मुद्देउत्सव सुरेख, रंगभूमी मजबूत करण्याचे आव्हानवेळेच्या नियोजनाचाही धडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या ९९ व्या अंकाचा समारोप झाला. प्रचलित शब्दानुसार संमेलनाचे सूप वाजले. साडेतीन दशकाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागपुरात आणि पर्यायाने विदर्भात झालेले हे संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्णच ठरले. प्रजा आणि राजाचा संवाद येथे रंगला, नाट्यकलेच्या बहुतेक रंगांची उधळणही झाली आणि वेळेची गणित बिघडली तरी अनेक हात एकत्रित येऊन संमेलन सलग ६३ तास चालण्याचा विक्रमही येथे झाला. काय मिळाले आणि काय सुटले याचे ठोकताळे बांधता येणे शक्य नसले तरी कायम स्मरणात राहावी अशी आठवण या संमेलनाच्या निमित्ताने वैदर्भीय नाट्यकर्मी व नाट्यप्रेमींना दिली. मात्र या संमेलनाने अपेक्षाही निर्माण केल्या. या अपेक्षा कोणत्याही मोठ्या आयोजनापेक्षा ‘नाटक : उणे मुंबई-पुणे’ या अधिक आहेत.बोधी वैचारिकतेचा वारसा लाभलेला नाटककार प्रेमानंद गज्वी संमेलन अध्यक्ष म्हणून लाभणे हेही या संमेलनाचे वैशिष्ट्यच होते. अर्थातच अनेक वर्षानंतर होत असलेल्या नाट्यसंमेलनाची उत्सुकता होतीच. ही उत्सुकता पहिल्याच दिवशी निघालेल्या नाट्यदिंडीने अधिकच वाढविली. महालच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असलेले देखावे, लोककलांचे आक र्षक सादरीकरण आणि मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी अभिभूत करणारी ठरली. जोश आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उद््घाटनाच्या वेळी प्रजेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार आणि प्रेमानंद गज्वी यांनी धर्म, अभिव्यक्ती, शहरी नक्षलवाद अशा वर्तमान मुद्यांवरून सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यास दिलेले उत्तर आणि समारोपाला पुन्हा गज्वी यांची फटकेबाजी, हा संवाद तमाम महाराष्टÑाने अनुभवला. संमेलनभर ही चर्चा रंगत राहिली.संमेलनाच्या पहिल्या दिवशीपासून वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे सादरीकरण नाट्यकर्मी व नाट्यप्रेमींनी अनुभवले. विविध नाट्य स्पर्धांमध्ये गाजलेल्या व समाजातील ज्वलंत विषयांना हात घालणाºया एकांकिका, नाट्यकलेचा समृद्ध वारसा चालविणाºया झाडीपट्टीची दोन नाटके, सोलापूर येथील संस्थेतर्फे कन्नड शैलीतील ‘विश्वदाभिराम’ हे मराठी नाटक, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांची वेदना मांडून शेतकऱ्यांना जगण्याची उर्मी देणारे ‘तेरवं’ या नाटकाने लक्ष वेधले. एकाचवेळी हसू व अश्रु मांडणारे एकपात्री प्रयोग, परिसंवाद आणि मराठी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडविणाºया संगीतमय कार्यक्रमांनी रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आनंदवनच्या बालकलावंतांचे मनोहर सादरीकरण, ९९ संमेलने व संमेलनाध्यक्षांचा इतिहास दर्शविणारी ‘संमेलनाची वारी’ रसिकांना अनुभवायला मिळाली. सुरेश भट सभागृह व रेशीमबागची राम गणेश गडकरी नाट्यनगरी परिसर दिवसरात्र रंगकर्मी व रसिकांच्या उपस्थितीने फुलला होता. तरुण कलावंतांना दिशा देणारा आणि ज्येष्ठांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा सोहळा होता.संमेलनाच्या निमित्ताने का होईना रंगकर्मी एकत्रित आले आणि जमेल त्या पद्धतीने सहभाग घेतला. काही नाराजही झाले. दखल न घेतल्यामुळे महानगर शाखेचे सलीम शेख सुरुवातीला नाराज झाले, पण हे आपले संमेलन आहे असा समजूतदारपणा दाखवला एकांकिकेच्या माध्यमातून बहुजन रंगभूमीनेही सहभाग नोंदविला. नाट्य परिषदेसह अनेक नाट्य संस्था पुढे आल्या.काही नकोशा गोष्टींचा उल्लेखही येथे महत्त्चाचा ठरेल. नाट्यदिंडीपर्यंत सर्व व्यवस्थित असताना उद््घाटनापासून बिघडलेले वेळेचे गणित शेवटपर्यंत आयोजकांना सांभाळणे शक्य झाले नाही. एवढे की आनंदवनच्या मूकबधिर मुलांनाही त्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत वाट पाहण्याचा मनस्ताप सहन करावा लागला. अ.भा. नाट्य परिषद व नागपूर शाखेतील मतभेदही यातून समोर आला. स्वतंत्र बालनाट्य संमेलन होते, पण पथनाट्य आणि लोककलावंतांच्या सहभागापासूनही संमेलन वंचित राहिले. अनेक हात राबत असल्याने या उणिवा टाळता आल्या असत्या.ज्येष्ठ नाट्यकर्मींच्या संवादातून पुढे आलेला महत्त्वाचा मुद्दा येथे मांडणे अगत्याचे ठरेल, तो म्हणजे नागपूर व विदर्भाची रंगभूमी मजबूत करण्याचा. पुण्या-मुंबईच्या नाटकांना येथे गर्दी होते, मात्र येथील नाटकांना तिकडून मागणी कधी येणार, हा प्रश्न आहे. नाना जोग, दारव्हेकर मास्तरांच्या नाटकांना एकेकाळी पुण्या-मुंबईतही हाऊसफुल्ल गर्दी व्हायची, तसे आता होत नाही. कला, अभिनय व तांत्रिक बाबतीत तशी दर्जेदार नाट्यकृती कशी घडेल आणि आधुनिकतेच्या आव्हानांना कसे पेलविता येईल, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.त्या अंगाने कुठलेही मार्गदर्शन न लाभल्याने संमेलनातून काहीच साध्य न झाल्याची ज्येष्ठ नाट्यकर्मींची खंत विचार करायला करणारी आहे. याबाबत सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल.

टॅग्स :Natakनाटक